शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

'...तर हिंदूंसाठी एकही देश शिल्लक राहणार नाही'; मुस्लीम लोकसंख्या वाढीवरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 18:18 IST

या अहवालावरून आता भाजपने काँग्रेसवर थेट निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या हाती देश दिला, तर हिंदूंसाठी एकही देश शिल्लक राहणार नाही, असे भाजपने म्हटले आहे.

संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यातच, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचा (EAC-PM) एक अहवाल समोर आला आहे. यात, गेल्या 65 वर्षांत हिंदूंची लोकसंख्या जवळपास आठ टक्क्यांनी घटल्याचे म्हण्यात आले आहे. या अहवालावरून आता भाजपने काँग्रेसवर थेट निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या हाती देश दिला, तर हिंदूंसाठी एकही देश शिल्लक राहणार नाही, असे भाजपने म्हटले आहे.

भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी एक रिपोर्ट शेअर करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ''1950 ते 2015 दरम्यान हिंदूंचा वाटा 7.8% ने कमी झाला. तर मुस्लीम लोकसंख्या 43% ने वाढली. काँग्रेसच्या अनेक दशकांच्या राजवटीत  आपल्यासोबत हेच केले. जर हा देश त्यांच्यासाठी सोडला, तर हिंदूंसाठी एकही देश उरणार नाही.''

केशव प्रसाद मौर्य यांचा निशाणा -उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही वाढती मुस्लीम लोकसंख्या चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, “काँग्रेसच्या मुस्लीम तुष्टीकरणामुळे हे घडले आहे. ते मुस्लीम लीगप्रमाणे वागले आणि त्यामुळेच देशाने हा असमतोल पाहिला. यामुळे समान नागरी संहितेची (UCC) आवश्यकता आहे. या अहवालानुसार, 65 वर्षांत देशातील हिंदू लोकसंख्या 7.8 टक्क्यांनी घटली आहे. तर मुस्लीम लोकसंख्या 43 टक्क्यांनी वाढली आहे. हा काँग्रेसच्या चुकीच्या धोरणाचा परिणाम आहे.''

अहवालात काय? -इंग्रजी वेबसाइट हिन्दुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने (ईएसी-पीएम) देशातील हिंदू आणि मुस्लीम लोकसंख्येशी संबंधित रिपोर्ट अथवा अहवाल शेअर केला आहे. यात, 1950 ते 2015 दरम्यान गेल्या 65 वर्षांत हिंदूंची लोकसंख्या जवळपास आठ टक्क्यांनी घटली असून मुस्लीम लोकसंख्या वाढली असल्याचे, म्हणण्यात आले आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabhaलोकसभाElectionनिवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसHinduहिंदूMuslimमुस्लीम