शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेत आल्यास दारुबंदीबाबत पुनर्विचार करणार, बिहारी जनतेला काँग्रेसचं आश्वासन

By बाळकृष्ण परब | Updated: October 21, 2020 17:56 IST

Bihar Assembly Election 2020 News : बिहारमधील निवडणुकीत सत्ताधारी एनडीए आणि प्रमुख विरोधी आघाडी असलेल्या महाआघाडीमध्ये मुख्य लढत होत आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध राजकीय पक्षांकडून जाहीरनाम्यामधून अनेक आश्वासने दिली जात आहेत.

ठळक मुद्देसत्तेत आल्यास दारुबंदीच्या निर्णयाचा पुनर्विचार करू, काँग्रेसने दिले आश्वासन दारुबंदीमुळे राज्या्च्या महसुलाचे मोठ्या प्रमाणावर झाले नुकसान राज्य सरकार दारुबंदीबाबतच्या सकारात्मक हेतूपासून भरकटले आहे

पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार आता ऐन रंगात आला आहे. या निवडणुकीत सत्ताधारी एनडीए आणि प्रमुख विरोधी आघाडी असलेल्या महाआघाडीमध्ये मुख्य लढत होत आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध राजकीय पक्षांकडून जाहीरनाम्यामधून अनेक आश्वासने दिली जात आहेत. दरम्यान, काँग्रेसनेही बदलावपत्र या नावाने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या बदलावपत्रामधून काँग्रेसचे बिहारी जनतेला अनेक आश्वासने दिली आहेत. त्यापैकी एक आश्वासन हे दारुबंदीबाबतही दिले आहे. सत्तेत आल्यास दारुबंदीच्या निर्णयाचा पुनर्विचार करू असे आश्वासन काँग्रेसने बिहारमधील जनतेला या जाहीरनाम्यामधून दिले आहे.काँग्रेसने सांगितले की, दारुबंदीमुळे राज्या्च्या महसुलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच राज्य सरकार दारुबंदीबाबतच्या सकारात्मक हेतूपासून भरकटले आहे. त्यामुळे राज्यात अवैध व्यापार होत आहे आणि पोलिसांना लाभ पोहोचवला जात आहे. मात्र जनता अजूनही त्रस्त आहे. अशा परिस्थित काँग्रेस सत्तेवर आल्यावर या निर्णयाचा योग्य तो पुनर्विचार करणार आहे.२०१५ मध्ये सत्तेत आल्यानंतर नितीश कुमार यांनी दारुबंदीचा निर्णय घेतला होता. तसेच हा एक मोठा निर्णय असल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र निवडणुकीच्या काळात बिहारमध्ये अनेक ठिकाणी अवैध दारू पकडण्यात आली आहे. त्यामुळे या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.याशिवाय काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यामधून अनेक महत्त्वपूर्ण आश्वसने दिली आहेत. यामध्ये १०० युनिटपर्यंत निम्मे वीजबिल, मुलींना स्कूटी, तरुणांना बेरोजगारी भत्ता, विधवांना पेन्शन, अशी आश्वासने देण्यात आली आहेत.दरम्यान, काँग्रेस प्रमाणेच लोकजनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनीही दारुबंदीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. केवळ दारुबंदी केल्याने महिला सशक्तीकरण झाले आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. तसेच दारुबंदीच्या निर्णयाची योग्य पद्धतीने अंमलबजावणी झाली नाही, असा दावाही त्यांनी केला होता.काँग्रेस बिहारमध्ये महाआघाडीचा घटक पक्ष आहे. या निवडणुकीत काँग्रेस एकूण ७० जागांवर निवडणूक लढवत आहे. बिहारमध्ये २८ ऑक्टोबर रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. दरम्यान, तीन टप्पांमधील मतदान आटोपल्यानंतर १० नोव्हेंबररोजी मतमोजणी होणार आहे.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेसliquor banदारूबंदी