शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

'....तर भाजपच्या 100 पेक्षा अधिक जागा कमी होतील, 'काँग्रेसने उशीर करू नये'; नितीश कुमारांचा सोनिया गांधींना संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 13:01 IST

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी देशातील आगामी सार्वत्रिक निवडणुकांबाबत मोठे वक्तव्य केले आहे. भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेसने आता पुढे यावे आणि विरोधी एकजुटीला उशीर करू नये, असं वक्तव्य नितीशकुमार यांनी केले आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी देशातील आगामी सार्वत्रिक निवडणुकांबाबत मोठे वक्तव्य केले आहे. भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेसने आता पुढे यावे आणि विरोधी एकजुटीला उशीर करू नये, असं वक्तव्य नितीशकुमार यांनी केले आहे.

पाटणा येथे झालेल्या सीपीआय-एमएलच्या राष्ट्रीय अधिवेशनात मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हे वक्तव्य केले. नितीश कुमार यांनी लोकसभा निवडणुकांवरुनही मोठं वक्तव्य केलं.  'मला नेतृत्वाची वैयक्तिक इच्छा नाही. आम्हाला फक्त बदल हवा आहे. प्रत्येकजण जे ठरवेल ते होईल. आता काँग्रेसने पुढचा निर्णय घ्यावा आणि विरोधी एकजुटीत दिरंगाई करू नये, आम्ही वाट पाहत आहोत, असंही नितीश कुमार म्हणाले.

'आम्ही दिल्लीला जाऊन दोघांना काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना भेटलो भेटलो. यावेळी सलमान खुर्शीद यांना सांगितले की, तुमच्या माध्यमातून काँग्रेस नेतृत्वाला आवाहन आहे की, सर्वांनी एकत्र आल्यास भाजप 100 च्या खाली बसेल. बिहारमध्ये विरोधी पक्ष एकजुटीने काम करत आहेत.

'भाजपला भारताला नथुराम गोडसेचा देशा बनवायचाय; उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचा हल्लाबोल

'जेव्हा ते एनडीएपासून वेगळे झाले तेव्हा सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. 2024 मध्ये सर्व विरोधी पक्ष एकजुटीने लढतील, तरच भाजपचा आपण पराभव करु शकू. आज स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्व धर्म आणि जातीच्या लोकांना एकत्र यावे लागेल, असंही नितीश कुमार म्हणाले. 

'भाजपला भारताला नथुराम गोडसेचा देशा बनवायचाय; उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचा हल्लाबोल

'भाजप केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून भारताला नथुराम गोडसेचे राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न करत आहे', अशी घणाघाती टीका बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी प्रकाश यांनी केली. बीबीसी कार्यालयातील आयकर सर्वेक्षणावर बोलताना त्यांनी ही टीका केली. असी छापे टाकून केंद्र सरकारला संदेश द्यायचा आहे की जो कोणी सरकारविरोधात बोलेल त्याच्यावर कारवाई केली जाईल, असा आरोपही तेजस्वी यादव यांनी केला.

'बीबीसीचे काय झाले ते तुम्हा सर्वांना माहित आहे. गुजरातमध्ये काय झाले हे सर्वांना माहीत आहे. त्यांना महात्मा गांधींचा देश नथुराम गोडसेच्या देशात बदलायचा आहे. ते हिंदु राष्ट्राबद्दल बोलतात पण आपली विविधता हेच आपले सौंदर्य आहे, असंही तेजस्वी यादव म्हणाले. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी