शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

आठ वर्षांच्या मुलीचं 28 वर्षांच्या मुलाशी लग्न! अशी आहे बिहारच्या 'बालिका वधू'ची खरी कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 08:51 IST

हा फोटो व्हायरल झाल्यानंतर या लग्नावर चर्चेला सुरुवात झाली. लोकांनी बाल विवाहाच्या मुद्द्यावर बिहार सरकारला घेरायलाही सुरुवात केली. तर, काही लोक सरकारकडे या मुलीला न्याय मिळावा, अशी मागणी करत आहेत.

पाटणा - सोशल मिडियावर एक फोटो जबरदस्त व्हायरल होत आहे. या फोटोत नवविवाहित जोडपे दिसत आहे. मात्र, वाद निर्माण झाला तो नवरीच्या वयावरून. कारण नवरीच्या पोशाखात दिसत असलेली तरुणी मुलीसारखी दिसते. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर या लग्नावर चर्चेला सुरुवात झाली. लोकांनी बाल विवाहाच्या मुद्द्यावर बिहार सरकारला घेरायलाही सुरुवात केली. तर, काही लोक सरकारकडे या मुलीला न्याय मिळावा, अशी मागणी करत आहेत. मात्र, हे प्रकरण प्रशासनाकडे पोहोचल्यानंतर खळबळ उडाली.

प्रकरण प्रशासनाकडे पोहोचल्यानंतर प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासीठी एक टीम तयार केली. मात्र, या चौकशीत जी बाब समोर आली ती चकित करणारी आहे. खरे तर, जमुई जिल्ह्यातील अकौनी गावातील ज्या मुलीचा फोटो व्हायरल करून लोक सरकारला सवाल करत आहेत, ती मुलगी सरकारी दस्ताएवजांप्रमाणे अडल्ट आहे. ती 19 वर्षांची आहे. गेल्या 24 एप्रिलला तिचे लग्न झाले आहे आणि ती पतीसह तिच्या सासरी आहे.

मुलीनं स्वतःच सांगितलं सत्य -बालविवाहाची चर्चा स्वतः तनू कुमारीनेच फेटाळली आहे. यासंदर्भात बोलताना तनू म्हणाली, तिचे लग्न तिच्या आणि दोन्ही कुटुंबीयांच्या सहमतीने झाले आहे. सोशल मिडियावर पसरलेले वृत्त पूर्णपणे चुकीचे आहे. ते फेटाळले जावे. तर दुसरीकडे, याप्रकरणी, प्रशासकीय पातळीवरही जाहिरात प्रसिद्ध करून संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. 

प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत म्हणण्यात आले आहे, की 25 मेरोजी सोशल मिडियाच्या माध्यमातून तथाकथित बालविवाहाची माहिती मिळाली होती. यानंतर प्रशासकीय अधिकारी घटनेत्या चौकशीसाठी वारिसलीगंज येथे पोहोचले. तेथे गावातील लोकांनी त्यांना सांगितले, की मुलीचे नाव तनु कुमारी, असे आहे. ती लहाणपणापासूनच मतासी (अकौनी), सिकन्दरा, जिल्हा जमुई येथे राहते. 

गावातील लोकांनी सांगितल्यानुसार, मुलीची आईदेखील तेथेच राहते. मुलीचे वडील दिल्ली येथे काम करतात. यानंतर संबंधित मुलीचे आधार कार्ड तपासण्यात आले. त्याची सत्यता पडताळण्यात आली. यानुसार, संबंधित मुलगी अडल्ट असून व्हायरल वृत्त पूर्णपणे फेक अथवा निराधार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :Biharबिहारmarriageलग्नSocial Mediaसोशल मीडियाPoliceपोलिसState Governmentराज्य सरकार