नवी दिल्ली - भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी पुन्हा एकदा मुंबई आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर भाष्य केले आहे. जर बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड नसेल तर मुंबईनं काय पाहिले असते? असा सवाल दुबे यांनी उपस्थित केला. त्याशिवाय डुबे डुबे कर मारेंगे या राज ठाकरेंनी दिलेल्या धमकीनंतर मी ४ वेळा मुंबईत आल्याचा दावाही निशिकांत दुबे यांनी केला आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी म्हटलं की, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, बंगालचे लोक मुंबई, महाराष्ट्रात जातात आणि महाराष्ट्रात विशेषत: मुंबईतील लोकांना वाटते हे लोक आमचा हिस्सा घेत आहेत. बिहारी कब्जा करताहेत असं त्यांना वाटते. आम्ही या देशातले सर्वात मोठे करदाते आहोत. जर मुंबई आणि महाराष्ट्र नसेल तर कदाचित देश चालणार नाही असेच कित्येक वर्षाच्या आंदोलनाचे कारण आहे. ही लढाई आहे असं त्यांनी सांगितले. इंडिया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या वादावर भाष्य केले.
परंतु पण माझं म्हणणं आहे, जर बिहार, झारखंड, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड नसते तर मुंबईनं काय पाहिले असते? स्टेट बँक ऑफ इंडिया संपूर्ण देशातून कर गोळा करते. एलआयसी, सेबी, एनएसई कर देते. टाटाचे मुख्यालयही तिथे आहे. जर झारखंड नसते तर टाटा कधी टाटा बनले नसते. बिर्ला नसते. या देशात ४० ते ४५ टक्के कोळसा आणि खनिजे केवळ झारखंडकडे आहे. आधी बिहारकडे होतो जेव्हा एकखंड बिहार होते. आम्ही राजे आहोत असं विधान खासदार निशिकांत दुबे यांनी केले.
दरम्यान, आम्ही राजे आहोत परंतु आमचं दुर्दैव असं आहे की इथले वातावरण त्यांना सूट करत नाही. त्यामुळे सर्व लोकांनी त्यांची मुख्यालये मुंबईत बनवली आहेत आणि त्यांच्या कराच्या जोरावर तुम्ही स्वत:ला राजे समजता. या लोकशाहीत जनता राजा आहे. ते मत देतात म्हणून आम्ही निवडून येतो. गांधी-नेहरू कुटुंब राजे नाहीत. जी लढाई गांधी नेहरु कुटुंबासोबत आहे तीच भाषा मी राज ठाकरेंना वापरली अशा शब्दात भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. सोबतच राज ठाकरेंनी मला धमकी दिली त्यानंतर मी चार वेळा मुंबईत गेलो होतो. मी NCP नेत्यांनाही भेटलो असा उल्लेखही निशिकांत दुबे यांनी केला.
Web Summary : Nishikant Dubey questioned Mumbai's significance without states like Bihar. He asserted these states are major taxpayers, contributing to Mumbai's economy. Dubey criticized Raj Thackeray and defended his visits to Mumbai despite threats.
Web Summary : निशिकांत दुबे ने बिहार जैसे राज्यों के बिना मुंबई के महत्व पर सवाल उठाया। उन्होंने कहा कि ये राज्य प्रमुख करदाता हैं, जो मुंबई की अर्थव्यवस्था में योगदान करते हैं। दुबे ने राज ठाकरे की आलोचना की और धमकियों के बावजूद मुंबई की अपनी यात्राओं का बचाव किया।