शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
2
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
3
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७८ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
4
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
5
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
6
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
7
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
8
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
9
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
10
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
11
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
12
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
13
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
14
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
15
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
16
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
17
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
18
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
19
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
20
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...

शेतकरी आंदोलनामागे मूठभर दलाल; बिहारच्या कृषीमंत्र्यांचं वादग्रस्त विधान

By मोरेश्वर येरम | Updated: December 20, 2020 17:27 IST

दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज २५ वा दिवस

ठळक मुद्देबिहारच्या कृषी मंत्र्यांच्या विधानाने मोठा वाद निर्माण होण्याची शक्यतादिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेले शेतकरी नसल्याचं केलं विधानशेतकरी आंदोलन करत नसून मूठभर दलाल आंदोलन करत असल्याचा दावा

पाटणादिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत बिहारचे कृषी मंत्री अमरेंद्र प्रताप सिंह यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. दिल्लीतील आंदोलनाला अमरेंद्र सिंह यांनी दलालांचं आंदोलन असं संबोधलं आहे. बिहारच्या सोनपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं आहे. 

"दिल्ली आणि हरियाणाच्या सीमेवर जे आंदोलन सुरू आहे ते शेतकऱ्यांचं नसून दलालांचं आंदोलन आहे", असं अमरेंद्र सिंह म्हणाले. गेल्या तीन आठवड्यांहून अधिक काळ दिल्लीच्या सीमेवर शेतकरी नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. 

"शेतकरी फक्त दिल्ली आणि हरियाणाच्या सीमेवरच आहेत का? या देशात ५.५ लाख गावं आहेत. कोणत्या गावात शेतकरी आंदोलन सुरू आहे? बिहारचे शेतकरी आंदोलन करत आहेत का? देशाच्या ५.५ लाख गावांमधील शेतकऱ्यांचा या आंदोलनाशी काही संबंध नाही. त्यांना कृषी कायदे हवेत. दिल्लीत फक्त मुठभर दलाल शेतकरी असल्याचं सांगून आंदोलन करत आहेत आणि माध्यमं त्याला मोठं करत आहेत", असं अमरेंद्र सिंह म्हणाले. खरंच जर शेतकऱ्यांचं आंदोलन असतं मग संपूर्ण देशात यास विरोध झाला नसता का?, असा सवालही अमरेंद्र यांनी यावेळी उपस्थित केला. 

दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज २५ वा दिवस आहे. कृषी कायदे पूर्णपणे रद्द केले जाण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. दरम्यान, एनडीएचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे संयोजक हनुमान बेनीवाल यांनीही आता शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ २६ डिसेंबरला २ लाख शेतकऱ्यांसह राजस्थान ते दिल्ली मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलं आहे.  

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपBJPभाजपाBiharबिहार