शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
2
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
3
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
4
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
5
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
6
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
7
रागाच्या भरात परेश रावल यांनी गमावले भान! म्हणाले, 'एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड...'
8
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो
10
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
11
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
12
Video: लायब्ररीतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झाडल्या गोळ्या, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
13
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
14
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
15
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
16
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
17
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
18
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
19
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
20
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...

सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 10:16 IST

सोशल मीडियावर सध्या या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू आहे. २०१२-१३ या कालावधी बिहारच्या जेडीयू सरकारने जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू केली होती

बिहारच्या भागलपूर येथे सरकारने अवघ्या १ रूपये प्रतिवर्ष दराने उद्योगपती गौतम अदानी यांना १०५० एकर जमीन दिली आहे असा आरोप आम आदमी पार्टी आणि काँग्रेसने केला आहे. शेतकऱ्यांकडून या जमिनी सरकारने नुकसान भरपाई देत ताब्यात घेतल्या आता ही जमीन अदानी यांच्या प्रकल्पासाठी भाड्याने देण्यात आली आहे. जी जमीन नापीक सांगितली जात आहे तिथे जवळपास १० लाख झाडे आहेत, ती अदानी यांच्या कंपनीकडून आता कापली जाणार आहेत असा दावा आपचे खासदार संजय सिंह यांनी केला आहे.

सोशल मीडियावर सध्या या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू आहे. आप खासदार संजय सिंह म्हणाले की, भागलपूर येथे ८०० मेगाव्हॅटचे ३ प्लांट बसवण्यासाठी १ रूपये दरात १ हजार एकर जमीन अदानींना देण्यात आली आहे. याठिकाणी लावणाऱ्या पॉवर प्लांटमधून जी वीज उत्पादित केली जाईल ती पुढील २५ वर्ष ७ रूपये दराने सरकारकडून खरेदी केली जाणार आहे. जनतेला ही वीज ११ रूपये अथवा १२ रूपये दराने मिळेल का हेदेखील माहिती नाही. जनतेच्या खिशातून पैसा कापला जाईल परंतु पंतप्रधान त्यांच्या मित्राला कुठलाही त्रास होऊ देणार नाही. मोदी देशाचे पंतप्रधान नसून अदानींचे पंतप्रधान आहेत असा टोला त्यांनी लगावला. 

२०१२-१३ या कालावधी बिहारच्या जेडीयू सरकारने जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू केली होती. त्यावेळी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत जमिनी घेतल्या. म्हणजे जनतेच्या पैशातून हा व्यवहार झाला. त्यानंतर आता याच जमिनी १ रूपये दरात अदानी यांना ३० वर्षांसाठी देण्यात आल्या आहेत असंही आम आदमी पक्षाने म्हटलं. कागदावर ही जमीन नापीक असल्याचं खोटे सांगितले. या जमिनीवर १० लाखाहून अधिक झाडे आहेत. तिथे आंब्यासारखी झाडे आहेत. मात्र आता पॉवर प्लांटसाठी १० लाख झाडे कापली जाणार आहेत असा आरोपही आप पक्षाने केला. 

दरम्यान, भाजपाने याआधी एक झाड आईच्या नावे असं अभियान राबवले. आता ज्या जमिनी शेतकऱ्यांच्या होत्या, त्याची १ रूपये किंमत लावली. शेतकऱ्यांना धमकावून त्यांच्याकडून जमिनीची कागदपत्रे बनवून घेतली. त्यानंतर आता ही जमीन अदानींना दिली जाते. नरेंद्र मोदी त्यांच्या मित्रासाठी बिहारला लुटत आहेत. बिहारमध्ये सरकारी जमीन हिसकावली जाते. कोळसा काढला जातो. झाडे कापली जातात. महाराष्ट्रात जेव्हा निवडणूक झाली, त्याआधी पॉवर प्लांटचा प्रकल्प आणि धारावी प्रकल्प गौतम अदानी यांना देण्यात आले. त्याचप्रकारे झारखंड, छत्तीसगडमध्येही अनेक प्रकल्प अदानींना मिळाले असा आरोप काँग्रेस नेते पवन खेडा यांनी केला. 

टॅग्स :BJPभाजपाGautam Adaniगौतम अदानीcongressकाँग्रेसAAPआप