शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
4
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
5
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
7
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
8
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
9
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
10
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
11
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
12
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
13
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
14
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
15
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
16
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
17
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
18
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
19
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
20
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
Daily Top 2Weekly Top 5

जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 23:37 IST

BJP Replied Rahul Gandhi On Caste Based Census Decision: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाच्या नेत्या तसेच माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचे दाखले देत भाजपाने काँग्रेसवर टीका केली आहे.

BJP Replied Rahul Gandhi On Caste Based Census Decision: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत केंद्रातील मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. देशात जातिनिहाय जनगणना करण्याची घोषणा मोदी सरकारने केली. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेससह अनेक पक्षांनी या निर्णयाचे स्वागत केले असले तरी यावर प्रतिक्रिया देताना नेत्यांनी केंद्र सरकारवर टीका केल्याचे पाहायला मिळत आहे. राहुल गांधी यांनीही यावर स्पष्ट भूमिका मांडली. यानंतर आता या निर्णयावरून श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचे दिसत आहे. 

सरकारच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मात्र आमच्या काही मागण्या आहेत. त्यापैकी प्रमुख मागणी म्हणजे सरकारने आम्हाला तारीख सांगावी. जातिनिहाय जनगणना कधी सुरू करणार व अंतिम अहवाल कधी सादर करणार याची तारीख आम्हाला सांगायला हवी. सरकारने जातिनिहाय जनगणनेला उशीर केला असला तरी हे काम आता तातडीने व्हायला हवे. या उशिरा सुचलेल्या शहाणपणाचे आम्ही स्वागत करतो. सरकारने आमचे स्वप्न निवडले हे एक चांगलं काम केले आहे. आता त्यांनी आम्हाला तारखा सांगाव्यात, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. यानंतर आता भाजपा नेते अमित मालवीय यांनी एक्सवर पोस्ट करून काही उदाहरणे दाखवत राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले आहे.

गांधी कुटुंब मागासवर्गीय समुदायातील लोकांना विरोध करते 

भाजपा नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांनी सन २०१० मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री दिवंगत प्रणव मुखर्जी यांना लिहिलेले एक पत्र अमित मालवीय यांनी एक्सवर शेअर केले आहे. हे पत्र शेअर करताना लिहिलेल्या पोस्टमध्ये अमित मालवीय म्हणतात की, ऑगस्ट २०१० च्या एका पत्रावरून असे दिसून येते की भाजपाने विरोधी पक्षात असताना जातीय गणनेला मान्यता दिली होती. परंतु, काँग्रेसने ती पूर्ण करण्यात अपयशी ठरले. मुळात गांधी कुटुंब मागासवर्गीय समुदायातील लोकांना विरोध करते.

दरम्यान, आणखी एका पोस्टमध्ये अमित मालवीय म्हणतात की, राहुल गांधी यांनी सरकारने घेतलेल्या जातिनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे श्रेय घेणे थांबवावे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यापूर्वीच १८ सप्टेंबर २०२४ रोजी ही घोषणा लवकरच होणार असल्याबद्दल सूचित केले होते. २०११ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने सामाजिक-आर्थिक आणि जातीय जनगणना सुरू केली, ज्यामध्ये जातीय घटकाचा समावेश होता- १९३१ नंतर करण्यात आलेला हा पहिलाच असा प्रयत्न होता. विसंगती आणि वर्गीकरणाच्या मुद्द्यांचा हवाला देऊन काँग्रेस जातीचा डेटा जाहीर करण्यात अपयशी ठरली. भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी खरोखरच सामाजिक न्यायाचे पालन करत असून, हे पाऊल योग्य दिशेने टाकलेले आहे.

टॅग्स :BJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकार