शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या केवळ ४० जागा घटवायच्या, मग मोदींचा पराभव निश्चित, नितीश कुमारांनी आखली खास रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 18:10 IST

Nitish Kumar Vs BJP: भाजपाविरोधी पक्ष एकत्र आले तर भाजपाला २०२४ मध्ये पराभूत करता येईल, असा दावा नितीश कुमार वारंवार करत आहेत. दरम्यान, भाजपा आणि मोदींना सत्तेतून खाली खेचण्यासाठी नितीश कुमार यांनी खास रणनीती आखली आहे.

 २०२४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांकडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. दरम्यान, विरोधी ऐक्यामध्ये मैलाचा दगड ठरणारी भाजपाविरोधी पक्षांची २३ जूनला होणारी बैठक देशाच्या राजकारणावर मोठा प्रभाव टाकणार आहे. नितीश कुमार यांच्या पुढाकाराने होणाऱ्या या बैठकीमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह विरोधी पक्षांमधील अनेक बडे नेते सहभागी होणार आहेत. भाजपाविरोधी पक्ष एकत्र आले तर भाजपाला २०२४ मध्ये पराभूत करता येईल, असा दावा नितीश कुमार वारंवार करत आहेत. दरम्यान, भाजपा आणि मोदींना सत्तेतून खाली खेचण्यासाठी नितीश कुमार यांनी खास रणनीती आखली आहे.

२३ जून रोजी होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीसाठी नितीश कुमार यांचा मार्ग तितकासा सोपा नव्हता. नितीश कुमार यांनी विरोधी ऐक्यासाठी पुढाकार घेण्यास सुरुवात केली होती. तेव्हा जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांनी भाजपाला पराभूत करता येऊ शकते. त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागणार नाहीत. भाजपाच्या केवळ ४० जागा कमी करायच्या. म्हणजे भाजपा अल्पमतात जाईल. बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपाच्या जागा घटू शकतात, असा दावा त्यांनी केला.

ललन सिंह म्हणाले की, भाजपाने लोकसभा निवडणुकीत विजय  मिळवला आहे. तसेच काही राज्यांमध्ये भाजपाने कमाल जागा जिंकलेल्या आहेत. यापेक्षा अधिक जागा ते जिंकू शकत नाहीत. आता त्यांच्या जागांमध्ये घट निश्चित आहे. २०२० च्या विधानसभा निवडणुकीत जेडीयूच्या जागांमध्ये मोठी घट झाली होती. त्यामुळे नितीश कुमार यांना मोठा धक्का बसला होता. तेव्हापासून जेडीयूमध्ये अस्वस्थता आहे.

मात्र भाजपासोबत असलेलं नातं तोडल्यापासून नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा भाजपाला मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तसेच त्यासाठा आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांना देशातील अनेक राज्यांमध्ये पाठवून भाजपाविरोधी वातावरण बनवण्यासाठी आणि विविध नेत्यांशी चर्चा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. ललन सिंह यांनी सुरुवात केली. तर त्यानंतर नितीश कुमार यांनी देशभरात दौरे करून भाजपाविरोधात मोठा गट तयार करण्याची मोर्चेबांधणी सुरू केली. आता २३ जून रोजी विरोधी ऐक्याला दिशा मिळण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी