शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : खूप मजा आली... अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 19:02 IST

BJP on Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत बोगस मतदान झाल्याचा आरोप केला आहे.

BJP on Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी बोगस मतदान झाल्याचा आरोप केला आहे. निवडणूक प्रक्रिया आणि मतदार यादीतील अनियमिततेबाबत आयोगाव गंभीर प्रश्नही उपस्थित केले आहेत. यावरुन आता भारतीय जनता पक्षाने त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर दिले.

संबित पात्रा म्हणाले, राहुल गांधी यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दोन गोष्टी स्पष्टपणे दिसून येतात. एक- तांत्रिक आणि दुसरा- राजकीय. तांत्रिक प्रश्न निवडणूक आयोगाशी संबंधित असू शकतात, परंतु राहुल गांधींचा खरा हेतू राजकीय होता. जेव्हा राहुल गांधी जिंकतात, तेव्हा त्यांना निवडणूक आयोगात कोणतीही अनियमितता दिसत नाही. पण, जेव्हा त्यांचा पराभव होतो, तेव्हा याच संस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात.

तुम्ही जिंका तेव्हा घोटाळा नसतो, अन्...देशातील जनताही हे पाहत आहे. जेव्हा तुम्ही हिमाचल प्रदेशात जिंकता, तेव्हा तुम्ही असे म्हणत नाही की, निवडणूक आयोगाने चांगले काम केले. त्यावेळी तुम्हाला कोणताही घोटाळा दिसत नाही. तुम्ही साधे अभिनंदनही करत नाही. त्यावेळी तुम्ही तटस्थ राहता. तेलंगणात तुमचा मुख्यमंत्री निवडला जातो, भाजप हरतो. त्यावेळी राहुल गांधींनी तेलंगणात निवडणूक आयोगाने घोटाळा केल्याचे म्हटले नाही. लोकसभा निवडणुकीत तुम्हाला ९९ जागा मिळाल्यावर तुम्ही आनंद साजरा करता आणि आम्ही जिंकलो असे म्हणता. जर देशाची लोकशाही हरली असेल तर तुम्ही कशाचा आनंद साजरा करताय? असा प्रश्न पात्रा यांनी उपस्थित केला.

न्यायालयात का गेला नाही?संबित पात्रा पुढे म्हणाले, आज राहुल गांधींनी अप्रत्यक्षपणे निवडणूक आयोगाला धमकी दिली की, जर उत्तर मिळाले नाही, तर 'घातक परिणाम' भोगावे लागतील. त्यांनी असेही म्हटले की, भविष्यात जेव्हा विरोधी पक्ष सत्तेवर येईल, तेव्हा एकाही अधिकाऱ्याला सोडले जाणार नाही. ही भाषा विरोधी नेत्याची नाही, तर दबावाचे राजकारण करणाऱ्या नेत्याची आहे. राहुल गांधींकडे पुरावे होते, तर त्यांनी न्यायालयात का धाव घेतली नाही? राहुल निवडणूक आयोगात का गेले नाहीत? 

नोव्हेंबर २०२४ मध्ये राहुल गांधी यांनी महाराष्ट्र निवडणुकीबाबत आक्षेप नोंदवला होता, तेव्हा निवडणूक आयोगाने डिसेंबरमध्येच एक पत्र लिहून भेटण्याचे आवाहन केले होते. महाराष्ट्रात काँग्रेसकडे २८४२० बीएलए होते, तेव्हा त्यांनी आक्षेप का नोंदवला नाही? निवडणूक आयोगाने राहुल गांधींना आक्षेप नोंदवण्यासाठी सर्व प्रकारची सुविधा दिली होती, पण त्यांनी तसे केले नाही. आजही निवडणूक आयोगाने एक पत्र जारी केले आहे. निवडणूक आयोगाने राहुल गांधींना सांगितले की, तुम्ही सादर केलेल्या डेटाची चौकशी करण्यास आम्ही तयार आहोत, परंतु तुम्ही हे सर्व पुरावे प्रतिज्ञापत्रासह द्यावेत. यावर राहुल गांधी म्हणतात की, माझे शब्दच माझी शपथ आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयावरही प्रश्न उपस्थित केले. हे भाऊ-बहीण दोघेही हुकूमशहा आहेत, अशी घणाघाती टीकाही संबित पात्रा यांनी यावेळी केली. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगcongressकाँग्रेसBJPभाजपाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४