शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

'तरुणांनी अजून किती काळ वाट पाहावी?' सरकारी नोकरीच्या मुद्द्यावर वरुण गांधींचे केंद्रावर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2021 12:33 PM

'आधीच सरकारी नोकरी नाही, संधी आली तर पेपर फुटतो. परीक्षा दिली तर वर्षानुवर्षे निकाल लागत नाही, लागला तर एखाद्या घोटाळ्यात तो रद्द होतो.'

नवी दिल्ली: यूपीमध्ये स्पर्धा परीक्षांच्या निकालांना होणारा विलंब, परीक्षेपूर्वी होणारी पेपरफुटी यासारख्या प्रकरणांची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे. यावरुन आता पीलीभीतचे भाजप खासदार वरुण गांधी यांनी पुन्हा एकदा आपल्याच सरकारवर टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने केंद्र सरकारला घेरणाऱ्या वरुण गांधींनी यावेळी नोकरी आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरून निशाणा साधला आहे.

वरूण गांधी यांनी ट्विट केले की, 'आधीच सरकारी नोकरी नाही, संधी आली तर पेपर फुटतो. परीक्षा दिली तर वर्षानुवर्षे निकाल लागत नाही, लागला तर एखाद्या घोटाळ्यात तो रद्द होतो. रेल्वे ग्रुप डीचे 1.25 कोटी तरुण दोन वर्षांपासून निकालाची वाट पाहत आहेत. लष्करातील भरतीबाबतही असेच आहे. भारतातील तरुणांनी कधीपर्यंत धीर धरायचा?' असा प्रश्न करत वरुण यांनी सरकारवर टीका केली आहे.

यूपीटीईटी परीक्षेवरुन राज्य सरकारवर निशाणाअलीकडेच उत्तर प्रदेशात यूपीटीईटी परीक्षेचा पेपर फुटला होता. याबाबत वरुण गांधी यांनी ट्विट केले होते की, 'UPTET परीक्षेचा पेपर फुटल्याने लाखो तरुणांच्या भवितव्याशी खेळ होत आहे. या दलदलीतील लहान माशांवर कारवाई करुन चालणार नाही, त्यांचा राजकीय पोशिंदा असलेल्या शिक्षण माफियांवर सरकारने कडक कारवाई करावी.'

'बहुतांश शैक्षणिक संस्था या राजकीय नेत्यांच्या मालकीच्या असल्याने त्यांच्यावर कारवाई कधी होणार? या प्रकरणी लहान लोकांना अटक करण्याऐवजी या लज्जास्पद खेळाचे खरे खेळाडू असलेल्या शैक्षणिक संस्थांच्या माफियांवर कारवाई व्हायला हवी', अशी मागणी त्यांनी केली होती.

टॅग्स :Varun Gandhiवरूण गांधीUttar Pradeshउत्तर प्रदेशexamपरीक्षा