शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

नागालँड, त्रिपुरा, मेघालयातील सत्तेसाठी भाजपाला कसावी लागणार कंबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2018 15:54 IST

ईशान्य भारतात नागालँड, मेघालय, त्रिपुरा येथे फेब्रुवारी महिन्यात निवडणुका होत आहेत. भारतीय जनता पार्टी ईशान्य भारतामध्ये सर्व राज्यांमध्ये बळ वाढविण्यासाठी या तीन राज्यांची सत्ता मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करेल यात शंका नाही.

ठळक मुद्देमेघालयमध्ये काँग्रेसला गळती लागल्यामुळे भाजपाला फायदा होण्याची शक्यता आहे, मात्र तरिही तेथे पक्षाला विशेष प्रयत्न करावे लागतील.

नवी दिल्ली- ईशान्य भारतात नागालँड, मेघालय, त्रिपुरा येथे फेब्रुवारी महिन्यात निवडणुका होत आहेत. भारतीय जनता पार्टी ईशान्य भारतामध्ये सर्व राज्यांमध्ये बळ वाढविण्यासाठी या तीन राज्यांची सत्ता मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करेल यात शंका नाही. सध्या ईशान्य भारतामध्ये भाजपाची आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर या राज्यांमध्ये सत्ता आहे. मात्र या तीन राज्यांमध्ये सत्ता मिळवणे भाजपासाठी तितके सोपे असणार नाही. मेघालयातील काँग्रेसकडून सत्ता मिळवणे तसेच त्रिपुरामधील डाव्यांचे प्रदीर्घ काळ चाललेले सरकार उलथवणे भाजपासाठी मोठे आव्हान आहे. नागालँडमध्ये सध्या भारतीय जनता पार्टी नागालँड पिपल्स फ्रंटबरोबर सत्तेमध्ये आहे. तेथिल सत्ताही भाजपाला राखावी लागणार आहे.ईशान्य भारतामध्ये आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, मिझोरम, नागालँड, त्रिपुरा आणि सिक्कीम राज्यांचा समावेश होतो. गेल्या वर्षी या आठही राज्यांमध्ये भाजपा सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करणार असा मनोदय भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला होता. या राज्यांमध्ये हातपाय पसरण्यासाठी भाजपाने नॉर्थ-इस्ट डेमोक्रॅटिक अलायन्स (नेडा)ची 2016 मध्ये स्थापन केली आहे. या राजकीय आघाडीमध्ये नागालँडमधील नागा पिपल्स फ्रंट, सिक्किमच्या सिक्किम डेमोक्रॅटिक फ्रंट, आसामच्या आसाम गण परिषद व बोडोलँड पिपल्स फ्रंट यांचा समावेश आहे.मेघालयमध्ये 60 जागांपैकी कॉंग्रेसचे सध्याच्या विधानसभेत 23 आमदार होते, युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टीचे 7, हिल स्टेट पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचे 4, राष्ट्रवादी काँग्रेसचे 1, नॅशनल पिपल्स पार्टीचे 2, गारो नॅशनल कौन्सील 1,  नॉर्थ इस्ट सोशल डेमोक्रॅटिक पार्टीचा 1 आणि 13 अपक्ष आमदार आहेत. मुकुल संगमा मेघालयचे मुख्यमंत्री आहेत. पक्षांतर करुन भाजपामध्ये गेलेले लोक त्यांच्यासमोर मोठं आव्हान निर्माण करणार यात शंका नाही. नागालँडमध्ये 60 पैकी 48 जागा नागालँड पिपल्स फ्रंटकडे आहेत. भाजपाकडे 4 व अपक्षांकडे 8 जागा आहेत. सलग 11 वर्षे मुख्यमंत्री असणारे नेफियु रिओ 2014 साली मुख्यमंत्री झाले. भाजपासमोर खरे आव्हान असेल ते त्रिपुरामध्ये. त्रिपुरामध्ये डाव्या आघाडीची सत्ता त्यातही माणिक सरकार यांची राज्यावर असणारी पकड भाजपाला त्रासदायक ठरणार आहे. 60 जागांच्या विधानसभेत डाव्या आघाडीकडे 51 जागा, भाजपाकडे 6 आणि काँग्रेसकडे 2 जागा आहेत. एका आमदाराचे सदस्यत्त्व पक्षांतरबंदी कायद्यामुळे गेल्याने ती जागा रिक्त आहे.

टॅग्स :IndiaभारतBJPभाजपाNaga Peoples Frontनागा पीपल्स फ्रंट