शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

बिर्ला कुटुंबीयांना अमेरिकेत हॉटेलातून काढले बाहेर, परराष्ट्र मंत्रालयाने घेतली दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2020 07:05 IST

Ananya Birla News : कुमारमंगलम यांच्या पत्नी नीरजा, क्रिकेटपटू मुलगा आर्यमन आणि अनन्या  या तिघांनाही या रेस्टॉरंटने जेवणासाठी तब्बत तीन तास तिष्टत ठेवले. अनन्या हिने या घटनेबाबत सांगताना दोन ट्वीट केले आहेत.

नवी दिल्ली : देशातील आघाडीचे उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला यांची कन्या आणि गायिका अनन्या हिने त्यांच्या कुटुंबाला अमेरिकेत वर्णद्वेषी वागणूक देण्यात आल्याचा आरोप ट्वीटद्वारे केला आहे. वॉशिंग्टन येथील स्कोपा इटालियन रूटस्‌ या प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये २४ ऑक्टोबर रोजी बिर्ला कुटुंब भोजनासाठी गेले असता हा प्रकार घडल्याचे तिने म्हटले  आहे. या घटनेचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर विदेश मंत्रालयाने त्याची गंभीर दखल घेतली आहे.कुमारमंगलम यांच्या पत्नी नीरजा, क्रिकेटपटू मुलगा आर्यमन आणि अनन्या  या तिघांनाही या रेस्टॉरंटने जेवणासाठी तब्बत तीन तास तिष्टत ठेवले. अनन्या हिने या घटनेबाबत सांगताना दोन ट्वीट केले आहेत. विशेष म्हणजे, ट्वीटमध्ये तिने स्कोपा रेस्टॉरंटलाही टॅग केले आहे. तथापि, रेस्टॉरंटने याबाबत ट्विटरवर उत्तरादाखल चकार शब्दही काढलेला नाही. अनन्या ट्वीटमध्ये म्हणते, ‘स्कोपा रेस्टॉरंटने मला आणि माझ्या कुटुंबाला अक्षरश: बाहेर हाकलले. अत्यंत वर्णद्वेषी. खूपच वेदना झाल्या. ग्राहकांशी असंच वागतात का? हे बिलकूल खपवून घेतले जाऊ शकत नाही.’ दुसऱ्या ट्वीटमध्ये ती म्हणते, ‘आम्हाला जेवणासाठी तीन तास वाट बघावी लागली. शेफ एंटोनियो आणि वेटर जोशुआ सिल्‍वमन यांनी माझ्या आईला खूप वाईट वागणूक दिली. कमालीचा वर्णद्वेष. हे योग्य नाही.’ हे स्‍कोपा रेस्टॉरंट कॅलिफोर्नियात आहे आणि त्याचे शेफ एंटोनियो लोफासो आहेत. नीरजा बिर्ला यांनी अनन्याच्या ट्वीटला रिट्वीट करीत घटनेला दुजोरा दिला. त्यांनी लिहिले, ‘स्कोपाने आमच्याशी खूपच असभ्य वर्तन केले. कोणत्याही ग्राहकाला अशी अभद्र वागणूक देण्याचा तुम्हाला अधिकार नाही.’ आर्यमन यानेदेखील रिट्वीट करीत लिहिले की, ‘याआधी मला कुठेही असा अनुभव आला नाही. जगात अजूनही वर्णभेद कायम आहे. विश्वास बसत नाही.’ अनन्याच्या ट्वीटला करणवीर बोहरा आणि रणविजय सिंह या सेलिब्रिटींनीही रिट्वीट केले आहे.  

स्कोपा रेस्टॉरंटकडून इन्कारअमेरिकन प्रसारमाध्यमांनी स्कोपा रेस्टॉरंटची बाजू प्रकाशित केली आहे. त्यानुसार, स्कोपाने अशी काही घटना घडल्याचा इन्कार केला आहे. ओळखपत्र दाखवण्यावरून वाद झाला होता. मात्र, नंतर सगळे ठीक झाले. ते जेवण करून गेले. केंद्राने माहिती मागविलीयासंदर्भात सगळी परिस्थिती समजून घेतल्यानंतरच पुढील पाऊल उचलण्याचा निर्णय विदेश मंत्रालयाने घेतला आहे. सध्या अमेरिकन दूतावासाकडून घटनेची इत्थंभूत माहिती घेतली जात आहे.

टॅग्स :IndiaभारतGovernmentसरकार