शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बिर्ला कुटुंबीयांना अमेरिकेत हॉटेलातून काढले बाहेर, परराष्ट्र मंत्रालयाने घेतली दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2020 07:05 IST

Ananya Birla News : कुमारमंगलम यांच्या पत्नी नीरजा, क्रिकेटपटू मुलगा आर्यमन आणि अनन्या  या तिघांनाही या रेस्टॉरंटने जेवणासाठी तब्बत तीन तास तिष्टत ठेवले. अनन्या हिने या घटनेबाबत सांगताना दोन ट्वीट केले आहेत.

नवी दिल्ली : देशातील आघाडीचे उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला यांची कन्या आणि गायिका अनन्या हिने त्यांच्या कुटुंबाला अमेरिकेत वर्णद्वेषी वागणूक देण्यात आल्याचा आरोप ट्वीटद्वारे केला आहे. वॉशिंग्टन येथील स्कोपा इटालियन रूटस्‌ या प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये २४ ऑक्टोबर रोजी बिर्ला कुटुंब भोजनासाठी गेले असता हा प्रकार घडल्याचे तिने म्हटले  आहे. या घटनेचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर विदेश मंत्रालयाने त्याची गंभीर दखल घेतली आहे.कुमारमंगलम यांच्या पत्नी नीरजा, क्रिकेटपटू मुलगा आर्यमन आणि अनन्या  या तिघांनाही या रेस्टॉरंटने जेवणासाठी तब्बत तीन तास तिष्टत ठेवले. अनन्या हिने या घटनेबाबत सांगताना दोन ट्वीट केले आहेत. विशेष म्हणजे, ट्वीटमध्ये तिने स्कोपा रेस्टॉरंटलाही टॅग केले आहे. तथापि, रेस्टॉरंटने याबाबत ट्विटरवर उत्तरादाखल चकार शब्दही काढलेला नाही. अनन्या ट्वीटमध्ये म्हणते, ‘स्कोपा रेस्टॉरंटने मला आणि माझ्या कुटुंबाला अक्षरश: बाहेर हाकलले. अत्यंत वर्णद्वेषी. खूपच वेदना झाल्या. ग्राहकांशी असंच वागतात का? हे बिलकूल खपवून घेतले जाऊ शकत नाही.’ दुसऱ्या ट्वीटमध्ये ती म्हणते, ‘आम्हाला जेवणासाठी तीन तास वाट बघावी लागली. शेफ एंटोनियो आणि वेटर जोशुआ सिल्‍वमन यांनी माझ्या आईला खूप वाईट वागणूक दिली. कमालीचा वर्णद्वेष. हे योग्य नाही.’ हे स्‍कोपा रेस्टॉरंट कॅलिफोर्नियात आहे आणि त्याचे शेफ एंटोनियो लोफासो आहेत. नीरजा बिर्ला यांनी अनन्याच्या ट्वीटला रिट्वीट करीत घटनेला दुजोरा दिला. त्यांनी लिहिले, ‘स्कोपाने आमच्याशी खूपच असभ्य वर्तन केले. कोणत्याही ग्राहकाला अशी अभद्र वागणूक देण्याचा तुम्हाला अधिकार नाही.’ आर्यमन यानेदेखील रिट्वीट करीत लिहिले की, ‘याआधी मला कुठेही असा अनुभव आला नाही. जगात अजूनही वर्णभेद कायम आहे. विश्वास बसत नाही.’ अनन्याच्या ट्वीटला करणवीर बोहरा आणि रणविजय सिंह या सेलिब्रिटींनीही रिट्वीट केले आहे.  

स्कोपा रेस्टॉरंटकडून इन्कारअमेरिकन प्रसारमाध्यमांनी स्कोपा रेस्टॉरंटची बाजू प्रकाशित केली आहे. त्यानुसार, स्कोपाने अशी काही घटना घडल्याचा इन्कार केला आहे. ओळखपत्र दाखवण्यावरून वाद झाला होता. मात्र, नंतर सगळे ठीक झाले. ते जेवण करून गेले. केंद्राने माहिती मागविलीयासंदर्भात सगळी परिस्थिती समजून घेतल्यानंतरच पुढील पाऊल उचलण्याचा निर्णय विदेश मंत्रालयाने घेतला आहे. सध्या अमेरिकन दूतावासाकडून घटनेची इत्थंभूत माहिती घेतली जात आहे.

टॅग्स :IndiaभारतGovernmentसरकार