शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाल किल्ल्यापासून काश्मीरच्या जंगलांपर्यंत भारताला मारले'; पाकिस्तानी नेत्याची विधानसभेत जाहीर कबुली
2
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
3
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
4
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
5
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
6
नितीश कुमार 10व्यांदा होणार बिहारचे मुख्यमंत्री; NDA च्या बैठकीत शिक्कामोर्तब, उद्या शपथविधी
7
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
8
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
9
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
10
शिंदे शिवसेना की भाजपने घातला पहिला घाव? परस्परांचे माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा
11
“महायुतीत एकनाथ शिंदे एकटे पडले, लाचारी पत्करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा”: काँग्रेस
12
'धुरंधर' चित्रपटाचा ट्रेलर पाहून ध्रुव राठी संतापला; थेट ISIS शी केली तुलना, म्हणाला...
13
'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानला दिलाय मोठा दणका; ६ महिन्यांनंतरही 'नूर खान एअरबेस' पूर्ववत होईना!
14
पाकिस्तानमुळे मोठे आर्थिक नुकसान, आम्हाला चीन..; एअर इंडियाची केंद्र सरकारकडे 'ही' मागणी
15
'मिसेस देशपांडे'मध्ये दिसणार माधुरी दीक्षित, केली नव्या सीरिजची घोषणा; सोबत मराठी अभिनेता
16
सूडाची भावना! पत्नीचे पुतण्याशी संबंध; पतीला समजताच झाडल्या गोळ्या, स्वत:लाही संपवलं
17
काय आहे ही 'टीना', नफा घटला तरीही एलजीचे शेअर्स ४ टक्क्यांनी वाढले; ब्रोकर्सनी दिले मोठे टार्गेट...
18
जैश-ए-मोहम्मदची परिस्थिती बिघडली, दहशतवाद्यांना थंडीपासून वाचवण्यासाठी पैसे मागण्याची आली वेळ
19
काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट; बैठकीत काय ठरले? सुप्रिया सुळेंनी दिली मोठी अपडेट
20
₹३८ च्या शेअरची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला ५८८४% परतावा! काय आहे कंपनीचा व्यवसाय?
Daily Top 2Weekly Top 5

'....तर भाजपच्या 100 पेक्षा अधिक जागा कमी होतील, 'काँग्रेसने उशीर करू नये'; नितीश कुमारांचा सोनिया गांधींना संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 13:01 IST

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी देशातील आगामी सार्वत्रिक निवडणुकांबाबत मोठे वक्तव्य केले आहे. भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेसने आता पुढे यावे आणि विरोधी एकजुटीला उशीर करू नये, असं वक्तव्य नितीशकुमार यांनी केले आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी देशातील आगामी सार्वत्रिक निवडणुकांबाबत मोठे वक्तव्य केले आहे. भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेसने आता पुढे यावे आणि विरोधी एकजुटीला उशीर करू नये, असं वक्तव्य नितीशकुमार यांनी केले आहे.

पाटणा येथे झालेल्या सीपीआय-एमएलच्या राष्ट्रीय अधिवेशनात मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हे वक्तव्य केले. नितीश कुमार यांनी लोकसभा निवडणुकांवरुनही मोठं वक्तव्य केलं.  'मला नेतृत्वाची वैयक्तिक इच्छा नाही. आम्हाला फक्त बदल हवा आहे. प्रत्येकजण जे ठरवेल ते होईल. आता काँग्रेसने पुढचा निर्णय घ्यावा आणि विरोधी एकजुटीत दिरंगाई करू नये, आम्ही वाट पाहत आहोत, असंही नितीश कुमार म्हणाले.

'आम्ही दिल्लीला जाऊन दोघांना काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना भेटलो भेटलो. यावेळी सलमान खुर्शीद यांना सांगितले की, तुमच्या माध्यमातून काँग्रेस नेतृत्वाला आवाहन आहे की, सर्वांनी एकत्र आल्यास भाजप 100 च्या खाली बसेल. बिहारमध्ये विरोधी पक्ष एकजुटीने काम करत आहेत.

'भाजपला भारताला नथुराम गोडसेचा देशा बनवायचाय; उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचा हल्लाबोल

'जेव्हा ते एनडीएपासून वेगळे झाले तेव्हा सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. 2024 मध्ये सर्व विरोधी पक्ष एकजुटीने लढतील, तरच भाजपचा आपण पराभव करु शकू. आज स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्व धर्म आणि जातीच्या लोकांना एकत्र यावे लागेल, असंही नितीश कुमार म्हणाले. 

'भाजपला भारताला नथुराम गोडसेचा देशा बनवायचाय; उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचा हल्लाबोल

'भाजप केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून भारताला नथुराम गोडसेचे राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न करत आहे', अशी घणाघाती टीका बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी प्रकाश यांनी केली. बीबीसी कार्यालयातील आयकर सर्वेक्षणावर बोलताना त्यांनी ही टीका केली. असी छापे टाकून केंद्र सरकारला संदेश द्यायचा आहे की जो कोणी सरकारविरोधात बोलेल त्याच्यावर कारवाई केली जाईल, असा आरोपही तेजस्वी यादव यांनी केला.

'बीबीसीचे काय झाले ते तुम्हा सर्वांना माहित आहे. गुजरातमध्ये काय झाले हे सर्वांना माहीत आहे. त्यांना महात्मा गांधींचा देश नथुराम गोडसेच्या देशात बदलायचा आहे. ते हिंदु राष्ट्राबद्दल बोलतात पण आपली विविधता हेच आपले सौंदर्य आहे, असंही तेजस्वी यादव म्हणाले. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी