शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
4
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
5
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
6
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
7
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
8
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
9
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
10
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
11
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
12
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
13
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
14
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
15
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
16
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
17
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
18
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
19
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
20
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यावर सरकारचा पलटवार; केंद्रीय मंत्री म्हणाले 'कुंदबुद्धी' पप्पू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 13:25 IST

भाजपच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधींवर पलटवार केला आहे. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी तर थेट राहुल गांधी यांच्या बुद्धीवरच प्रश्न उपस्थित करत पलटवार केला आहे. 

नवी दिल्ली - चीनबरोबर झालेल्या समेटावर राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर मोठा आरोप केला आहे. यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधींवर (Rahul Gandhi) पलटवार केला आहे. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी (Mukhtar Abbas Naqvi) यांनी तर थेट राहुल गांधी यांच्या बुद्धीवरच प्रश्न उपस्थित करत पलटवार केला आहे. (BJP leader Mukhtar Abbas Naqvi targeted Rahul Gandhi comment over agreement with china)

राहुल गांधी यांनी भारत-चीन डिसएंगेजमेन्टवर दिलेल्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटले आहे, "कुंदबुद्धी पप्पू जींच्या कमालीचा कुठलाही रस्ता नाही. दुसरीकडून सुपारी घेऊन देशाला बदनाम करण्याचे षड्यंत्र आणि संरक्षण दलाचे मनोबल तोडण्याच्या प्रयत्नात लागले आहेत. त्यावर काही उपचार नाही."

“पंतप्रधान नरेंद्र मोदी डरपोक, चीनसमोर झुकले; भारताच्या पवित्र जमिनीचा काही भाग ड्रॅगनच्या ताब्यात”

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताची जमीण चीनला का दिली? यावर गृह राज्य मंत्री किशन रेड्डी म्हणाले. 'जमीण कुणी दिली हे राहुल गांधींच्या अजोबांना विचारा. डरपोक कोण आहे, देशभक्त कोण आहे. देशतील जनतेला सर्व माहित आहे.'

"राहुल गांधी चीनचे अघोषित प्रवक्ता " -भाजप खासदार राकेश सिन्हा यांनीही राहुल गांधींवर पलटवार केला आहे. सिन्हा म्हणाले, 'राहुल गांधींची पातळी खाली घसरत चालली आहे. जर पंतप्रधान डरपोक आहेत, तर मग जवाहरलाल नेहरू कसे होते. डरपोक कोण आहे, 1962 मध्ये नेहरूंनी 38 हजार किमी जमीन दिली होती. राहुल गांधी चीनचे अघोषित प्रवक्ते झाले आहेत. सभागृहात संरक्षण मंत्र्यांचे भाषणही व्यवस्थित ऐकत नाहीत.'

राहुल गांधींच्या ‘हम दो, हमारे दो’ वक्तव्यावर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा पलटवार; भरसभागृहात म्हणाले...

काय म्हणाले राहूल गांधी - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी सकाळी पत्रकार परिषद घेत भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. भारतचीन सीमावादावरून केंद्र सरकारला टार्गेट करत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी डरपोक आहेत, त्यांनी देशाची पवित्र जमीन चीनला सोपवली असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, गुरुवारी संरक्षणमंत्र्यांनी त्यांचे म्हणणं संसदेत मांडले, यातील काही गोष्टी साफ झाल्या पाहिजेत, एप्रिलपूर्वी परिस्थिती सर्वसामान्य होईल असं सांगितलं जात होतं, परंतु आता संरक्षण मंत्र्यानी विधान केले आहे. भारताची जमीन फिंगर ४ पर्यंत होती, पण सरकारने आता फिंगर ३ वर सहमती का दिली? पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांनी भारताची जमीन चीनला का दिली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस