शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

बिर्ला कुटुंबीयांना अमेरिकेत हॉटेलातून काढले बाहेर, परराष्ट्र मंत्रालयाने घेतली दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2020 07:05 IST

Ananya Birla News : कुमारमंगलम यांच्या पत्नी नीरजा, क्रिकेटपटू मुलगा आर्यमन आणि अनन्या  या तिघांनाही या रेस्टॉरंटने जेवणासाठी तब्बत तीन तास तिष्टत ठेवले. अनन्या हिने या घटनेबाबत सांगताना दोन ट्वीट केले आहेत.

नवी दिल्ली : देशातील आघाडीचे उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला यांची कन्या आणि गायिका अनन्या हिने त्यांच्या कुटुंबाला अमेरिकेत वर्णद्वेषी वागणूक देण्यात आल्याचा आरोप ट्वीटद्वारे केला आहे. वॉशिंग्टन येथील स्कोपा इटालियन रूटस्‌ या प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये २४ ऑक्टोबर रोजी बिर्ला कुटुंब भोजनासाठी गेले असता हा प्रकार घडल्याचे तिने म्हटले  आहे. या घटनेचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर विदेश मंत्रालयाने त्याची गंभीर दखल घेतली आहे.कुमारमंगलम यांच्या पत्नी नीरजा, क्रिकेटपटू मुलगा आर्यमन आणि अनन्या  या तिघांनाही या रेस्टॉरंटने जेवणासाठी तब्बत तीन तास तिष्टत ठेवले. अनन्या हिने या घटनेबाबत सांगताना दोन ट्वीट केले आहेत. विशेष म्हणजे, ट्वीटमध्ये तिने स्कोपा रेस्टॉरंटलाही टॅग केले आहे. तथापि, रेस्टॉरंटने याबाबत ट्विटरवर उत्तरादाखल चकार शब्दही काढलेला नाही. अनन्या ट्वीटमध्ये म्हणते, ‘स्कोपा रेस्टॉरंटने मला आणि माझ्या कुटुंबाला अक्षरश: बाहेर हाकलले. अत्यंत वर्णद्वेषी. खूपच वेदना झाल्या. ग्राहकांशी असंच वागतात का? हे बिलकूल खपवून घेतले जाऊ शकत नाही.’ दुसऱ्या ट्वीटमध्ये ती म्हणते, ‘आम्हाला जेवणासाठी तीन तास वाट बघावी लागली. शेफ एंटोनियो आणि वेटर जोशुआ सिल्‍वमन यांनी माझ्या आईला खूप वाईट वागणूक दिली. कमालीचा वर्णद्वेष. हे योग्य नाही.’ हे स्‍कोपा रेस्टॉरंट कॅलिफोर्नियात आहे आणि त्याचे शेफ एंटोनियो लोफासो आहेत. नीरजा बिर्ला यांनी अनन्याच्या ट्वीटला रिट्वीट करीत घटनेला दुजोरा दिला. त्यांनी लिहिले, ‘स्कोपाने आमच्याशी खूपच असभ्य वर्तन केले. कोणत्याही ग्राहकाला अशी अभद्र वागणूक देण्याचा तुम्हाला अधिकार नाही.’ आर्यमन यानेदेखील रिट्वीट करीत लिहिले की, ‘याआधी मला कुठेही असा अनुभव आला नाही. जगात अजूनही वर्णभेद कायम आहे. विश्वास बसत नाही.’ अनन्याच्या ट्वीटला करणवीर बोहरा आणि रणविजय सिंह या सेलिब्रिटींनीही रिट्वीट केले आहे.  

स्कोपा रेस्टॉरंटकडून इन्कारअमेरिकन प्रसारमाध्यमांनी स्कोपा रेस्टॉरंटची बाजू प्रकाशित केली आहे. त्यानुसार, स्कोपाने अशी काही घटना घडल्याचा इन्कार केला आहे. ओळखपत्र दाखवण्यावरून वाद झाला होता. मात्र, नंतर सगळे ठीक झाले. ते जेवण करून गेले. केंद्राने माहिती मागविलीयासंदर्भात सगळी परिस्थिती समजून घेतल्यानंतरच पुढील पाऊल उचलण्याचा निर्णय विदेश मंत्रालयाने घेतला आहे. सध्या अमेरिकन दूतावासाकडून घटनेची इत्थंभूत माहिती घेतली जात आहे.

टॅग्स :IndiaभारतGovernmentसरकार