शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
5
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
6
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
7
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
8
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
9
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
10
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
11
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
12
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
13
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
14
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
15
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
16
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
17
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
18
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
19
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
20
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले

इंग्रजांच्या खबऱ्यांनी आम्हाला शिकवू नये; मुख्यमंत्र्यांची मोदींवर जहरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 10:01 AM

देशाचे संविधान आता धोक्यात आले आहे. लोकशाहीची हत्या होत आहे. अनेक संस्था नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. न्यायव्यवस्थेवर दडपण टाकण्यात येत आहे. निवडणूक आयोग, सीबीआय, ईडी, आयकर विभाग दडपणाखाली असल्याचे गेहलोत यांनी नमूद केले. 

जयपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांकडून काँग्रेसच्या वारशावर  हल्लाबोल करण्यात येतो. पण इंग्रजांच्या खबऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, अशी जहरी टीका राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली. यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाच्या 135 व्या स्थापना दिनी शहिद स्मारकाच्या प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात ते बोलत होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षातील लोक पंडित नेहरूंच्या वारश्याविषयी बोलत असतात. पंडित नेहरूंनी आम्हाला त्यागाचा, बलिदानाचा आणि वेळप्रसंगी कारागृहात जाण्याचा वारसा दिला आहे. देशासाठी बलिदान देण्याचा वारसा आहे. राजीव गांधी यांनी बलिदान दिले तो देखील वारसा होता. मात्र तुमच्या पक्षाच्या विचारधारेचे लोक इंग्रजांसाठी खबऱ्यांच काम करत होते. असे लोक काँग्रेसच्या विरासतीच्या गप्पा मारत आहेत. ही अत्यंत लाजीरवाणी बाब असल्याचे गेहलोत म्हणाले. 

आमच्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. काँग्रेस पक्षाला पाहता पाहता 135 वर्षे झाल्याचे सांगताना गेहलोत म्हणाले की, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष संघर्ष करत आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा दहा वर्षांचा काळ सर्वांना ठावूक आहे. तो काळ अधिकारांचा होता. माहितीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, रोजगार अधिकार, मनरेगा, अन्नसुरक्षा कायदा हे छोटे निर्णय नव्हते, असंही गेहलोत यांनी सांगितले. 

दरम्यान देशाचे संविधान आता धोक्यात आले आहे. लोकशाहीची हत्या होत आहे. अनेक संस्था नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. न्यायव्यवस्थेवर दडपण टाकण्यात येत आहे. निवडणूक आयोग, सीबीआय, ईडी, आयकर विभाग दडपणाखाली असल्याचे गेहलोत यांनी नमूद केले.