शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

तेजस्‍वी यादव यांच्या नेतृत्‍वात 2025च्या विधानसभा निवडणुका लढणार; CM नितीश कुमार यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 16:00 IST

Bihar Politics: बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमार यांनी केलेल्या घोषणेमुळे बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

पाटणा: बिहारमधून मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मोठी घोषणा केली आहे. 2025 च्या विधानसभा निवडणुका तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली. यासोबतच नितीश कुमारांनी आपण पंतप्रधानपदाचे उमेदवार नसल्याचे स्पष्ट केले. 

महाआघाडी विधीमंडळ पक्षाची बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हे धक्कादायक आणि मोठे विधान केले आहे. सीएम नितीश यांनी अचानक एनडीए सोडून महाआघाडीसोबत सरकार स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे बिहारच्या राजकारणात भूकंप झाला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा असे वक्तव्य केल्याने राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे.

राज्याची राजधानी पाटणा येथे मंगळवारी महाआघाडी विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली होती. बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले, '2025 मध्ये होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुका तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील. मी पंतप्रधानपदाचा उमेदवार नाही. आम्हा सर्वांना फक्त भाजपला हटवायचे आहे. 

नितीश कुमार यांनीही एनडीएशी संबंध तोडून महाआघाडीसोबत सरकार स्थापन करण्याची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. नितीशकुमार यांनी दुसऱ्यांदा असे केले. याआधीही त्यांनी एनडीएशी संबंध तोडून महाआघाडीत प्रवेश केला होता. नंतर पुन्हा एनडीएमध्ये सामील होऊन सरकार स्थापन केले.नितीश कुमार यांनी दुसऱ्यांदा भाजपशी संबंध तोडल्यानंतर त्यांच्यावर वेगवेगळे आरोप करण्यात आले.  

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारTejashwi Yadavतेजस्वी यादवBJPभाजपा