शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

शेतकरी आंदोलनामागे मूठभर दलाल; बिहारच्या कृषीमंत्र्यांचं वादग्रस्त विधान

By मोरेश्वर येरम | Updated: December 20, 2020 17:27 IST

दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज २५ वा दिवस

ठळक मुद्देबिहारच्या कृषी मंत्र्यांच्या विधानाने मोठा वाद निर्माण होण्याची शक्यतादिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेले शेतकरी नसल्याचं केलं विधानशेतकरी आंदोलन करत नसून मूठभर दलाल आंदोलन करत असल्याचा दावा

पाटणादिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत बिहारचे कृषी मंत्री अमरेंद्र प्रताप सिंह यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. दिल्लीतील आंदोलनाला अमरेंद्र सिंह यांनी दलालांचं आंदोलन असं संबोधलं आहे. बिहारच्या सोनपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं आहे. 

"दिल्ली आणि हरियाणाच्या सीमेवर जे आंदोलन सुरू आहे ते शेतकऱ्यांचं नसून दलालांचं आंदोलन आहे", असं अमरेंद्र सिंह म्हणाले. गेल्या तीन आठवड्यांहून अधिक काळ दिल्लीच्या सीमेवर शेतकरी नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. 

"शेतकरी फक्त दिल्ली आणि हरियाणाच्या सीमेवरच आहेत का? या देशात ५.५ लाख गावं आहेत. कोणत्या गावात शेतकरी आंदोलन सुरू आहे? बिहारचे शेतकरी आंदोलन करत आहेत का? देशाच्या ५.५ लाख गावांमधील शेतकऱ्यांचा या आंदोलनाशी काही संबंध नाही. त्यांना कृषी कायदे हवेत. दिल्लीत फक्त मुठभर दलाल शेतकरी असल्याचं सांगून आंदोलन करत आहेत आणि माध्यमं त्याला मोठं करत आहेत", असं अमरेंद्र सिंह म्हणाले. खरंच जर शेतकऱ्यांचं आंदोलन असतं मग संपूर्ण देशात यास विरोध झाला नसता का?, असा सवालही अमरेंद्र यांनी यावेळी उपस्थित केला. 

दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज २५ वा दिवस आहे. कृषी कायदे पूर्णपणे रद्द केले जाण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. दरम्यान, एनडीएचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे संयोजक हनुमान बेनीवाल यांनीही आता शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ २६ डिसेंबरला २ लाख शेतकऱ्यांसह राजस्थान ते दिल्ली मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलं आहे.  

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपBJPभाजपाBiharबिहार