शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

"राहुल गांधींना मोहेंजोदडोलाच पाठवा, ते तिथलेच पंतप्रधान होऊ शकतात"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 13:08 IST

BJP Sambit Patra taunt Congress Rahul Gandhi : भाजपा नेता संबित पात्रा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खिल्ली उडवली आहे.

नवी दिल्ली - एका लाईव्ह डिबेट शोमध्ये भाजपा नेता संबित पात्रा (BJP Sambit Patra) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांची खिल्ली उडवली आहे. चर्चेदरम्यान जेव्हा अँकरने काँग्रेस नेते गजेंद्र सिंह सांखला यांना एक प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी टोला लगावला आहे. नविका कुमार यांनी "सवाल पब्लिक का" कार्यक्रमात गजेंद्र सांखला यांना तस्लीम रहमानी यांचं म्हणणं आहे तशीच काँग्रेसची विचारसरणी आहे का? असा प्रश्न विचारला होता. "तुम्हीही त्या विचारसरणीशी सहमत आहात का जी म्हणते या देशाची निर्मिती मुघलांनी केली आहे, बाबरने केली आहे? काँग्रेस पक्ष याच्याशी सहमत आहे का?" असं विचारलं. 

गजेंद्र सांखला यांनी यावर उत्तर देताना "मोहेंजोदडोच्या काळात दगडातून आग निर्माण केली जात होती आम्ही असं मानतो. त्यावेळी तितका विकास झाला नव्हता असं तुम्हीच मानता. गेल्या सात-साडे सात वर्षांपासून भाजपाचे हे प्रवक्ते वारंवार काँग्रेसने काहीच काम केलेलं नाही सांगत असतात" असं म्हटलं. यावरून भाजपाचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी टोला लगावण्यास सुरुवात केली. "काँग्रेस मोहेंजोदडोमध्ये काय करत होती? मला हे समजत नाही आहे. राहुल गांधी मोहेंजोदडोमधून आले आहेत का? काय बोलत असता तुम्ही सांखला साहेब…तुमचं म्हणणं पूर्ण कधी होणार, चर्चा आता संपायला आली आहे" असं म्हटलं. 

"राहुल गांधींना मोहेंजोदडोलाच पाठवा"

"मोहेंजोदडो, राहुल गांधी, काँग्रेसवादी…कमाल आहे. राहुल गांधींना मोहेंजोदडोलाच पाठवा, ते तिथलेच पंतप्रधान होऊ शकतात" असं देखील संबित पात्रा यांनी म्हटलं आहे. यानंतर नविका कुमार यांनी सांखलाजी समस्या ही आहे की, काँग्रेस पक्षाकडे दुसऱ्याला श्रेय देण्यासाठी वेळच नाही. श्रेयाची चिंता सतावत आहे. वीर सावरकरांशी काही देणं घेणं नाही, ना बाबरशी, ना मुघलांशी…हे तर असं म्हणत आहेत की श्रेय द्यायचं असेल तर फक्त गांधी कुटुंबाला द्या. किमान सांखलांच्या बोलण्यावरुन तरी तसंच वाटत आहे" असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"भाजपाने एक जरी जागा जिंकली तर राजकारण सोडेन"; काँग्रेस नेत्याचं जाहीर आव्हान

काँग्रेसचे नेत्याने थेट भाजपाला (BJP) जाहीर आव्हान दिलं आहे. राजस्थानचे क्रीडा मंत्री अशोक चांदना (Congress Ashok Chandna) यांनी "राज्यात पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला एकही जागा मिळाल्यास राजकारण सोडेन" असं मोठं विधान केलं आहे. "राज्यातील आतापर्यंतच्या इतिहासात भाजपाला पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसइतक्या जागा कधीच जिंकता आलेल्या नाहीत आणि ते जिंकूही शकणार नाहीत" असंही चांदना म्हणाले आहेत. राजस्थानमध्ये वल्लभनगर आणि धारियावाड मतदारसंघात 30 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणुका होणार आहेत.

 

 

टॅग्स :Sambit Patraसंबित पात्राRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस