शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Live : महायुती की मविआ.... कोण मारणार बाजी?; लवकरच मतमोजणीला सुरुवात
2
Lok Sabha Election Result 2024 : एनडीए की इंडिया? जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतील लोकसभा निवडणुकीचा आज निकाल
3
Maharashtra Lok Sabha election results 2024: महायुती की महाआघाडी? कमळ-धनुष्य-घड्याळ की पंजा-मशाल-तुतारी?; आज कौल
4
कसा ठरतो लोकसभेचा विजयी उमेदवार? कशी होते मतमोजणी?
5
खासदारांच्या स्वागतासाठी दिल्लीत धावपळ सुरू, लोकसभा सचिवालयाची जोरदार तयारी
6
७ वर्षांनी ‘या’ ग्रहाचे गोचर: ७ राशींना अनुकूल, अचानक मोठा फायदा-प्रगती; उत्पन्नात वाढ, लाभ!
7
मध्य रेल्वेची वाहतूक रखडली, परळ रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाड
8
फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट, विधानपरिषद निवडणुकीबाबत चर्चा
9
उद्धव ठाकरेंविरुद्धच्या तक्रारीवर कार्यवाही करा, केंद्रीय निवडणूक आयाेगाचे निर्देश
10
अरुण गवळीच्या मुदतपूर्व सुटकेला अखेर स्थगिती, राज्य सरकारने दिले होते आव्हान
11
लोकसभेच्या निकालाआधीच पवारांकडून विधानसभेची तयारी सुरू?; भाजपच्या माजी आमदाराने घेतली भेट
12
देशात इंडिया आघाडीचे सरकार येईल? काँग्रेसचे 'चाणक्य' डीके शिवकुमार यांनी केली ही भविष्यवाणी
13
चोराचा अजब कारनामा; चोरी करायला घरात शिरला अन् AC च्या थंडाव्यात झोपी गेला, सकाळी...
14
"मोदींची ध्यानधारणा हीदेखील 'मूक पत्रकार परिषद'च होती"; संजय राऊतांचा आयोगावर पलटवार
15
कशी होते मतांची मोजणी? EVM-VVPAT स्लिप्सचे काय होते? जाणून घ्या संपूर्ण ABCD...
16
पुलवामामध्ये मोठी चकमक; टॉप कमांडर रियाझ अहमद डारसह आणखी एकाला कंठस्थान
17
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा Exit Poll आला; इंडिया आघाडीला किती जागा मिळणार, पाहा...
18
कार जाऊ द्या, आता बाईकमध्येही आली 'एअरबॅग'; होंडाच्या या दुचाकीचा किंमत किती माहित्येय?
19
मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर काहीतरी भव्य दिव्य होणार; 10 हजार पाहुणे, स्थळ अन् तारीखही ठरली...
20
आरोग्यासाठी फायदेशीर असणारं लिंबू पाणी नेमकं कधी प्यावं?; जाणून घ्या, योग्य वेळ

'WHO चा ‘डेटा’ आणि काँग्रेसचा ‘बेटा’ दोन्हीही चूक', कोरोना मृतांच्या अहवालावरून भाजपचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2022 6:38 PM

WHO ने गुरुवारी जारी केलेल्या अहवालात, कोरोना व्हायरसमुळे भारतात 47 लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. हा आकडा भारताच्या अधिकृत आकडेवारीच्या तुलनेत 10 पट अधिक आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी हे कोरोना व्हायरसमुळे झालेल्या मृत्यूंवर राजकारण करत आहेत, असा  आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. यासंदर्भात बोलताना, जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जाहीर केलेला ‘डेटा’ आणि काँग्रेसचा ‘बेटा’ दोन्ही चुकीचे असल्याचे भाजपने म्हटले आहे. 

यासंदर्भात, पक्षाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भाजप प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, भारतात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंसंदर्भात डब्ल्यूएचओने जाहीर केलेली आकडेवारी चुकीची आहे. भारत सरकारने याबाबत डब्ल्यूएचओकडे आक्षेपही नोंदवला आहे. एवढेच नाही, तर डब्ल्यूएचओने जारी केलेल्या आकडेवारीवरून संपूर्ण जगात भारतासंदर्भात भ्रामक स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.

भाजपचा राहुल गांधींवर निशाणा -पात्रा म्हणाले, राहुल गांधी सातत्याने भारताचा कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका करत वारंवार भारताचा कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मृत्यू आणि जन्मासंदर्भातील आंकडेवारीची नोंद ठेवण्यासाठी भारताकडे एक चांगल्या प्रकारची प्रणाली आहे.

WHO ने गुरुवारी जारी केलेल्या अहवालात, कोरोना व्हायरसमुळे भारतात 47 लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. हा आकडा भारताच्या अधिकृत आकडेवारीच्या तुलनेत 10 पट अधिक आहे. भारत सरकारने WHO च्या या आकडेवारीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहेत. पात्रा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने ज्या प्रकारे कोरोनाचा सामना केला, ते अद्भुत आणि अद्वितीय होते. एवढेच नाही, तर ते संपूर्ण जगासाठी एक उदाहरण होते, असे संपूर्ण जग मानते. असे असताना मृत्यूच्या आकड्यांवर राजकारण करणे ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSambit Patraसंबित पात्राBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना