शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
2
बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
3
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
4
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
5
अभिमानास्पद! PM मोदींनी पुतिन यांना दिली अत्यंत खास भेट; जगात लाखो लोकांना आजही प्रेरणादायी
6
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
7
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
8
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
9
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
10
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
11
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
12
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
13
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
14
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
15
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
16
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
17
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
18
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
19
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
20
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
Daily Top 2Weekly Top 5

विजय गोयल 'ऑड' मार्गाने; सम-विषमला भाजपाचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 09:59 IST

भाजपाचे राज्यसभा खासदार विजय गोयल यांनी केजरीवाल सरकारच्या निषेधार्थ सोमवारी 'इव्हन डे' ला 'ऑड' क्रमांकाच्या वाहनाने प्रवास केला आहे.

ठळक मुद्देविजय गोयल यांनी केजरीवाल सरकारच्या निषेधार्थ सोमवारी 'इव्हन डे' ला 'ऑड' क्रमांकाच्या वाहनाने प्रवास केला.सम-विषम हा केजरीवाल सरकारचा निवडणूक स्टंट असल्याचा आरोप गोयल यांनी केला.गोयल यांना जनपथला रोखून वाहतूक पोलिसांनी चार हजार रुपयांची पावती फाडली.

नवी दिल्ली - भाजपाचे राज्यसभा खासदार विजय गोयल यांनी केजरीवाल सरकारच्या निषेधार्थ सोमवारी (4 नोव्हेंबर) 'इव्हन डे' ला 'ऑड' क्रमांकाच्या वाहनाने प्रवास केला आहे. मात्र या दरम्यान वाहतूक पोलिसांनी त्यांचे 4 हजार रुपयांची पावती फाडली आहे. गोयल यांचा ऑड मार्गावरील प्रवास पाहण्यासाठी लोकांनी गर्द केली होती. सम-विषम हा केजरीवाल सरकारचा निवडणूक स्टंट असल्याचा आरोप विजय गोयल यांनी केला आहे. गोयल यांच्या एसयूव्ही कारमध्ये भाजपाचे उपाध्यक्ष श्याम जाजू आणि इतर नेतेही होते.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक मार्गावरील निवासस्थानावरून गोयल निघाले व त्यांना जनपथला रोखून वाहतूक पोलिसांनी चार हजार रुपयांची पावती फाडली. 'प्रदूषण की जिम्मेदार केजरीवाल सरकार... ऑड-इव्हन हे बेकार' असा नारा विजय गोयल यांच्या कारवर लिहिलेला होता. विशेष म्हणजे त्यानंतर दिल्लीचे परिवहन मंत्री कैलाश गहलोत यांनी गोयल यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ दिले व नियमांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. 

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी प्रदूषणापासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी दिल्लीकरांना गाजर खाण्याचा सल्ला दिला आहे. त्यासह मंत्र्यांनी इतरही काही टिप्स दिल्या आहेत. गाजरासह प्रदूषणरोधक फळं खाण्याचा सल्ला दिला आहे. दिल्ली-एनसीआर भागामध्ये सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने आणीबाणीची परिस्थिती असल्याचे पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळाने (ईपीसीए) जाहीर केले. या भागामध्ये 5 नोव्हेंबरपर्यंत कोणतेही बांधकाम करण्यास ईपीसीएने मनाई केली आहे. तसेच प्रदूषण आणि खराब हवामानामुळे दोन दिवस नोएडातील शाळा बंद ठेवण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने दिला आहे. प्रदूषणाने कमाल पातळीही ओलांडली असून, नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. प्रदूषणावर उपाययोजना करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. अशातच भाजपाच्या एका मंत्र्यांनी अजब विधान केलं आहे.

दिल्ली आणि आसपासच्या राज्यांतील प्रदूषणावर भाजपाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे राज्यमंत्री सुनील भराला यांनी अजब उपाय सुचवला आहे. प्रदूषणावर तोडगा काढण्यासाठी इंद्रदेवाला खूश करा आणि यज्ञ करा, ते सगळं काही ठीक करतील, असा उपाय भराला यांनी सांगितला आहे. 'प्रदूषणाच्या समस्येला 'पराली'ला जबाबदार ठरवणं म्हणजे हा थेट शेतकऱ्यांवरच हल्ला आहे. ऊस आणि डाळींचं उत्पादन घेतल्यानंतर शेतात कचरा होतो. शेतकरी ते पेटवून देतात. त्यामुळे धूर होतो. मात्र यामुळे प्रदूषण होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना जबाबदार धरू नये' असं सुनील भराला यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :delhi pollutionदिल्ली प्रदूषणpollutionप्रदूषणArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाcarकारdelhiदिल्लीair pollutionवायू प्रदूषण