शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

विजय गोयल 'ऑड' मार्गाने; सम-विषमला भाजपाचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 09:59 IST

भाजपाचे राज्यसभा खासदार विजय गोयल यांनी केजरीवाल सरकारच्या निषेधार्थ सोमवारी 'इव्हन डे' ला 'ऑड' क्रमांकाच्या वाहनाने प्रवास केला आहे.

ठळक मुद्देविजय गोयल यांनी केजरीवाल सरकारच्या निषेधार्थ सोमवारी 'इव्हन डे' ला 'ऑड' क्रमांकाच्या वाहनाने प्रवास केला.सम-विषम हा केजरीवाल सरकारचा निवडणूक स्टंट असल्याचा आरोप गोयल यांनी केला.गोयल यांना जनपथला रोखून वाहतूक पोलिसांनी चार हजार रुपयांची पावती फाडली.

नवी दिल्ली - भाजपाचे राज्यसभा खासदार विजय गोयल यांनी केजरीवाल सरकारच्या निषेधार्थ सोमवारी (4 नोव्हेंबर) 'इव्हन डे' ला 'ऑड' क्रमांकाच्या वाहनाने प्रवास केला आहे. मात्र या दरम्यान वाहतूक पोलिसांनी त्यांचे 4 हजार रुपयांची पावती फाडली आहे. गोयल यांचा ऑड मार्गावरील प्रवास पाहण्यासाठी लोकांनी गर्द केली होती. सम-विषम हा केजरीवाल सरकारचा निवडणूक स्टंट असल्याचा आरोप विजय गोयल यांनी केला आहे. गोयल यांच्या एसयूव्ही कारमध्ये भाजपाचे उपाध्यक्ष श्याम जाजू आणि इतर नेतेही होते.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक मार्गावरील निवासस्थानावरून गोयल निघाले व त्यांना जनपथला रोखून वाहतूक पोलिसांनी चार हजार रुपयांची पावती फाडली. 'प्रदूषण की जिम्मेदार केजरीवाल सरकार... ऑड-इव्हन हे बेकार' असा नारा विजय गोयल यांच्या कारवर लिहिलेला होता. विशेष म्हणजे त्यानंतर दिल्लीचे परिवहन मंत्री कैलाश गहलोत यांनी गोयल यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ दिले व नियमांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. 

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी प्रदूषणापासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी दिल्लीकरांना गाजर खाण्याचा सल्ला दिला आहे. त्यासह मंत्र्यांनी इतरही काही टिप्स दिल्या आहेत. गाजरासह प्रदूषणरोधक फळं खाण्याचा सल्ला दिला आहे. दिल्ली-एनसीआर भागामध्ये सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने आणीबाणीची परिस्थिती असल्याचे पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळाने (ईपीसीए) जाहीर केले. या भागामध्ये 5 नोव्हेंबरपर्यंत कोणतेही बांधकाम करण्यास ईपीसीएने मनाई केली आहे. तसेच प्रदूषण आणि खराब हवामानामुळे दोन दिवस नोएडातील शाळा बंद ठेवण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने दिला आहे. प्रदूषणाने कमाल पातळीही ओलांडली असून, नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. प्रदूषणावर उपाययोजना करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. अशातच भाजपाच्या एका मंत्र्यांनी अजब विधान केलं आहे.

दिल्ली आणि आसपासच्या राज्यांतील प्रदूषणावर भाजपाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे राज्यमंत्री सुनील भराला यांनी अजब उपाय सुचवला आहे. प्रदूषणावर तोडगा काढण्यासाठी इंद्रदेवाला खूश करा आणि यज्ञ करा, ते सगळं काही ठीक करतील, असा उपाय भराला यांनी सांगितला आहे. 'प्रदूषणाच्या समस्येला 'पराली'ला जबाबदार ठरवणं म्हणजे हा थेट शेतकऱ्यांवरच हल्ला आहे. ऊस आणि डाळींचं उत्पादन घेतल्यानंतर शेतात कचरा होतो. शेतकरी ते पेटवून देतात. त्यामुळे धूर होतो. मात्र यामुळे प्रदूषण होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना जबाबदार धरू नये' असं सुनील भराला यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :delhi pollutionदिल्ली प्रदूषणpollutionप्रदूषणArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाcarकारdelhiदिल्लीair pollutionवायू प्रदूषण