बेळगावात भाजपने इतिहास बदलला, भाजपलाच का मिळाली सत्ता?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 10:07 AM2021-09-07T10:07:12+5:302021-09-07T10:07:36+5:30

महापालिका निवडणुकीत ३५ जागा जिंकून स्पष्ट बहुमत : महाराष्ट्र एकीकरण समितीला केवळ चार जागा : काँग्रेसला १० ठिकाणी यश

BJP changed history in Belgaum, why did BJP get power? | बेळगावात भाजपने इतिहास बदलला, भाजपलाच का मिळाली सत्ता?

बेळगावात भाजपने इतिहास बदलला, भाजपलाच का मिळाली सत्ता?

Next
ठळक मुद्देमहापालिकेसाठी शुक्रवारी मतदान झाले होते.  मतमोजणी सोमवारी कॅम्प येथील बी. के. मॉडेल हायस्कूल येथे कडक पोलीस बंदोबस्तात  पार पडली.

प्रकाश बिळगोजी
लोकमत न्यूज नेटवर्क
बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या निवडणुकीत  ५८ पैकी ३५ जागा जिंकत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय मिळविला आहे. यामुळे प्रथमच बेळगावचा महापौर हा एखाद्या राष्ट्रीय पक्षाचा असणार आहे. काँग्रेस आणि महाराष्ट्र एकीकरण समितीसह अन्य पक्षांना अनुक्रमे १० व १३ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

महापालिकेसाठी शुक्रवारी मतदान झाले होते.  मतमोजणी सोमवारी कॅम्प येथील बी. के. मॉडेल हायस्कूल येथे कडक पोलीस बंदोबस्तात 
पार पडली. मतमोजणीत धक्कादायक निकाल समोर आले. महापालिकेवर यापूर्वी सातत्याने वर्चस्व राखणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीला अवघ्या चार जागा जिंकता आल्या.  काँग्रेसला १० जागांवर विजय मिळाला. ८ अपक्ष उमेदवार निवडून आले, तर एमआयएमने एक जागा जिंकून चंचूप्रवेश केला.
महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे रवी साळुंके, बसवराज मोदगेकर, वैशाली भातकांडे, शिवाजी मंडोळकर हे उमेदवार विजयी झाले असले 
तरी मराठी भाषिक ज्योती कडोलकर या काँग्रेसतर्फे विजयी झाल्या आहेत. याव्यतिरिक्त पूजा पाटील आणि शंकर पाटील या अपक्ष उमेदवारांनी प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले आहे.

पक्षीय चिन्हावर प्रथमच निवडणूक
यापूर्वी बेळगाव महापालिका निवडणूक भाषिक मुद्यांवर लढविली जात होती. मात्र, यावेळी भाजप, काँग्रेस, निजद, आम आदमी, एमआयएम आदी राजकीय पक्ष निवडणूक रिंगणात उतरल्याने पक्षांच्या चिन्हांवर ही निवडणूक लढविली आणि त्यामध्ये भाजपची सरशी झाली.

महापालिकेत ५५ नवे चेहरे
 केवळ तीन माजी नगरसेवकांना मतदारांनी पुन्हा संधी दिली असून, तब्बल  ५५ नव्या चेहऱ्यांना निवडून दिले आहे. यातील बहुतांश नगरसेवक तरुण आहेत. विशेष म्हणजे विजयी उमेदवारांमध्ये २२ मराठी आणि १४ मुस्लीम उमेदवार निवडून आले आहेत. भाजपच्या विजयी उमेदवारांमध्ये १५ मराठी भाषिक आहेत.

का मिळालीभाजपला सत्ता?
 आरक्षणाबरोबरच अवैज्ञानिक प्रभाग पुनर्रचनेचा फायदा भाजपला मिळाला आहे. लोकसभा निवडणूक, तसेच अन्य राष्ट्रीय मुद्यांवर हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याच्या बेळगावसह सीमा भागातील मराठी भाषिक जनतेच्या मनोवृत्तीचाही लाभ भाजपला मिळाला आहे.

Web Title: BJP changed history in Belgaum, why did BJP get power?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.