शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शेतकरी आंदोलनामागे मूठभर दलाल; बिहारच्या कृषीमंत्र्यांचं वादग्रस्त विधान

By मोरेश्वर येरम | Updated: December 20, 2020 17:27 IST

दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज २५ वा दिवस

ठळक मुद्देबिहारच्या कृषी मंत्र्यांच्या विधानाने मोठा वाद निर्माण होण्याची शक्यतादिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेले शेतकरी नसल्याचं केलं विधानशेतकरी आंदोलन करत नसून मूठभर दलाल आंदोलन करत असल्याचा दावा

पाटणादिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत बिहारचे कृषी मंत्री अमरेंद्र प्रताप सिंह यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. दिल्लीतील आंदोलनाला अमरेंद्र सिंह यांनी दलालांचं आंदोलन असं संबोधलं आहे. बिहारच्या सोनपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं आहे. 

"दिल्ली आणि हरियाणाच्या सीमेवर जे आंदोलन सुरू आहे ते शेतकऱ्यांचं नसून दलालांचं आंदोलन आहे", असं अमरेंद्र सिंह म्हणाले. गेल्या तीन आठवड्यांहून अधिक काळ दिल्लीच्या सीमेवर शेतकरी नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. 

"शेतकरी फक्त दिल्ली आणि हरियाणाच्या सीमेवरच आहेत का? या देशात ५.५ लाख गावं आहेत. कोणत्या गावात शेतकरी आंदोलन सुरू आहे? बिहारचे शेतकरी आंदोलन करत आहेत का? देशाच्या ५.५ लाख गावांमधील शेतकऱ्यांचा या आंदोलनाशी काही संबंध नाही. त्यांना कृषी कायदे हवेत. दिल्लीत फक्त मुठभर दलाल शेतकरी असल्याचं सांगून आंदोलन करत आहेत आणि माध्यमं त्याला मोठं करत आहेत", असं अमरेंद्र सिंह म्हणाले. खरंच जर शेतकऱ्यांचं आंदोलन असतं मग संपूर्ण देशात यास विरोध झाला नसता का?, असा सवालही अमरेंद्र यांनी यावेळी उपस्थित केला. 

दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज २५ वा दिवस आहे. कृषी कायदे पूर्णपणे रद्द केले जाण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. दरम्यान, एनडीएचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे संयोजक हनुमान बेनीवाल यांनीही आता शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ २६ डिसेंबरला २ लाख शेतकऱ्यांसह राजस्थान ते दिल्ली मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलं आहे.  

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपBJPभाजपाBiharबिहार