शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

भाजपामध्ये आता 'काँग्रेस पॅटर्न'?; सलग पाच पराभवांनंतर रणनीतीत मोठा बदल होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 11:06 IST

भाजपा नेतृत्त्वाकडून रणनीतीत मोठा बदल होण्याची शक्यता

नवी दिल्ली/रांची: झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपाला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे हिंदी पट्ट्यातील आणखी एका राज्यातील सत्ता भाजपाला गमवावी लागली. या पराभवाची चाहूल भाजपाला लागली होती. मात्र तरीही पक्ष राज्यात सर्वाधिक जागा जिंकेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहांना होता. मात्र झारखंड मुक्ती मोर्चानं मुसंडी मारत राज्यात सर्वाधिक जागा जिंकण्याची किमया साधली. यामुळे आता भाजपाच्या केंद्रीय नेतृत्त्वाकडून मोठे बदल केले जाण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवणाऱ्या आणि २०१४ पेक्षा जास्त जागा जिंकणाऱ्या भाजपानं आता मुख्यमंत्र्यांबद्दलची रणनीती बदलण्यासंदर्भात विचार सुरू केला आहे. मुख्यमंत्र्यांना स्वातंत्र्य देण्याची भूमिका नेतृत्त्वानं घेतली होती. त्यामुळे सरकारचे निर्णय, तिकीट देण्याचे-कापण्याचे अधिकार, आघाडी करण्याचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मुख्यमंत्र्यांना देण्यात आलं. मुख्यमंत्र्यांच्या मागे ताकद उभी करण्याचं काम भाजपा नेतृत्त्वाकडून करण्यात आलं. मात्र विधानसभा निवडणुकांमध्ये होणारे पराभव पाहता या रणनीतीचा भाजपाकडून पुनर्विचार केला जाऊ शकतो. काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांकडे मर्यादित अधिकार असतात. त्यांचे बरेचसे निर्णय दिल्लीतूनच होतात. याशिवाय दिल्लीतून मुख्यमंत्र्यांवर अंकुशदेखील ठेवला जातो. मात्र भाजपाचं धोरण याच्या अगदी उलट आहे. भाजपा नेतृत्त्वानं कायम मुख्यमंत्र्यांना स्वातंत्र्य देत त्यांचं सशक्तीकरण करण्याच्या दृष्टीनं निर्णय घेतले. मात्र याचे काही प्रतिकूल परिणाम समोर येऊ लागले आहेत. कोणाचंही आव्हान नसल्यानं काही मुख्यमंत्र्यांना गची बाधा झाली. त्यामुळे पक्षाला निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे आता भाजपा नेतृत्त्वाकडून मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांना काही प्रमाणात कात्री लावली जाऊ शकते. तसं झाल्यास भाजपामध्येही काँग्रेस पॅटर्न पाहायला मिळेल.  

टॅग्स :JharkhandझारखंडBJPभाजपाcongressकाँग्रेस