शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
3
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
4
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
5
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
6
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
7
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
8
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
9
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
10
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
11
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
12
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
13
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
14
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
15
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
16
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
17
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
18
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
19
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
20
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग

'....तर भाजपच्या 100 पेक्षा अधिक जागा कमी होतील, 'काँग्रेसने उशीर करू नये'; नितीश कुमारांचा सोनिया गांधींना संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 13:01 IST

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी देशातील आगामी सार्वत्रिक निवडणुकांबाबत मोठे वक्तव्य केले आहे. भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेसने आता पुढे यावे आणि विरोधी एकजुटीला उशीर करू नये, असं वक्तव्य नितीशकुमार यांनी केले आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी देशातील आगामी सार्वत्रिक निवडणुकांबाबत मोठे वक्तव्य केले आहे. भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेसने आता पुढे यावे आणि विरोधी एकजुटीला उशीर करू नये, असं वक्तव्य नितीशकुमार यांनी केले आहे.

पाटणा येथे झालेल्या सीपीआय-एमएलच्या राष्ट्रीय अधिवेशनात मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हे वक्तव्य केले. नितीश कुमार यांनी लोकसभा निवडणुकांवरुनही मोठं वक्तव्य केलं.  'मला नेतृत्वाची वैयक्तिक इच्छा नाही. आम्हाला फक्त बदल हवा आहे. प्रत्येकजण जे ठरवेल ते होईल. आता काँग्रेसने पुढचा निर्णय घ्यावा आणि विरोधी एकजुटीत दिरंगाई करू नये, आम्ही वाट पाहत आहोत, असंही नितीश कुमार म्हणाले.

'आम्ही दिल्लीला जाऊन दोघांना काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना भेटलो भेटलो. यावेळी सलमान खुर्शीद यांना सांगितले की, तुमच्या माध्यमातून काँग्रेस नेतृत्वाला आवाहन आहे की, सर्वांनी एकत्र आल्यास भाजप 100 च्या खाली बसेल. बिहारमध्ये विरोधी पक्ष एकजुटीने काम करत आहेत.

'भाजपला भारताला नथुराम गोडसेचा देशा बनवायचाय; उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचा हल्लाबोल

'जेव्हा ते एनडीएपासून वेगळे झाले तेव्हा सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. 2024 मध्ये सर्व विरोधी पक्ष एकजुटीने लढतील, तरच भाजपचा आपण पराभव करु शकू. आज स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्व धर्म आणि जातीच्या लोकांना एकत्र यावे लागेल, असंही नितीश कुमार म्हणाले. 

'भाजपला भारताला नथुराम गोडसेचा देशा बनवायचाय; उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचा हल्लाबोल

'भाजप केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून भारताला नथुराम गोडसेचे राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न करत आहे', अशी घणाघाती टीका बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी प्रकाश यांनी केली. बीबीसी कार्यालयातील आयकर सर्वेक्षणावर बोलताना त्यांनी ही टीका केली. असी छापे टाकून केंद्र सरकारला संदेश द्यायचा आहे की जो कोणी सरकारविरोधात बोलेल त्याच्यावर कारवाई केली जाईल, असा आरोपही तेजस्वी यादव यांनी केला.

'बीबीसीचे काय झाले ते तुम्हा सर्वांना माहित आहे. गुजरातमध्ये काय झाले हे सर्वांना माहीत आहे. त्यांना महात्मा गांधींचा देश नथुराम गोडसेच्या देशात बदलायचा आहे. ते हिंदु राष्ट्राबद्दल बोलतात पण आपली विविधता हेच आपले सौंदर्य आहे, असंही तेजस्वी यादव म्हणाले. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी