शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

भाजपामध्ये आता 'काँग्रेस पॅटर्न'?; सलग पाच पराभवांनंतर रणनीतीत मोठा बदल होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 11:06 IST

भाजपा नेतृत्त्वाकडून रणनीतीत मोठा बदल होण्याची शक्यता

नवी दिल्ली/रांची: झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपाला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे हिंदी पट्ट्यातील आणखी एका राज्यातील सत्ता भाजपाला गमवावी लागली. या पराभवाची चाहूल भाजपाला लागली होती. मात्र तरीही पक्ष राज्यात सर्वाधिक जागा जिंकेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहांना होता. मात्र झारखंड मुक्ती मोर्चानं मुसंडी मारत राज्यात सर्वाधिक जागा जिंकण्याची किमया साधली. यामुळे आता भाजपाच्या केंद्रीय नेतृत्त्वाकडून मोठे बदल केले जाण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवणाऱ्या आणि २०१४ पेक्षा जास्त जागा जिंकणाऱ्या भाजपानं आता मुख्यमंत्र्यांबद्दलची रणनीती बदलण्यासंदर्भात विचार सुरू केला आहे. मुख्यमंत्र्यांना स्वातंत्र्य देण्याची भूमिका नेतृत्त्वानं घेतली होती. त्यामुळे सरकारचे निर्णय, तिकीट देण्याचे-कापण्याचे अधिकार, आघाडी करण्याचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मुख्यमंत्र्यांना देण्यात आलं. मुख्यमंत्र्यांच्या मागे ताकद उभी करण्याचं काम भाजपा नेतृत्त्वाकडून करण्यात आलं. मात्र विधानसभा निवडणुकांमध्ये होणारे पराभव पाहता या रणनीतीचा भाजपाकडून पुनर्विचार केला जाऊ शकतो. काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांकडे मर्यादित अधिकार असतात. त्यांचे बरेचसे निर्णय दिल्लीतूनच होतात. याशिवाय दिल्लीतून मुख्यमंत्र्यांवर अंकुशदेखील ठेवला जातो. मात्र भाजपाचं धोरण याच्या अगदी उलट आहे. भाजपा नेतृत्त्वानं कायम मुख्यमंत्र्यांना स्वातंत्र्य देत त्यांचं सशक्तीकरण करण्याच्या दृष्टीनं निर्णय घेतले. मात्र याचे काही प्रतिकूल परिणाम समोर येऊ लागले आहेत. कोणाचंही आव्हान नसल्यानं काही मुख्यमंत्र्यांना गची बाधा झाली. त्यामुळे पक्षाला निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे आता भाजपा नेतृत्त्वाकडून मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांना काही प्रमाणात कात्री लावली जाऊ शकते. तसं झाल्यास भाजपामध्येही काँग्रेस पॅटर्न पाहायला मिळेल.  

टॅग्स :JharkhandझारखंडBJPभाजपाcongressकाँग्रेस