शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
2
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
3
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
4
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
5
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
6
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
7
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
8
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
9
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
10
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
11
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
12
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
13
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
14
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
15
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
16
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
18
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
19
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
20
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 13:55 IST

Bihar Assembly Election 2025 : जागावाटपावरुन मतभेद अन् समन्वयाचा अभाव महाआघाडीला भोवला; 40 पेक्षा कमी जागा...

Bihar Assembly Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल आज लागले. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, NDA 190+ जागांसह सत्तेत दमदार पुनरागमन करत आहे, तर महाआघाडीला 50 पेक्षा कमी जागा मिळत आहेत. राज्यात परिवर्तन होण्याचा दावा करणाऱ्या विरोधकांसाठी हा निकाल मोठा धक्का मानला जातोय. विशेष म्हणजे, महाआघाडीत काँग्रेसने सर्वात खराब कामगिरी केली आहे.

राहुलचा हायड्रोजन बॉम्ब महाआघाडीवर फुटला

सत्तेवर पुनरागमन करण्याचे स्वप्न पाहणारे राजद नेते तेजस्वी यादव यांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या निवडणुकीत 74 जागांवर विजय मिळवणाऱ्या राजदला यंदा अर्ध्याहून कमी जागा मिळताना दिसत आहेत. तर, 60 पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवणारी काँग्रेस केवळ 4 जागांवर आघाडीवर आहे. निवडणूक प्रचाराच्या वेळी जागांसाठी सर्वाधिक दबाव टाकणाऱ्या काँग्रेसची ही दयनीय कामगिरी महाआघाडीच्या निकालावर थेट परिणाम करताना दिसत आहे.

2020 मध्ये 70 सीटांवर लढून काँग्रेसने 19 जागा जिंकल्या होत्या. मात्र, यंदा त्यांचा लक्षणीयरित्या घसरला आहे. विशेष म्हणजे, मतदानापूर्वी भाजपवर हायड्रोजन बॉम्ब फोडणाऱ्या राहुल गांधींसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय. त्यांनी राज्यात मतदार अधिकार यात्रेतून भाजपविरोधात वातावरण होते, मात्र निकाल त्यांच्याच विरोधात आले. त्यांचा हायड्रोजन बॉम्ब भाजपऐवजी काँग्रेसवर फुटला. राजदलाही त्याचा जोरदार फटका बसला आहे. 

महाआघाडीच्या अपयशाची 5 मोठी कारणे

1) जागा वाटपावरुन मतभेद

महाआघाडीत जागावाटपावरुन शेवटच्या क्षणापर्यंत तणाव सुरू होता. समन्वयाचा अभाव इतका होता की, 12 जागांवर फ्रेंडली फाइट होण्याची वेळ आली. याचा थेट परिणाम सामूहिक मतांवर झाला.

2) तेजस्वी यादवांना सीएम फेस मान्य करण्यात काँग्रेसचा नकार

काँग्रेसला योग्य प्रमाणात जागा न मिळाल्याने पक्षातील नेते नाराज होते. याच पार्श्वभूमीवर तेजस्वी यादवांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून सार्वजनिकरित्या मान्य करण्याबाबत काँग्रेस सतत दुविधेत होती. राहुल गांधींनीही या बाबत मंचावर काहीही न बोलल्याने एकोप्याविषयी शंका निर्माण झाली होती.

3) राहुल गांधींची प्रचारातील मर्यादित उपस्थिती

राहुल गांधी प्रचारात विशेष सक्रिय दिसले नाहीत. त्यांनी मत चोरीचा मुद्दा उचलण्याचा प्रयत्न केला, पण तो जनतेत फारसा प्रभाव निर्माण करू शकला नाही; कारण तो स्थानिक किंवा भावनिक मुद्दा नव्हता.

4) एनडीए सरकारच्या योजनांना मिळालेले जनसमर्थन

बिहारमधील महिलांना मिळालेल्या 10 हजार रुपयांच्या थेट लाभाने एनडीएला मोठा फायदा झाला. सरकारच्या शेवटच्या महिन्यांतील कल्याणकारी योजनांनी थेट तळागाळात प्रभाव निर्माण केला आणि मतदानाची दिशा बदलली.

5) काँग्रेसला सहयोगी पक्षांचे मत आकर्षित करण्यात अपयश

सीमांचलमधील काही जागा वगळता काँग्रेस इतर प्रदेशात सहयोगी पक्षांचे पारंपरिक मत आकर्षित करण्यात अयशस्वी ठरली. गेल्या निवडणुकीत जिंकलेल्या अनेक जागांवरही तिची कामगिरी या वेळी अत्यंत खराब दिसत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Rahul Gandhi's 'Hydrogen Bomb' Backfires; Five Reasons for Congress-RJD Defeat

Web Summary : NDA triumphs in Bihar; Congress's poor performance and internal discord within the Mahagathbandhan led to their defeat. Rahul Gandhi's campaign failed to resonate, while NDA's welfare schemes proved popular. Seat allocation disputes and lack of CM face consensus further hurt the opposition alliance.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५congressकाँग्रेसRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलBJPभाजपा