शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
2
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
3
‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान; गणबोटे कुटुंबाने मानले मोदींचे आभार 
4
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
5
Operation Sindoor : अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
6
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
7
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!
8
पीएम किसानचा २०वा हप्ता कधी येणार? तुमचं नाव यादीत आहे का? मोबाईलवरुनही तपासू शकता
9
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
10
'ऑपरेशन सिंदूर' हेच नाव का ठेवले गेले? काय आहे भारतीय संस्कृतीत सिंदूरचे महत्त्व? वाचा!
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
13
आजोबा, वडील एक्स आर्मी, पतीही...! कोण आहेत 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देणाऱ्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी
14
Operation Sindoor: नऊ ठिकाणं... ९० दहशतवाद्यांचा खात्मा; भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे कंबरडेच मोडले!
15
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
16
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
17
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
18
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
19
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
20
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...

भाजपाच्या केवळ ४० जागा घटवायच्या, मग मोदींचा पराभव निश्चित, नितीश कुमारांनी आखली खास रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 18:10 IST

Nitish Kumar Vs BJP: भाजपाविरोधी पक्ष एकत्र आले तर भाजपाला २०२४ मध्ये पराभूत करता येईल, असा दावा नितीश कुमार वारंवार करत आहेत. दरम्यान, भाजपा आणि मोदींना सत्तेतून खाली खेचण्यासाठी नितीश कुमार यांनी खास रणनीती आखली आहे.

 २०२४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांकडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. दरम्यान, विरोधी ऐक्यामध्ये मैलाचा दगड ठरणारी भाजपाविरोधी पक्षांची २३ जूनला होणारी बैठक देशाच्या राजकारणावर मोठा प्रभाव टाकणार आहे. नितीश कुमार यांच्या पुढाकाराने होणाऱ्या या बैठकीमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह विरोधी पक्षांमधील अनेक बडे नेते सहभागी होणार आहेत. भाजपाविरोधी पक्ष एकत्र आले तर भाजपाला २०२४ मध्ये पराभूत करता येईल, असा दावा नितीश कुमार वारंवार करत आहेत. दरम्यान, भाजपा आणि मोदींना सत्तेतून खाली खेचण्यासाठी नितीश कुमार यांनी खास रणनीती आखली आहे.

२३ जून रोजी होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीसाठी नितीश कुमार यांचा मार्ग तितकासा सोपा नव्हता. नितीश कुमार यांनी विरोधी ऐक्यासाठी पुढाकार घेण्यास सुरुवात केली होती. तेव्हा जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांनी भाजपाला पराभूत करता येऊ शकते. त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागणार नाहीत. भाजपाच्या केवळ ४० जागा कमी करायच्या. म्हणजे भाजपा अल्पमतात जाईल. बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपाच्या जागा घटू शकतात, असा दावा त्यांनी केला.

ललन सिंह म्हणाले की, भाजपाने लोकसभा निवडणुकीत विजय  मिळवला आहे. तसेच काही राज्यांमध्ये भाजपाने कमाल जागा जिंकलेल्या आहेत. यापेक्षा अधिक जागा ते जिंकू शकत नाहीत. आता त्यांच्या जागांमध्ये घट निश्चित आहे. २०२० च्या विधानसभा निवडणुकीत जेडीयूच्या जागांमध्ये मोठी घट झाली होती. त्यामुळे नितीश कुमार यांना मोठा धक्का बसला होता. तेव्हापासून जेडीयूमध्ये अस्वस्थता आहे.

मात्र भाजपासोबत असलेलं नातं तोडल्यापासून नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा भाजपाला मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तसेच त्यासाठा आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांना देशातील अनेक राज्यांमध्ये पाठवून भाजपाविरोधी वातावरण बनवण्यासाठी आणि विविध नेत्यांशी चर्चा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. ललन सिंह यांनी सुरुवात केली. तर त्यानंतर नितीश कुमार यांनी देशभरात दौरे करून भाजपाविरोधात मोठा गट तयार करण्याची मोर्चेबांधणी सुरू केली. आता २३ जून रोजी विरोधी ऐक्याला दिशा मिळण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी