शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

'श्रीमंत मित्रांना फायदा व्हावा यासाठी भाजपा सर्वसामान्य माणसांचे खिसे कापतंय'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2019 12:11 PM

मागील १५ दिवसांपूर्वी व्होडाफोन-आयडिया आणि भारती एअरटेल या दूरसंचार कंपन्यांनी पुढील महिन्यापासून प्री-पेड व पोस्ट-पेड सेवांसाठी दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली - गेल्या काही महिन्यांपासून एमटीएनएल आणि बीएसएनएल या सरकारी दूरसंचार कंपन्या तोट्यात सुरु आहेत. त्यामुळे अलीकडेच या दोन्ही कंपन्यांचं विलीनीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने केला आहे. मात्र भाजपाच्या गेल्या ६ वर्षाच्या कारकिर्दीत मोबाईल इंटरनेट आणि कॉल दर स्वस्त होतील असा दावा केला जात होता. पण त्यांनी MTNL आणि BSNL या कंपन्यांना कमकुवत केल्याचा आरोप काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केला आहे. 

तसेच याबाबत प्रियंका गांधींनी ट्विट करुन म्हटलंय की, मोबाईल इंटरनेट आणि कॉल दर स्वस्त होतील असं आश्वासन भाजपाने गेल्या ६ वर्षात दिलं. पण त्या आश्वासनाची हवा निघाली आहे. भाजपाने एमटीएनएल आणि बीएसएनएल या कंपन्यांना कमकुवत करुन इतर कंपन्यांसाठी कॉल दर आणि डेटा महाग करण्यासाठी मार्ग मोकळा करुन दिला. किंबहुना भाजपाने आपल्या श्रीमंत मित्रांना फायदा पोहचविण्यासाठी वारंवार जनतेचे खिसे कापण्याचं काम सुरु आहे अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे. 

मागील १५ दिवसांपूर्वी व्होडाफोन-आयडिया आणि भारती एअरटेल या दूरसंचार कंपन्यांनी पुढील महिन्यापासून प्री-पेड व पोस्ट-पेड सेवांसाठी दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या पाठोपाठ देशातील सगळ्यात मोठी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओनेही आपले दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कोट्यवधी ग्राहकांना याचा फटका बसणार आहे. प्रचंड तोटा, करांची थकबाकी व वाढते कर्ज यामुळे हैराण झाल्याचा या कंपन्यांचे म्हणणं आहे. 

जुलै-सप्टेंबर या तिमाहीत व्होडाफोन-आयडिया आणि भारती एअरटेल या दोन्ही कंपन्यांना विक्रमी तोटा झाला. दोन्ही कंपन्यांचा एकत्रित तोटा ७४ हजार कोटी आहे. कंपन्या सुरू ठेवायच्या असतील, तर दरवाढ अटळ आहे. दरवाढीमुळे नेटवर्क आणि तंत्रज्ञान विस्तारात गुंतवणूक करणेही त्यांना शक्य होईल.

सरकारी मालकीच्या कंपन्या असलेल्या एमटीएनएल, बीएसएनएल आर्थिक संकटात आहेत. त्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी दूरसंचार विभागानं अर्थ मंत्रालयाकडे ७४ हजार कोटींची मागणी केली होती. या दोन्ही कंपन्यांवर सध्या ९५ हजार कोटींचा अर्थभार आहे. या दोन्ही कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांची संख्या १.६५ लाखांपेक्षा जास्त आहे. बीएसएनएल व एमटीएनएल विलिनीकरणाचा निर्णय केंद्र सरकारने याआधीच घेतला आहे. हे विलिनीकरण झाल्यानंतर नव्या कंपनीस ६९ हजार कोटी रुपयांचे पॅकेज मिळणार असल्याचे सरकारनेच जाहीर केले आहे. मात्र या कंपन्या आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठराव्यात, यासाठी कर्मचारी कपात करण्यात यावी, अशी अट केंद्र सरकारने घातली होती. त्यानंतर बीएसएनएल व एमटीएनएलने स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर केली. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीBJPभाजपाMTNLएमटीएनएलBSNLबीएसएनएल