शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

कोरोनाचा धोका! भाजपनं रद्द केली आपली 75000KM ची यात्रा, आता राहुल गांधी थांबणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 18:18 IST

खरे तर, भारतीय जनता पक्षाने राजस्थानातील अशोक गेहलोत सरकारविरोधात जन आक्रोश यात्रा सुरू केली होती. मात्र आता ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी 1 डिसेंबरपासून या यात्रेची सुरुवात केली होती. ही यात्रा 75000 किलोमीटरपर्यंत चालणार होती. 

जगभरात पुन्हा एकदा फोफावत चाललेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपली जन आक्रोश यात्रा स्थगित करण्याची घोषणा केली आहे. पक्षाचे सरचिटणीस आणि राजस्थानचे प्रभारी अरुण सिंह यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, भाजपने राजस्थानमध्ये सुरू असलेली जनआक्रोश यात्रा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक सुरक्षा अधिक महत्त्वाची आहे. याचवेळी त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधताना, राहुल गांधींनीही यासंदर्भात विचार करायला हवा. किमान कोरोनासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन तरी करायला हवे, असेही त्यांनी म्हटले आहे.

खरे तर, भारतीय जनता पक्षाने राजस्थानातील अशोक गेहलोत सरकारविरोधात जन आक्रोश यात्रा सुरू केली होती. मात्र आता ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी 1 डिसेंबरपासून या यात्रेची सुरुवात केली होती. ही यात्रा 75000 किलोमीटरपर्यंत चालणार होती. 

अरुण सिंह म्हणाले, “भाजपसाठी आधी देश आणि जनता आहे, त्यानंतर राजकारण. आमच्यासाठी जनतेची सुरक्षितता आणि त्यांचे आरोग्य अधिक महत्वाचे आहे.” अरुण सिंह यांनी भारत जोडो यात्रा स्थगित न गेल्याने, काँग्रेसवर निशाणा साधत, काँग्रेस राजकीय फायद्यासाठी जनतेच्या जीवाशी खेळत असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही, तर राहुल गांधींची भारत जोडो यात्रा फ्लॉप शो असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

मांडविया यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनाही कोरोनाच्या धोक्यासंदर्भात पत्र लिहून भारत जोडो यात्रा थांबवण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यांच्या पत्रावर काँग्रेस नेते पवन खेडा यांनी, भाजपच्या यात्रेत लोक सहभागी होत नसल्याचे आपण पाहत आहोत, लोकही भाजपच्या यात्रेत उत्साह दाखवत नाहीत, असे भाष्य केले होते. यामुळे आता राहुल गांधी त्यांची यात्रा थांबवणार का, हे पाहावे लागेल.

 

टॅग्स :J P Naddaजगत प्रकाश नड्डाBJPभाजपाRajasthanराजस्थानcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा