शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय?
3
'भारताने माझ्या आईचे प्राण वाचवले, त्यांना बांगलादेशच्या स्वाधीन करणार नाहीत'; शेख हसीना यांच्या मुलाने व्यक्त केला विश्वास
4
ICC ODI Batting Ranking : 'नवा गडी नव राज्य!' रोहित शर्माला मागे टाकत डॅरिल मिचेलनं रचला इतिहास
5
"मदरसे-मशिदीतून दहशतवादी बाहेर पडतात..."; योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान, AMU वरही उपस्थित केला सवाल
6
Jalgaon Crime: 'चोर पऱ्या' बोलला अन्...; रेल्वे रुळावर मृतदेह सापडलेल्या हर्षलची हत्याच; सगळा घटनाक्रम आला समोर
7
महागड्या क्रिम्सना बाय-बाय, Skinimalism सोपा उपाय; ३ स्टेपमध्ये मेकअपशिवाय ग्लोइंग स्किन
8
'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया
9
जगातील टॉप हाय-स्ट्रीट रँकिंगमध्ये भारताचा दबदबा! ही बाजारपेठ सर्वात महागडी, तर सर्वाधिक भाडे कुठे?
10
आता बँक FD विसरा! पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय ८.२०% पर्यंत व्याज; गॅरंटीड रिटर्नवाले प्लान्स पाहा
11
सिद्धू मूसेवाला ते बाबा सिद्दीकी हत्या अन् सलमान खान..; अनमोल बिश्नोईची संपूर्ण क्राइम कुंडली
12
Jara Hatke: सिम कार्डचे एक टोक तिरपे का असते? ९९ % लोकांना माहीत नाही कारण!
13
किमान ५ इमारतीच्या गटाचे ‘मिनी क्लस्टर’ लवकरच; मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश
14
"मला शिव्या दिल्या तर फरक नाही, पण संघावर आल्यावर मी..."; पिट्या भाईने सांगितले मनसे सोडण्याचे कारण
15
घरमालक-भाडेकरू वादावर अखेर ब्रेक! 'नवीन भाडे करार २०२५' लागू; 'हा' नियम मोडल्यास ५ हजार दंड!
16
Vastu Tips: घड्याळ दोन-तीन मिनिटं पुढे लावणे शुभ? पाहा वास्तू शास्त्र काय सांगते... 
17
धर्म आणि जातीवर ऐश्वर्या राय बच्चनचं वक्तव्य, पंतप्रधान मोदींच्या पाया पडत घेतले आशीर्वाद
18
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
19
छत्तीसगडमध्ये दोन अल्पवयीन मुलांना ATSकडून अटक; 'ब्रेनवॉश' करून ISISमध्ये सुरू होती भरती
20
स्लीपर वंदे भारत अन् बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणार? अश्विनी वैष्णव यांनी तारखाच सांगितल्या
Daily Top 2Weekly Top 5

दलितांच्या घरी जेवायला जाऊन त्यांचे प्रश्न सुटणार आहेत का? खासदाराचा भाजपाला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2018 12:41 IST

हे म्हणजे एखाद्या डॉक्टरने पोटाचा आजार असलेल्या रुग्णाला तापाचे औषध देण्यासारखे आहे, अशी टिप्पणी उदित राज यांनी केली. 

नवी दिल्ली: भाजपाचे नेते दलितांच्या घरी जेवायला गेल्यामुळे त्यांचे प्रश्न सुटणार आहेत का, असा सवाल भाजपाचे खासदार उदित राज यांनी उपस्थित केला आहे. अशा गोष्टी केल्याने दलित समाजाच्या आकांक्षा पूर्ण होणार नाहीत. दलित समाजातील तरूणांना रोजगार हवेत, त्यांच्या हक्कांचे रक्षण व्हावे, या त्यांच्या अपेक्षा आहेत. भाजपाच्या नेत्यांनी दलितांच्या घरी जेवायला किंवा राहायला जाण्याबद्दल माझा आक्षेप नाही. परंतु हे समस्येचे उत्तर आहे का? भाजपाच्या नेत्यांनी आपल्या घरी जेवायला यावे म्हणून दलित समाज भारत बंदमध्ये सहभागी झाला होता का? ते स्वत:च्या हक्कांच्या रक्षणासाठी आणि आरक्षणासाठी आंदोलन करत होते. अशा परिस्थितीत भाजपा नेत्यांनी त्यांच्या घरी जेवायला जाण्याची कृती म्हणजे एखाद्या डॉक्टरने पोटाचा आजार असलेल्या रुग्णाला तापाचे औषध देण्यासारखे आहे, अशी टिप्पणी उदित राज यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ग्राम स्वराज अभियानाचा भाग म्हणून भाजपा आमदार सुरेश राणा दलित व्यक्तीच्या घरी जेवायला गेले होते. मात्र, याठिकाणी जाताना आमदार महाशय स्वत:बरोबर हॉटेलमधील जेवण आणि भांडी घेऊन गेले होते. त्यामुळे हे सर्व काही पूर्वनियोजित आणि एकप्रकारचा दिखावा असल्याची टीका भाजपावर करण्यात आली होती.  

टॅग्स :Dalit assaultदलितांना मारहाणBJPभाजपा