शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
2
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
3
Operation Sindoor Live Updates: 'पाकिस्तानला मेसेज मिळालाय, आता थेट तुमच्या मुख्यालयावरच हल्ला करू'
4
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
5
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
6
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
7
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
8
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
9
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
10
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
11
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
12
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
13
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
14
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
15
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
16
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
17
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
18
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
19
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
20
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय

आयडियाची कल्पना! 'या' गावात कचऱ्यापासून तयार केली जाते वीज; मोदींनींही केलंय भरभरून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 12:25 IST

Electricity from waste material : घरातला कचरा वाया जात नाही तर वीज निर्मितीसाठी मदत करत आहे. पंतप्रधान मोदींनीही या गावच्या प्रकल्पाचं कौतुक केलं आहे.

नवी दिल्ली - तामिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यातील कांजीरंगल गावात वेस्टेज (Waste Material) पासून म्हणजेच कचऱ्यापासून वीजनिर्मिती (Power Generation) केली जात आहे. ऑगस्टमध्ये मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या गावाचे कौतुक केलं होतं. एएनआयने दिलेल्या रिपोर्टनुसार,या गावात कचऱ्यापासून वीज तयार होते. घरातला कचरा वाया जात नाही तर वीज निर्मितीसाठी मदत करत आहे. पंतप्रधान मोदींनीही या गावच्या प्रकल्पाचं कौतुक केलं आहे.

तामिळनाडू राज्यातील कांजीरंगल गावात स्थानिक लोक आणि पंचायतींच्या मदतीने एनआरयूएम (NRUM) अंतर्गत उभारण्यात आलेल्या वीजनिर्मिती प्रकल्पापासून मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती केली जात आहे अशी माहिती शिवगंगाचे डीसी थिरू पी मधुसूद रेड्डी यांनी दिली आहे. हॉटेल आणि घरांमधून निघणाऱ्या ओल्या आणि सुक्या कचऱ्यावर या प्लांटमध्ये प्रक्रिया करून वीज निर्मिती केली जाते. यातून  निर्माण केलेल्या वीजेचा वापर हा शेतीसाठी आणि इतर कामांसाठी केला जात आहे.

कचऱ्यापासून होतेय वीजनिर्मिती

रेड्डी यांनी या प्लांटची क्षमता 2 टन आहे, सध्या दररोज 1.2/1.3 टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येते अशी माहिती दिली आहे. त्यामुळे यातून निर्माण होणाऱ्या वीजेतून शेतीतील वीज वापरासह शेजारील परिसरात 200 रस्त्यांवरील दिवे लावण्यात आले आहेत. इतर जिल्ह्यांमध्येही असे प्लांट उभारण्याची मागणी आता होऊ लागली आहे. कचऱ्यापासून वीजनिर्मिती केली जात असल्याने या गावातील प्रकल्पाचं आणि लोकांचं भरभरून कौतुक केलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूIndiaभारतelectricityवीज