शहरं
Join us  
Trending Stories
1
हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
3
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
4
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
5
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
6
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
7
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
8
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?
9
दूध आणायला जातो म्हणाला, १९ दिवसांनी मृतदेह सापडला; रशियात बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने राजस्थान हादरले
10
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
11
रणबीर-आलियाने धूमधडाक्यात साजरा केला राहाचा वाढदिवस, इनसाईड व्हिडीओही व्हायरल
12
गुडन्यूज! कतरिनाने दिला गोंडस बाळाला जन्म, विकी कौशलचा आनंद गगनात मावेना, म्हणाला...
13
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
14
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
15
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
16
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
17
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
18
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
19
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
20
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?

Pankaja Munde: “सामान्य माणसाला ‘अच्छे दिन’ यावे, महागाई नसावी हेच PM मोदींचे ध्येय”: पंकजा मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 12:44 IST

Pankaja Munde: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीसाठी पंकजा मुंडे दिल्लीत दाखल झाल्या होत्या.

नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने इंधनदरात (Fuel Price Hike) वाढ केली जात आहे. याशिवाय घरगुती गॅसच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. यामुळे सामान्य जनता त्रस्त झाली असून, महागाईमुळे (Inflation) खिशाला दिवसेंदिवस मोठी कात्री लागताना दिसत आहे. काँग्रेसने तर देशभरात महागाईविरोधात आंदोलने केली आहेत. यातच आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देत महागाई नसावी, हेच पंतप्रधान मोदींचे ध्येय असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीसाठी पंकजा मुंडे दिल्लीत दाखल झाल्या होत्या. या बैठकीनंतर पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध विषयांवर भाष्य केले. अंत्योदयचा संस्कार पक्षात असल्याने या बैठकीत चर्चा झाली. अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा झाली आहे असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.  

महागाई नसली पाहिजे

राष्ट्रीय सचिव म्हणून मला असे वाटते की, या महागाईवर तोडगा निघायला हवा. महागाई नसली पाहिजे. सामान्य माणसांना चांगले दिवस आले पाहिजेत, असेच पंतप्रधानांचे ध्येय आहे आणि लवकरच त्यावर तोडगा निघेल, असा विश्वास पंकडा मुंडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. तसेच निवडणुका लढण्यामागे भाजपचा एक हातखंडा आहे. मध्य प्रदेशची प्रभारी असल्याने तिथे प्रचाराला जाणार आहे, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

महाराष्ट्रातील ओबीसींमध्ये तीव्र संताप 

महाराष्ट्रात ओबीसींना मिळालेले आरक्षण हे ५० टक्क्यांपेक्षा वर जात होते. ५० टक्क्यांवरील आरक्षण रद्द होईल, अशी अपेक्षा असताना आरक्षण रद्द झाले. त्यामुळे महाराष्ट्रातील ओबीसी समाजामध्ये तीव्र संताप आहे. महाराष्ट्रात मराठा आरक्षण दिले होते ते सुद्धा रद्द झाले आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात असंतोष आहे. इतर राज्यांनी आपल्या पातळीवर निर्णय घेतले आहेत. विधानसभेच्या पातळीवर काही बदल करता येतात ते करायला हवे, अशी अपेक्षा पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. 

दुष्काळामुळे कारखान्यांना प्रचंड फटका 

राज्यामध्ये सहकार अडचणीत आहे. दुष्काळामुळे कारखान्यांना प्रचंड फटका बसत आहे. शेतकऱ्यांसाठी उस गाळप करत असताना शेतीवरील आधारीत उद्योगांना वेगळी वागणूक न देता उसाचे भाव वाढवले जातात, तशाच प्रकारे साखरेच्या, इथेनॉलच्याही भावाबाबत निर्णय घ्यायला हवा. जे कारखाने नुकसान सहन करत आहेत त्यांच्याबाबतीत भूमिका घेऊन कारखाना चालू राहायला हवा, असे सांगत काही लोकांना अशा पद्धतीने साखर उद्योगाला हाताळले आहे की, त्यात नकारात्मता झाली असेल. अनेक उद्योग अडचणीत आल्यानंतर देशातील उद्योगपती ते उद्योग हातात घेतात. त्यामुळे साखर उद्योगाकडेही त्याच दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. साखर उद्योगाचे व्याज माफ केले पाहिजे. सरकारने कर्जाची हमी घ्यायला हवी. यासाठी सरकारने पॅकेज द्यायला हवे, अशी मागणीही पंकजा मुंडे यांनी यावेळी बोलताना केली.  

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेInflationमहागाईFuel Hikeइंधन दरवाढBJPभाजपा