शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

“देशाच्या लष्कराचा अपमान करू नका..,” सर्जिकल स्ट्राईकवरील प्रश्नांवर प्रसाद यांचे काँग्रेसला खडेबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 14:04 IST

“ते सर्जिकल स्ट्राईकबद्दल बोलत आहेत, पण त्यांनी कोणतेही पुरावे दिले नाहीत,” असं वक्तव्य दिग्विजय सिंह यांनी केलं होतं.

“काँग्रेस पक्ष वारंवार सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे,” अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी दिली. “हे तेच दिग्विजय सिंह आहेत, ज्यांनी बाटला हाऊस एन्काऊंटरवर प्रश्न उपस्थित केले होते. माझा राहुल गांधींना प्रश्न आहे, तुमच्यासोबत जे लोक आहेत… ते देश तोडण्याचा प्रयत्न करतायत आणि तुम्ही शांत आहात? नेत्यांच्या अशा वक्तव्यानं दहशतवाद्यांचं मनोबल वाढतं याचं विचार कधी तुम्ही केलाय का? ही भारत जोडो यात्रा आहे की भारत तोडो?” असं म्हणत रविशंकर प्रसाद यांनी खडेबोल सुनावले.

“हे अत्यंत लज्जास्पद आणि दुर्दैवी आहे. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना माफी मागावी लागेल. ही पुरावा गँग देशाला तोडण्याचं काम करतेय आणि या नेत्यांना काँग्रेस पक्षातील बड्या नेत्यांचा पाठिंबा आहे. दिग्विजय सिंह हे काही सामान्य नेते नाहीत, ते दहा वर्षे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत, सरचिटणीस होते. देशाच्या सैन्याचा अपमान करू नका,” असे रविशंकर प्रसाद म्हणाले.

दिग्विजय सिंह यांनी उपस्थित केले होते प्रश्नकाँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी सोमवारी सर्जिकल स्ट्राईकवर पुन्हा प्रश्न उपस्थित केले होते. तसंच सरकार खोटं बोलत असल्याचा आरोपही केला होता. जम्मू आणि काश्मीरमधील 'भारत जोडो यात्रे' दरम्यान एका जाहीर सभेला संबोधित करताना सिंह यांनी आरोप केला की, “सरकारने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) कर्मचाऱ्यांना श्रीनगरहून दिल्लीला एअरलिफ्ट करण्याची (CRPF) विनंती मान्य केली नाही आणि २०१९ मध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० जवानांना बलिदान द्यावे लागले.”

“ते सर्जिकल स्ट्राईकबद्दल बोलतात. ते अनेकांना मारल्याबद्दल बोलतात पण त्यांनी कोणताही पुरावा दिलेला नाही. ते खोट्या गोष्टींच्या सहाय्यानं राज्य करत आहेत,” असंही ते म्हणाले होते.

टॅग्स :Digvijaya Singhदिग्विजय सिंहRavi Shankar Prasadरविशंकर प्रसादRahul Gandhiराहुल गांधी