शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

'श्रीमंत मित्रांना फायदा व्हावा यासाठी भाजपा सर्वसामान्य माणसांचे खिसे कापतंय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 12:30 IST

मागील १५ दिवसांपूर्वी व्होडाफोन-आयडिया आणि भारती एअरटेल या दूरसंचार कंपन्यांनी पुढील महिन्यापासून प्री-पेड व पोस्ट-पेड सेवांसाठी दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली - गेल्या काही महिन्यांपासून एमटीएनएल आणि बीएसएनएल या सरकारी दूरसंचार कंपन्या तोट्यात सुरु आहेत. त्यामुळे अलीकडेच या दोन्ही कंपन्यांचं विलीनीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने केला आहे. मात्र भाजपाच्या गेल्या ६ वर्षाच्या कारकिर्दीत मोबाईल इंटरनेट आणि कॉल दर स्वस्त होतील असा दावा केला जात होता. पण त्यांनी MTNL आणि BSNL या कंपन्यांना कमकुवत केल्याचा आरोप काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केला आहे. 

तसेच याबाबत प्रियंका गांधींनी ट्विट करुन म्हटलंय की, मोबाईल इंटरनेट आणि कॉल दर स्वस्त होतील असं आश्वासन भाजपाने गेल्या ६ वर्षात दिलं. पण त्या आश्वासनाची हवा निघाली आहे. भाजपाने एमटीएनएल आणि बीएसएनएल या कंपन्यांना कमकुवत करुन इतर कंपन्यांसाठी कॉल दर आणि डेटा महाग करण्यासाठी मार्ग मोकळा करुन दिला. किंबहुना भाजपाने आपल्या श्रीमंत मित्रांना फायदा पोहचविण्यासाठी वारंवार जनतेचे खिसे कापण्याचं काम सुरु आहे अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे. 

मागील १५ दिवसांपूर्वी व्होडाफोन-आयडिया आणि भारती एअरटेल या दूरसंचार कंपन्यांनी पुढील महिन्यापासून प्री-पेड व पोस्ट-पेड सेवांसाठी दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या पाठोपाठ देशातील सगळ्यात मोठी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओनेही आपले दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कोट्यवधी ग्राहकांना याचा फटका बसणार आहे. प्रचंड तोटा, करांची थकबाकी व वाढते कर्ज यामुळे हैराण झाल्याचा या कंपन्यांचे म्हणणं आहे. 

जुलै-सप्टेंबर या तिमाहीत व्होडाफोन-आयडिया आणि भारती एअरटेल या दोन्ही कंपन्यांना विक्रमी तोटा झाला. दोन्ही कंपन्यांचा एकत्रित तोटा ७४ हजार कोटी आहे. कंपन्या सुरू ठेवायच्या असतील, तर दरवाढ अटळ आहे. दरवाढीमुळे नेटवर्क आणि तंत्रज्ञान विस्तारात गुंतवणूक करणेही त्यांना शक्य होईल.

सरकारी मालकीच्या कंपन्या असलेल्या एमटीएनएल, बीएसएनएल आर्थिक संकटात आहेत. त्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी दूरसंचार विभागानं अर्थ मंत्रालयाकडे ७४ हजार कोटींची मागणी केली होती. या दोन्ही कंपन्यांवर सध्या ९५ हजार कोटींचा अर्थभार आहे. या दोन्ही कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांची संख्या १.६५ लाखांपेक्षा जास्त आहे. बीएसएनएल व एमटीएनएल विलिनीकरणाचा निर्णय केंद्र सरकारने याआधीच घेतला आहे. हे विलिनीकरण झाल्यानंतर नव्या कंपनीस ६९ हजार कोटी रुपयांचे पॅकेज मिळणार असल्याचे सरकारनेच जाहीर केले आहे. मात्र या कंपन्या आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठराव्यात, यासाठी कर्मचारी कपात करण्यात यावी, अशी अट केंद्र सरकारने घातली होती. त्यानंतर बीएसएनएल व एमटीएनएलने स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर केली. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीBJPभाजपाMTNLएमटीएनएलBSNLबीएसएनएल