शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
3
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
4
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
6
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
7
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
8
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
9
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
10
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
11
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
12
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
13
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
14
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
15
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
16
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
17
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
18
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
19
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

देशातील २० राज्यांमध्ये भाजप सत्तेत; ६७ टक्के जनतेवर NDAचं राज्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2018 16:51 IST

ईशान्य भारतातील त्रिपुरा आणि नागालँड या दोन राज्यांमध्ये आज 'कमळ' फुललं आहे. गेली २५ वर्षं डाव्यांचा गड असलेल्या त्रिपुरात भाजपनं मुसंडी मारलीय.

नवी दिल्लीः ईशान्य भारतातील त्रिपुरा आणि नागालँड या दोन राज्यांमध्ये आज 'कमळ' फुललं आहे. गेली २५ वर्षं डाव्यांचा गड असलेल्या त्रिपुरात भाजपनं मुसंडी मारलीय. गेल्या निवडणुकीत एकही जागा जिंकू न शकलेल्या भाजपनं तिथे स्पष्ट बहुमत मिळवून माणिक सरकार यांचं सरकार खालसा केलंय, तर नागालँडमध्ये नव्या मित्राला सोबत घेऊन जुन्या मित्राला - नागा पीपल्स फ्रंटला धूळ चारली. त्यामुळे 'सेव्हन सिस्टर्स'पैकी पाच राज्यांत आता भाजपचा झेंडा फडकतोय. मेघालयमध्येही काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं नसल्यानं त्यांनी सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केल्यात, पण आत्तातरी ईशान्येतील पाच राज्यं धरून देशातील एकूण २० राज्यांमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सत्तेत आहे. काँग्रेसप्रणित यूपीएकडे फक्त पाच राज्य उरली आहेत. याचाच अर्थ, देशातील ६७.८५ टक्के जनतेवर एनडीएचं राज्य आहे. 

भाजपकडील २० राज्यं

उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेश, झारखंड, आसाम, हरियाणा, छत्तीसगड, जम्मू, काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, नागालँड आणि त्रिपुरा.

काँग्रेसची सत्ता असलेली पाच राज्यं

कर्नाटक, पंजाब, मेघालय, मिझोरम, पाँडेचरी

अन्य पक्षांचा 'षटकार'

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, ओडिशा, तेलंगण, केरळ, दिल्ली.

काँग्रेसची सत्ता ज्या राज्यांमध्ये आहे, तिथे देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ७.७८ टक्के जनता राहते. एनडीएची सत्ता असलेल्या २० राज्यांमधील लोकसंख्येचा विचार केल्यास, ६७.८५ टक्के जनतेचे ते राजे आहेत. तर उर्वरित २४ टक्के जनतेवर तृणमूल, अण्णा द्रमुक, बीजू जनता दल, टीआरएस, डावे आणि आम आदमी पार्टी यांचं राज्य आहे. 

टॅग्स :Northeast Election Results 2018ईशान्य भारत निवडणूक निकाल 2018Nagaland Election Results 2018नागालँड निवडणूक निकाल 2018Tripura Election Results 2018त्रिपुरा निवडणूक निकाल 2018Meghalaya Election Results 2018मेघालय निवडणूक निकाल 2018