शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

“देशाच्या लष्कराचा अपमान करू नका..,” सर्जिकल स्ट्राईकवरील प्रश्नांवर प्रसाद यांचे काँग्रेसला खडेबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 14:04 IST

“ते सर्जिकल स्ट्राईकबद्दल बोलत आहेत, पण त्यांनी कोणतेही पुरावे दिले नाहीत,” असं वक्तव्य दिग्विजय सिंह यांनी केलं होतं.

“काँग्रेस पक्ष वारंवार सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे,” अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी दिली. “हे तेच दिग्विजय सिंह आहेत, ज्यांनी बाटला हाऊस एन्काऊंटरवर प्रश्न उपस्थित केले होते. माझा राहुल गांधींना प्रश्न आहे, तुमच्यासोबत जे लोक आहेत… ते देश तोडण्याचा प्रयत्न करतायत आणि तुम्ही शांत आहात? नेत्यांच्या अशा वक्तव्यानं दहशतवाद्यांचं मनोबल वाढतं याचं विचार कधी तुम्ही केलाय का? ही भारत जोडो यात्रा आहे की भारत तोडो?” असं म्हणत रविशंकर प्रसाद यांनी खडेबोल सुनावले.

“हे अत्यंत लज्जास्पद आणि दुर्दैवी आहे. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना माफी मागावी लागेल. ही पुरावा गँग देशाला तोडण्याचं काम करतेय आणि या नेत्यांना काँग्रेस पक्षातील बड्या नेत्यांचा पाठिंबा आहे. दिग्विजय सिंह हे काही सामान्य नेते नाहीत, ते दहा वर्षे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत, सरचिटणीस होते. देशाच्या सैन्याचा अपमान करू नका,” असे रविशंकर प्रसाद म्हणाले.

दिग्विजय सिंह यांनी उपस्थित केले होते प्रश्नकाँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी सोमवारी सर्जिकल स्ट्राईकवर पुन्हा प्रश्न उपस्थित केले होते. तसंच सरकार खोटं बोलत असल्याचा आरोपही केला होता. जम्मू आणि काश्मीरमधील 'भारत जोडो यात्रे' दरम्यान एका जाहीर सभेला संबोधित करताना सिंह यांनी आरोप केला की, “सरकारने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) कर्मचाऱ्यांना श्रीनगरहून दिल्लीला एअरलिफ्ट करण्याची (CRPF) विनंती मान्य केली नाही आणि २०१९ मध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० जवानांना बलिदान द्यावे लागले.”

“ते सर्जिकल स्ट्राईकबद्दल बोलतात. ते अनेकांना मारल्याबद्दल बोलतात पण त्यांनी कोणताही पुरावा दिलेला नाही. ते खोट्या गोष्टींच्या सहाय्यानं राज्य करत आहेत,” असंही ते म्हणाले होते.

टॅग्स :Digvijaya Singhदिग्विजय सिंहRavi Shankar Prasadरविशंकर प्रसादRahul Gandhiराहुल गांधी