शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
5
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
6
रक्षा बंधन २०२५: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
7
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
8
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
9
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
10
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
11
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
12
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
13
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
14
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
15
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
16
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
18
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
19
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
20
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान

कोरोनाचा धोका! भाजपनं रद्द केली आपली 75000KM ची यात्रा, आता राहुल गांधी थांबणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 18:18 IST

खरे तर, भारतीय जनता पक्षाने राजस्थानातील अशोक गेहलोत सरकारविरोधात जन आक्रोश यात्रा सुरू केली होती. मात्र आता ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी 1 डिसेंबरपासून या यात्रेची सुरुवात केली होती. ही यात्रा 75000 किलोमीटरपर्यंत चालणार होती. 

जगभरात पुन्हा एकदा फोफावत चाललेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपली जन आक्रोश यात्रा स्थगित करण्याची घोषणा केली आहे. पक्षाचे सरचिटणीस आणि राजस्थानचे प्रभारी अरुण सिंह यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, भाजपने राजस्थानमध्ये सुरू असलेली जनआक्रोश यात्रा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक सुरक्षा अधिक महत्त्वाची आहे. याचवेळी त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधताना, राहुल गांधींनीही यासंदर्भात विचार करायला हवा. किमान कोरोनासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन तरी करायला हवे, असेही त्यांनी म्हटले आहे.

खरे तर, भारतीय जनता पक्षाने राजस्थानातील अशोक गेहलोत सरकारविरोधात जन आक्रोश यात्रा सुरू केली होती. मात्र आता ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी 1 डिसेंबरपासून या यात्रेची सुरुवात केली होती. ही यात्रा 75000 किलोमीटरपर्यंत चालणार होती. 

अरुण सिंह म्हणाले, “भाजपसाठी आधी देश आणि जनता आहे, त्यानंतर राजकारण. आमच्यासाठी जनतेची सुरक्षितता आणि त्यांचे आरोग्य अधिक महत्वाचे आहे.” अरुण सिंह यांनी भारत जोडो यात्रा स्थगित न गेल्याने, काँग्रेसवर निशाणा साधत, काँग्रेस राजकीय फायद्यासाठी जनतेच्या जीवाशी खेळत असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही, तर राहुल गांधींची भारत जोडो यात्रा फ्लॉप शो असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

मांडविया यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनाही कोरोनाच्या धोक्यासंदर्भात पत्र लिहून भारत जोडो यात्रा थांबवण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यांच्या पत्रावर काँग्रेस नेते पवन खेडा यांनी, भाजपच्या यात्रेत लोक सहभागी होत नसल्याचे आपण पाहत आहोत, लोकही भाजपच्या यात्रेत उत्साह दाखवत नाहीत, असे भाष्य केले होते. यामुळे आता राहुल गांधी त्यांची यात्रा थांबवणार का, हे पाहावे लागेल.

 

टॅग्स :J P Naddaजगत प्रकाश नड्डाBJPभाजपाRajasthanराजस्थानcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा