शहरं
Join us  
Trending Stories
1
"पक्षासाठी केसेस अंगावर, तिकीट मात्र दुसऱ्यांना"; संभाजीनगरात भाजप पदाधिकाऱ्यांचा राडा
2
काहीतरी मोठं घडणार! चीनची आक्रमक हालचाल, तैवानला सैन्याने वेढा घातला; विमानांची उड्डाणेही रद्द
3
Municipal Election 2026: सुरुवात झाली! अखेरच्या दिवशी पुणे, नाशिकसह या महापालिकांत भाजप-शिवसेनेची युती तुटली...
4
फोटोग्राफर, प्रोड्यूसर, नॅशनल लेव्हल फुटबॉलपटू... कोण आहे प्रियंका गांधींची होणारी सून?
5
विरोधकांच्या एकीला तडे; वसई-विरारमध्ये उद्धवसेना स्वबळावर, महायुतीतील मित्रपक्षाचा पाठिंबा
6
बच्चू कडूंच्या प्रहारची उद्धवसेनेसोबत युती, पण उमेदवार लढणार मशाल चिन्हावर!
7
Travel : चला, प्रेमाच्या शहरात! आयफेल टॉवर अन् सीन नदीच्या काठावर फिरण्यासाठी असा करा परफेक्ट प्लॅन
8
मिशन बंगाल; अमित शाहांनी रणनीती आखली, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ममता बॅनर्जींचा सामना करणार...
9
मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेसकडून ५६ उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध, अमराठी आणि मुस्लिम चेहऱ्यांना दिलं प्राधान्य   
10
२०२५ सरता सरता...! Google वर '67' सर्च करताच तुमची स्क्रीन थरथरू लागतेय? तुम्हीही करून पहा...
11
बाजारात एन्ट्री घेताच जोरदार आपटला 'हा' शेअर, पहिल्याच दिवशी २४% नं घसरला, गुंतवणूकदारांना मोठा झटका
12
"सूर्यकुमार यादव मला खूप मेसेज करायचा, पण आता...", बोल्ड कंटेटमुळे चर्चेत असलेल्या अभिनेत्रीचा खळबळजनक दावा
13
महायुतीत फूट! धुळ्यातही भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेना-अजित पवारांची NCP युतीत लढणार
14
Silver Price : चांदीचा ‘सिल्वर रिटर्न’! ऑक्टोबरची गुंतवणूक, डिसेंबरमध्ये ७२ हजारांचा फायदा; गणित समजून घ्या
15
'घरातील लोकांना तिकीट हवं होतं म्हणून युती तोडली!'; भाजपचा शिंदेसेनेवर पलटवार
16
"हा तर विश्वासघातच"; मित्रपक्षांनी 'झुलवत' ठेवल्याने रिपाई आक्रमक, रामदास आठवलेंनी दिला अल्टिमेटम
17
भाजपाचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी जुळले; शिंदेसेनेशी मात्र बिघडले! कोण किती जागा लढवणार?
18
LPG सबसिडीचे सूत्र बदलणार! अमेरिकेकडून गॅस आयातीमुळे केंद्र सरकार नवा निर्णय घेण्याच्या तयारीत
19
“कोणीही-कितीही सोडून जाऊ द्या, वसई-विरारमध्ये विजय आमचाच होणार”; हितेंद्र ठाकूरांचा एल्गार
20
प्रियंका गांधींच्या मुलाने गुपचुप उरकला साखरपुडा; 'ही' सुंदरी होणार वाड्रा कुटुंबाची सून...
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 13:55 IST

Bihar Assembly Election 2025 : जागावाटपावरुन मतभेद अन् समन्वयाचा अभाव महाआघाडीला भोवला; 40 पेक्षा कमी जागा...

Bihar Assembly Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल आज लागले. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, NDA 190+ जागांसह सत्तेत दमदार पुनरागमन करत आहे, तर महाआघाडीला 50 पेक्षा कमी जागा मिळत आहेत. राज्यात परिवर्तन होण्याचा दावा करणाऱ्या विरोधकांसाठी हा निकाल मोठा धक्का मानला जातोय. विशेष म्हणजे, महाआघाडीत काँग्रेसने सर्वात खराब कामगिरी केली आहे.

राहुलचा हायड्रोजन बॉम्ब महाआघाडीवर फुटला

सत्तेवर पुनरागमन करण्याचे स्वप्न पाहणारे राजद नेते तेजस्वी यादव यांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या निवडणुकीत 74 जागांवर विजय मिळवणाऱ्या राजदला यंदा अर्ध्याहून कमी जागा मिळताना दिसत आहेत. तर, 60 पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवणारी काँग्रेस केवळ 4 जागांवर आघाडीवर आहे. निवडणूक प्रचाराच्या वेळी जागांसाठी सर्वाधिक दबाव टाकणाऱ्या काँग्रेसची ही दयनीय कामगिरी महाआघाडीच्या निकालावर थेट परिणाम करताना दिसत आहे.

2020 मध्ये 70 सीटांवर लढून काँग्रेसने 19 जागा जिंकल्या होत्या. मात्र, यंदा त्यांचा लक्षणीयरित्या घसरला आहे. विशेष म्हणजे, मतदानापूर्वी भाजपवर हायड्रोजन बॉम्ब फोडणाऱ्या राहुल गांधींसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय. त्यांनी राज्यात मतदार अधिकार यात्रेतून भाजपविरोधात वातावरण होते, मात्र निकाल त्यांच्याच विरोधात आले. त्यांचा हायड्रोजन बॉम्ब भाजपऐवजी काँग्रेसवर फुटला. राजदलाही त्याचा जोरदार फटका बसला आहे. 

महाआघाडीच्या अपयशाची 5 मोठी कारणे

1) जागा वाटपावरुन मतभेद

महाआघाडीत जागावाटपावरुन शेवटच्या क्षणापर्यंत तणाव सुरू होता. समन्वयाचा अभाव इतका होता की, 12 जागांवर फ्रेंडली फाइट होण्याची वेळ आली. याचा थेट परिणाम सामूहिक मतांवर झाला.

2) तेजस्वी यादवांना सीएम फेस मान्य करण्यात काँग्रेसचा नकार

काँग्रेसला योग्य प्रमाणात जागा न मिळाल्याने पक्षातील नेते नाराज होते. याच पार्श्वभूमीवर तेजस्वी यादवांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून सार्वजनिकरित्या मान्य करण्याबाबत काँग्रेस सतत दुविधेत होती. राहुल गांधींनीही या बाबत मंचावर काहीही न बोलल्याने एकोप्याविषयी शंका निर्माण झाली होती.

3) राहुल गांधींची प्रचारातील मर्यादित उपस्थिती

राहुल गांधी प्रचारात विशेष सक्रिय दिसले नाहीत. त्यांनी मत चोरीचा मुद्दा उचलण्याचा प्रयत्न केला, पण तो जनतेत फारसा प्रभाव निर्माण करू शकला नाही; कारण तो स्थानिक किंवा भावनिक मुद्दा नव्हता.

4) एनडीए सरकारच्या योजनांना मिळालेले जनसमर्थन

बिहारमधील महिलांना मिळालेल्या 10 हजार रुपयांच्या थेट लाभाने एनडीएला मोठा फायदा झाला. सरकारच्या शेवटच्या महिन्यांतील कल्याणकारी योजनांनी थेट तळागाळात प्रभाव निर्माण केला आणि मतदानाची दिशा बदलली.

5) काँग्रेसला सहयोगी पक्षांचे मत आकर्षित करण्यात अपयश

सीमांचलमधील काही जागा वगळता काँग्रेस इतर प्रदेशात सहयोगी पक्षांचे पारंपरिक मत आकर्षित करण्यात अयशस्वी ठरली. गेल्या निवडणुकीत जिंकलेल्या अनेक जागांवरही तिची कामगिरी या वेळी अत्यंत खराब दिसत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Rahul Gandhi's 'Hydrogen Bomb' Backfires; Five Reasons for Congress-RJD Defeat

Web Summary : NDA triumphs in Bihar; Congress's poor performance and internal discord within the Mahagathbandhan led to their defeat. Rahul Gandhi's campaign failed to resonate, while NDA's welfare schemes proved popular. Seat allocation disputes and lack of CM face consensus further hurt the opposition alliance.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५congressकाँग्रेसRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलBJPभाजपा