शहरं
Join us  
Trending Stories
1
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
2
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
3
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
4
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
5
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
6
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
7
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
8
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
9
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
10
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
11
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
12
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
13
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
14
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
15
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
16
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
17
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
18
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
19
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
20
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'

Bihar Assembly Election : "कोरोनात मोदी सरकार फेल, पंतप्रधानांनी मजुरांना मदत केली नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2020 3:39 PM

"कोरोना काळात लाखो मजूर पायपीट करून आपल्या घरी येत होते. पण या कोरोनासंकटात मोदी आणि नितीश यांनी मजुरांची मदत केली नाही." (Bihar Assembly Election)

ठळक मुद्देपंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार यांनी एकत्रितपणे बिहारला लुटले आहे - राहुल गांधीराहुल म्हणाले, मजूर पायपीट करत असताना, नितीशजी आणि मोदीजी कुठे होते. बिहारमधील लोकांना बाहेर जाऊन का काम करावे लागते? येथे रोजगार का नाही? असे प्रश्नही राहुल गांधींनी यावेळी उपस्थित केले.

पाटणा -काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी बिहार निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचारार्थ कटिहार येथे एका सभेला संबोधित केले. यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधन नरेंद्र मोदी यांना निशाण्यावर घेतले. राहुल म्हणाले, पंतप्रधान मोदींनी कोरोनाचा सामना करण्यासाठी सर्वप्रथम घंटी वाजवली आणि नंतर फोनची बॅटरी लावायला सांगितली. मात्र, कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय घेतला नाही.

राहुल गांधी म्हणाले, कोरोना काळात लाखो मजूर पायपीट करून आपल्या घरी येत होते. पण या कोरोनासंकटात मोदी आणि नितीश यांनी मजुरांची मदत केली नाही. मात्र, काँग्रेस म्हणाली होती, की आम्ही मजुरांची मदत करू इच्छितो. एवढेच नाही, तर पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार यांनी एकत्रितपणे बिहारला लुटले आहे आणि आता बिहारमधील लोक त्यांना उत्तर देतील, असेही राहुल म्हणाले.

राहुल म्हणाले, मजूर पायपीट करत असताना, नितीशजी आणि मोदीजी कुठे होते. तेव्हा मदत केली नाही आणि आता मतं मागायला येत आहेत. राहुल यांनी आरोप केला, की हे दोघेही केवळ आपल्या धनाड्य मित्रांचीच मदत करत आहेत. एवढेच नाही, तर बिहारमधील लोकांना बाहेर जाऊन का काम करावे लागते? येथे रोजगार का नाही? असे प्रश्नही राहुल गांधींनी यावेळी उपस्थित केले.

राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान मोदी म्हणाले होते, की दोन कोटी लोकांना रोजगार देणार. नितीश कुमारही असेच म्हणाले होते. मात्र, कुणीही आपले आश्वासन पूर्ण केले नाही. मोदींनी संपूर्ण देशाला लाइनमध्ये उभे केले होते. नोटाबंदीच्या काळात केवळ देशातला गरीब नागरीकच रांगेत उभा होता. पंतप्रधान मोदींनी गरिबांच्या खिशातून पैसा काढून तो आपल्या श्रीमंत मित्रांच्या खिशात घातला. एवढेच नाही, तर पूर्वी नोटाबंदी, मग जीएसटी आणि आता शेतकऱ्यांना नष्ट करणारा कायदा तयार करण्यात आला आहे, असेही राहुल गांधी म्हणाले. 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBiharबिहार