शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

'पोहे खाण्याच्या पद्धतीवरून बांगलादेशींना ओळखलं', भाजपा नेत्याचं अजब विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 13:47 IST

पोहे खाण्याच्या पद्धतीवरून बांगलादेशींना ओळखल्याचा अजब दावा भाजपा नेत्याने केला आहे.

ठळक मुद्देपोहे खाण्याच्या पद्धतीवरून बांगलादेशींना ओळखलं असा दावा कैलाश विजयवर्गीय यांनी केला.'पोहे खाण्याच्या पद्धतीवरून मी बांगलादेशी मजुरांना ओळखलं' असं एका सभेत म्हटलं.'घुसखोर देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहेत'

इंदूर - नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) या मुद्द्यांवरून सध्या देशातील राजकीय वातावरण तापले आहे. भाजपाचे महासचिव आणि पश्चिम बंगालमधील पार्टीचे प्रदेशाध्यक्ष कैलाश विजयवर्गीय यांनी पुन्हा एकदा अजब विधान केलं आहे. पोहे खाण्याच्या पद्धतीवरून बांगलादेशींना ओळखलं असा दावा कैलाश विजयवर्गीय यांनी केला आहे. 'पोहे खाण्याच्या पद्धतीवरून मी बांगलादेशी मजुरांना ओळखलं' असं विजयवर्गीय यांनी एका सभेत म्हटलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (23 जानेवारी) इंदूरमध्ये एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सभेला संबोधित करताना भाजपाचे नेते कैलाश विजयवर्गीय यांनी पोहे खाण्याच्या पद्धतीवरून बांगलादेशी मजुरांना ओळखल्याचा अजब दावा केला आहे. 'काही दिवसांपूर्वी माझ्या घरातली एक खोली दुरुस्त करून घेतली. त्यावेळी कामावर असलेले मजूर पोहे खात होते. त्यांची खाण्याची पद्धत मला थोडी विचित्र वाटली. त्यामुळे कंत्राटदाराकडे ते मजूर बांगलादेशी आहेत का? याची चौकशी केली. त्या मजुरांनाही हाच प्रश्न विचारला. त्यानंतर ते कामावर आलेच नाहीत' असं विजयवर्गीय यांनी म्हटलं आहे. 

कैलाश विजयवर्गीय यांनी  'या प्रकरणी मी अद्याप पोलिसांकडे कोणतीही तक्रार केलेली नाही. लोकांना जागरूक करण्यासाठी मी हे सांगत आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. नागरिकत्व कायदा देशाच्या भल्यासाठीच आहे. घुसखोर देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहेत' असं देखील म्हटलं आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची एकजूट होत आहे. सीएए आणि एनआरसीच्या विरोधात ठिकठिकाणी विरोधी पक्षांकडून आंदोलने करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपाकडून सीएए आणि एनआरसीच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

विजयवर्गीय यांनी काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमधील अधिकाऱ्यांना धमकी दिली होती. 'आमचे सरकार आल्यानंतर आम्ही अधिकाऱ्यांना कोंबडा बनवू. ज्यांना कोंबडा बनवायचा आहे, अशा सर्व अधिकाऱ्यांची आम्ही यादी तयार केली आहे. तसेच, सरकारी अधिकाऱ्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिल्यास आम्ही शांत बसणार नाही. आम्ही सुद्धा बांगड्या घातल्या नाहीत. आम्ही इमानदारीने काम करत आहोत, याचा अर्थ असा नाही की आम्हाला मर्यादा तोडता येत नाहीत' असं कैलाश विजयवर्गीय यांना एका जनसमुदायाला संबोधित करताना म्हटलं होतं. 

महत्त्वाच्या बातम्या 

Maharashtra Bandh Live: वंचित आघाडीच्या मोर्चावर पोलिसांचा लाठीहल्ला; अमरावतीत प्रचंड तणाव  

Ind vs NZ, 1st T20 Live : न्यूझीलंड ३ बाद ११७, ग्रँडहोम आऊट

'मोटा भाई-छोटा भाईच्या तोंडी हिटलरची भाषा', मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

'कानाला आताच त्रास होतो आहे का?'; मशिदीवरील भोंगे हटविण्यावरुन राज ठाकरेंवर निशाणा

उद्धव ठाकरे, शरद पवार, संजय राऊत यांचे फोन टॅपिंग प्रकरणी सरकारकडून चौकशीचे आदेश

 

टॅग्स :BJPभाजपा