शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
3
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
4
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
5
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
6
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
7
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
8
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
9
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
10
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
11
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
12
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
13
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
14
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
15
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...
16
Pranjal Khewalkar Arrest : मोबाईलमधून हाऊस पार्टीतील महिलांशी केलेली चॅटिंग व पार्टीचे व्हिडिओ सापडले
17
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
18
Sonam Raghuvanshi : बेवफा सोनमवर चित्रपट येणार, 'हे' नाव असणार; दिग्दर्शकाने घेतली राजा रघुवंशीच्या भावाची भेट
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान?

Bihar Assembly Election Results : गिरिराज सिंहांनी मीम शेअर करत तेजस्वी यादवांना केले 'रन आउट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2020 10:29 IST

Giriraj Singh : बिहारमध्ये भाजपा आणि नितीश कुमार यांच्या एनडीएला बहुमत मिळणार नाही, असे एक्झिट पोलचे अंदाज मतदारांनी धुळीस मिळविले आणि या एनडीएलाच सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत.

ठळक मुद्देभाजपाला संयुक्त जनता दलापेक्षा अधिक जागा मिळाल्याने नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील का, हा प्रश्न आहे.

पटना : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल आता सर्वांसमोर आले आहेत. बिहारमध्ये भाजपा आणि नितीश कुमार यांच्या एनडीएला बहुमत मिळणार नाही, असे एक्झिट पोलचे अंदाज मतदारांनी धुळीस मिळविले आणि या एनडीएलाच सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. मंगळवारी रात्री एनडीएने 122 बहुमताचा जादूई आकडा पार करताच एकच उत्सवाचे वातावरण झाले.

या निवडणुकीत भाजपा एनडीएमधील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. त्यामुळे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून भाजपाच्या विजयाबद्दल आणि आरजेडीच्या पराभवाबद्दल मीम शेअर केले आहे. गिरीराज सिंह यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीशकुमार आणि तेजस्वी यादव क्रिकेट खेळताना दिसत आहेत. त्यामध्ये तेजस्वी यादव धावचीत होताना दिसत आहे. तसेच,  गिरीराज सिंह यांनी ट्विट करताना या फोटोसाठी 'गुड वन' असे शीर्षक दिले आहे आहे.

दरम्यान, बिहारमध्ये मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली, ती रात्री उशिरापर्यंत सुरु होती. काल रात्री एनडीएने बहुमताचा आकडा ओलांडला आणि बिहारच्या लोकांनी एनडीएला पुन्हा एकदा राज्याची सत्ता सांभाळण्याची संधी दिली. पण भाजपाला संयुक्त जनता दलापेक्षा अधिक जागा मिळाल्याने नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील का, हा प्रश्न आहे. 

नितीशकुमार यांनी भाजपा मुख्यमंत्रीपद देणार का?शिवसेनेपाठोपाठ अकाली दलानेही भाजपाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करून राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संयुक्त जनता दल भाजपाचा सर्वात मोठा सहकारी पक्ष म्हणून समोर आला. मात्र आपल्याहून कमी जागा जिंकणाऱ्या नीतिशकुमार यांना मुख्यमंत्री बनवण्याची भूमिका भाजपाने कायम ठेवली, तरच एनडीएचे अस्तित्त्व टिकेल. २०१४ साली लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा महाराष्ट्रात शिवसेना व भाजपाने स्वतंत्र निवडणूक लढवली. पण नंतर शिवसेना-भाजपा युती सरकार झाले. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत युती कायम राहिली. मात्र मुख्यमंत्रीपदावरून दोन्ही पक्ष एकमेकांपासून दूर गेले. जदयूनेही पंतप्रधान मोदी यांना विरोध करून एनडीएला काही काळ सोडचिठ्ठी दिली होती. 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBJPभाजपाTejashwi Yadavतेजस्वी यादवNitish Kumarनितीश कुमार