शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

अकबर यांना भाजपाचे ‘संरक्षण’; राजीनामा नाहीच, ‘मीटू’कडेही दुर्लक्ष!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 06:19 IST

निवडणुकांमुळे चुप्पी : काँग्रेसला राफेलनंतर मिळाला आणखी एक आयता मुद्दा

नवी दिल्ली : परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी परेदशातून परतताच लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या पत्रकार प्रिया रमानी यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा केल्यानंतर केंद्र सरकार व भाजपाने त्यांना तूर्त तरी संरक्षण देण्याचा आणि मीटू मोहिमेकडे शक्यतो दुर्लक्ष करण्याचा पवित्रा घेतला आहे. अकबर यांनी आपली बाजू मांडली असून, त्यांनी संबंधितांवर दावाही दाखल केला आहे, असे स्पष्टपणे सांगतानाच, आता त्यांच्या राजीनाम्याची गरज नाही, असेच जणू भाजपा नेत्यांनी सोमवारी सूचित केले.

केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा म्हणाले की, अकबर यांची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच त्यांना कायदेशीर कारवाईही सुरू केली आहे. मात्र नड्डा यांनी अकबर यांच्या राजीनाम्याविषयी बोलण्यास नकार दिला. भाजपाचे प्रवक्ते जी. व्ही. एल. नरसिम्हा राव म्हणाले की, अकबर यांच्यावरील आरोप पक्षाने मान्य वा अमान्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आता अकबर यांनी स्वत:हूनच आपले म्हणणे मांडले आहे. तेही राजीनाम्याविषयी काहीच बोलले नाहीत.अकबर यांच्या रूपाने मुस्लीम नेत्याला संरक्षण द्यावे आणि त्यांच्या राजीनाम्याविषयी बोलू नये, अशी भूमिका भाजपाने घेतलेली दिसते. एवढेच नव्हे, तर मीटू मोहिमेचे एकदा स्वागत केले असले तरी त्यावर आता फार बोलायचे नाही, असे भाजपाने ठरविले आहे, असे कळते. महिलांच्या सशक्तीकरणाविषयी मात्र भाजपा सतत बोलत राहणार आहे. आमच्या सरकारनेच महिलांचे सशक्तीकरण केले, अशी भाजपाची भूमिका असेल, असे दिसते.

मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड व मिझोरम या राज्यांच्या विधानसभा निवडणुका होईपर्यंत हा विषय वाढवायचा नाही, अशी भाजपाची भूमिका दिसत आहे. याच विषयावर हल्ला चढवण्याचे ठरवले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज मध्य प्रदेशमधील एका सभेत बलात्काराचे आरोप असलेल्या भाजपाचा उल्लेख करून, भाजपापासून मुलींना वाचवा असा नारा दिला. महिलांचे लैंगिक शोषण, राफेल विमान खरेदी आणि पेट्रोल-डिझेलचे वाढते दर हे तीन विषय काँग्रेसला मोदी सरकारवर हल्ला चढवायला आयतेच मिळाले आहेत.पण मीटूमुळे राफेलचा विषय मागे पडत चालला आहे आणि मीटूचे समर्थन करताना, १0 वा २0 वर्षांपूर्वीची प्रकरणे आता काढून काय उपयोग, अशी भूमिका भाजपा नेते घेण्याची शक्यता आहे. त्यामुळेच बहुधा मनेका गांधी आणि स्मृती इराणी यांनी आता न बोलण्याचे ठरविले आहे, असे कळले.पत्रकार संघटनांनी मात्र अकबर यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. स्वत:हून राजीनामा न देता, खटला दाखल करून तक्रारदारांचे तोंड बंद करण्याचा पवित्रा घेतल्याबद्दल देशभरातील पत्रकारांच्या संघटनांनी संताप व्यक्त केला. प्रेस क्लब आॅफ इंडिया, इंडियन विमेन प्रेस कॉर्प््स, प्रेस असोसिएशन आणि साऊथ एशियन विमेन इन मीडिया या संघटनांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईपर्यंत अकबर यांनी पदावरून दूर व्हावे, अशी मागणी केली आहे.

अकबर यांनी प्रिया रमानी यांच्याविरोधात आज दिल्लीतील पतियाला हाऊस कोर्टात मानहानीचा खटला दाखल केला. रमानी यांनी जाणीवपूर्वक आणि चुकीच्या हेतूने शोषणाचे आरोप केल्याचे अकबर यांनी म्हटले आहे. याउलट, निर्लेप सत्य हाच माझा बचाव असल्याने अकबर यांनी माझ्याविरुद्ध दाखल केलेल्या बदनामीच्या खटल्यास सामोरे जाण्याची माझी तयारी आहे, असे ठाम प्रत्युत्तर अकबर प्रिया रमाणी यांनी म्हटले आहे.

आरोप गांभीर्याने घेण्याऐवजी खटला दाखल करून तक्रारदार महिलांची तोंडे धाकदपटशा करून व त्रास देऊन बंद करण्याचा पवित्रा अकबर यांनी स्पष्ट केला आहे, असेही रमाणी यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :M J Akbarएम. जे. अकबरMetoo CampaignमीटूBJPभाजपाcongressकाँग्रेस