शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
2
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
6
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
7
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
8
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
9
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
10
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
12
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
13
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
14
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
15
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
16
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
17
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

होय, RSS च्या शाखेत जायचो; आता जय श्रीरामही बोलायला लागलो : शुभेंदु अधिकारी

By जयदीप दाभोळकर | Published: January 03, 2021 10:29 AM

काही दिवसांपूर्वी अधिकारी यांनी केला होता भाजपामध्ये प्रवेश, लोकांना बदल हवा असल्याचं केलं वक्तव्य

ठळक मुद्देपश्चिम बंगालमधील लोकांना बदल हवा असल्याचं अधिकारी यांचं वक्तव्ययेत्या काळात टीएमसीमधील अनेक नेते भाजपामध्ये प्रवेश करतील, अधिकारी यांची माहिती

येत्या काही दिवासांमध्ये पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. एकीकडे राज्यात सत्ता कायम राखण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस हा पक्ष सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे भाजपानंही या निवडणुकांमध्ये स्वत:ला झोकून दिलं आहे. तसंच आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला नक्कीच विजय मिळेल असा विश्वासही अनेक नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. अशातच काही दिवसापूर्वी तृणमूल काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेल्या शुभेंदु अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधला. भाजपाशी आपण सुरूवातीपासून जोडले गेलेलो होतो अशी आठवण सांगणताना आपण लहानपणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जात असल्याचं अधिकारी म्हणाले."शालेय दिवसांमध्ये मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये जात होतो. मी कधीच अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाचा भाग नव्हतो. मी व्यक्तीगतरित्या तृणमूल काँग्रेसमध्येही याविरोधात आवाज उठवला. मी गायत्री मंत्राचा जप करतो. मी कधी कोणत्या राजकीय मंचावर जय श्रीराम म्हटलं नाही, परंतु आता मी ते म्हणतोय. मी घरातून कपाळावर टिळा लावून बाहेर पडत नाही. परंतु लोकं माझ्या कपाळी टिळा लावतात. मंदिरात जाण्यात काय चुकीचं आहे? मी कार्यकर्ता असल्याच्या नात्यानं भाजपाच्या धोरणांचं पालन करत आहे," असं शुभेंदु अधिकारी यावेळी म्हणाले. त्यांनी आजतकला दिलेल्या विशेष मुलाखतीत यावर भाष्य केलं. "पश्चिम बंगालच्या जनतेला आता बदल हवा आहे आणि या ठिकाणी भाजपाचं सरकार बनणार आहे. बंगालची जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी मतदान करतील," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तृणमूल काँग्रेस एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे आणि ममता बॅनर्जी त्याच्या चेअरपर्सन. अभिषेक बॅनर्जी हे त्याचे व्यवस्थापकीय संचालक आहे. ममता बॅनर्जी यांनी अभिषेक बॅनर्जी यांचं स्थान पक्क करण्यासाठी आपल्या पक्षातील नेत्यांकडेही दुर्लक्ष केल्याचा आरोप अधिकारी यांनी केला.टीएमसीचे अनेक नेते प्रवेश करतील"मी बूथ पातळीवर काम करणार आहे. टीएमसीला बूथ स्तरावर एकही कार्यकर्ता मिळणार नाही हेदेखील मी पाहिन. दररोज कोणी ना कोणी भाजपामध्ये सामील होईल यावर मी जास्त लक्ष देणार आहे. मी पक्षासाठी एक कार्यकर्ता म्हणून काम करेन. येत्या काळात टीएमसीचे अनेक नेते भाजपामध्ये प्रवेश करतील. ही तर फक्त सुरूवात आहे," असंही त्यांनी नमूद केलं. बदलांची मागणी"पश्चिम बंगालचा विकासाच्या मुद्द्यावर माझी भाजपासोबत डील झाली आहे. पुढील मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवण्यासाठी राष्ट्रीय नेतृत्व आहे. बंगालची लोकं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी मतदान करतील. आता बंगालमध्ये बदलांची मागणी होत आहे. गेल्या १० वर्षांमध्ये या ठिकाणी काहीही बदललं नाही. अनेक नेत्यांनी भाजपासोबत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ज्यांना लोकांसाठी काम करायचं आहे त्यांनी भाजपासोबत जोडलं गेलं पाहिजे," असंही शुभेंदु अधिकारी यांनी स्पष्ट केलं. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाNarendra Modiनरेंद्र मोदीElectionनिवडणूक