शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
9
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
10
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
11
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
12
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
13
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
14
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
15
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
16
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
17
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
18
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
19
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
20
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा

विजय गोयल 'ऑड' मार्गाने; सम-विषमला भाजपाचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 09:59 IST

भाजपाचे राज्यसभा खासदार विजय गोयल यांनी केजरीवाल सरकारच्या निषेधार्थ सोमवारी 'इव्हन डे' ला 'ऑड' क्रमांकाच्या वाहनाने प्रवास केला आहे.

ठळक मुद्देविजय गोयल यांनी केजरीवाल सरकारच्या निषेधार्थ सोमवारी 'इव्हन डे' ला 'ऑड' क्रमांकाच्या वाहनाने प्रवास केला.सम-विषम हा केजरीवाल सरकारचा निवडणूक स्टंट असल्याचा आरोप गोयल यांनी केला.गोयल यांना जनपथला रोखून वाहतूक पोलिसांनी चार हजार रुपयांची पावती फाडली.

नवी दिल्ली - भाजपाचे राज्यसभा खासदार विजय गोयल यांनी केजरीवाल सरकारच्या निषेधार्थ सोमवारी (4 नोव्हेंबर) 'इव्हन डे' ला 'ऑड' क्रमांकाच्या वाहनाने प्रवास केला आहे. मात्र या दरम्यान वाहतूक पोलिसांनी त्यांचे 4 हजार रुपयांची पावती फाडली आहे. गोयल यांचा ऑड मार्गावरील प्रवास पाहण्यासाठी लोकांनी गर्द केली होती. सम-विषम हा केजरीवाल सरकारचा निवडणूक स्टंट असल्याचा आरोप विजय गोयल यांनी केला आहे. गोयल यांच्या एसयूव्ही कारमध्ये भाजपाचे उपाध्यक्ष श्याम जाजू आणि इतर नेतेही होते.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक मार्गावरील निवासस्थानावरून गोयल निघाले व त्यांना जनपथला रोखून वाहतूक पोलिसांनी चार हजार रुपयांची पावती फाडली. 'प्रदूषण की जिम्मेदार केजरीवाल सरकार... ऑड-इव्हन हे बेकार' असा नारा विजय गोयल यांच्या कारवर लिहिलेला होता. विशेष म्हणजे त्यानंतर दिल्लीचे परिवहन मंत्री कैलाश गहलोत यांनी गोयल यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ दिले व नियमांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. 

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी प्रदूषणापासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी दिल्लीकरांना गाजर खाण्याचा सल्ला दिला आहे. त्यासह मंत्र्यांनी इतरही काही टिप्स दिल्या आहेत. गाजरासह प्रदूषणरोधक फळं खाण्याचा सल्ला दिला आहे. दिल्ली-एनसीआर भागामध्ये सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने आणीबाणीची परिस्थिती असल्याचे पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळाने (ईपीसीए) जाहीर केले. या भागामध्ये 5 नोव्हेंबरपर्यंत कोणतेही बांधकाम करण्यास ईपीसीएने मनाई केली आहे. तसेच प्रदूषण आणि खराब हवामानामुळे दोन दिवस नोएडातील शाळा बंद ठेवण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने दिला आहे. प्रदूषणाने कमाल पातळीही ओलांडली असून, नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. प्रदूषणावर उपाययोजना करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. अशातच भाजपाच्या एका मंत्र्यांनी अजब विधान केलं आहे.

दिल्ली आणि आसपासच्या राज्यांतील प्रदूषणावर भाजपाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे राज्यमंत्री सुनील भराला यांनी अजब उपाय सुचवला आहे. प्रदूषणावर तोडगा काढण्यासाठी इंद्रदेवाला खूश करा आणि यज्ञ करा, ते सगळं काही ठीक करतील, असा उपाय भराला यांनी सांगितला आहे. 'प्रदूषणाच्या समस्येला 'पराली'ला जबाबदार ठरवणं म्हणजे हा थेट शेतकऱ्यांवरच हल्ला आहे. ऊस आणि डाळींचं उत्पादन घेतल्यानंतर शेतात कचरा होतो. शेतकरी ते पेटवून देतात. त्यामुळे धूर होतो. मात्र यामुळे प्रदूषण होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना जबाबदार धरू नये' असं सुनील भराला यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :delhi pollutionदिल्ली प्रदूषणpollutionप्रदूषणArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाcarकारdelhiदिल्लीair pollutionवायू प्रदूषण