शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

आयडियाची कल्पना! 'या' गावात कचऱ्यापासून तयार केली जाते वीज; मोदींनींही केलंय भरभरून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 12:25 IST

Electricity from waste material : घरातला कचरा वाया जात नाही तर वीज निर्मितीसाठी मदत करत आहे. पंतप्रधान मोदींनीही या गावच्या प्रकल्पाचं कौतुक केलं आहे.

नवी दिल्ली - तामिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यातील कांजीरंगल गावात वेस्टेज (Waste Material) पासून म्हणजेच कचऱ्यापासून वीजनिर्मिती (Power Generation) केली जात आहे. ऑगस्टमध्ये मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या गावाचे कौतुक केलं होतं. एएनआयने दिलेल्या रिपोर्टनुसार,या गावात कचऱ्यापासून वीज तयार होते. घरातला कचरा वाया जात नाही तर वीज निर्मितीसाठी मदत करत आहे. पंतप्रधान मोदींनीही या गावच्या प्रकल्पाचं कौतुक केलं आहे.

तामिळनाडू राज्यातील कांजीरंगल गावात स्थानिक लोक आणि पंचायतींच्या मदतीने एनआरयूएम (NRUM) अंतर्गत उभारण्यात आलेल्या वीजनिर्मिती प्रकल्पापासून मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती केली जात आहे अशी माहिती शिवगंगाचे डीसी थिरू पी मधुसूद रेड्डी यांनी दिली आहे. हॉटेल आणि घरांमधून निघणाऱ्या ओल्या आणि सुक्या कचऱ्यावर या प्लांटमध्ये प्रक्रिया करून वीज निर्मिती केली जाते. यातून  निर्माण केलेल्या वीजेचा वापर हा शेतीसाठी आणि इतर कामांसाठी केला जात आहे.

कचऱ्यापासून होतेय वीजनिर्मिती

रेड्डी यांनी या प्लांटची क्षमता 2 टन आहे, सध्या दररोज 1.2/1.3 टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येते अशी माहिती दिली आहे. त्यामुळे यातून निर्माण होणाऱ्या वीजेतून शेतीतील वीज वापरासह शेजारील परिसरात 200 रस्त्यांवरील दिवे लावण्यात आले आहेत. इतर जिल्ह्यांमध्येही असे प्लांट उभारण्याची मागणी आता होऊ लागली आहे. कचऱ्यापासून वीजनिर्मिती केली जात असल्याने या गावातील प्रकल्पाचं आणि लोकांचं भरभरून कौतुक केलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूIndiaभारतelectricityवीज