शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आंदोलनामागे मूठभर दलाल; बिहारच्या कृषीमंत्र्यांचं वादग्रस्त विधान

By मोरेश्वर येरम | Updated: December 20, 2020 17:27 IST

दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज २५ वा दिवस

ठळक मुद्देबिहारच्या कृषी मंत्र्यांच्या विधानाने मोठा वाद निर्माण होण्याची शक्यतादिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेले शेतकरी नसल्याचं केलं विधानशेतकरी आंदोलन करत नसून मूठभर दलाल आंदोलन करत असल्याचा दावा

पाटणादिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत बिहारचे कृषी मंत्री अमरेंद्र प्रताप सिंह यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. दिल्लीतील आंदोलनाला अमरेंद्र सिंह यांनी दलालांचं आंदोलन असं संबोधलं आहे. बिहारच्या सोनपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं आहे. 

"दिल्ली आणि हरियाणाच्या सीमेवर जे आंदोलन सुरू आहे ते शेतकऱ्यांचं नसून दलालांचं आंदोलन आहे", असं अमरेंद्र सिंह म्हणाले. गेल्या तीन आठवड्यांहून अधिक काळ दिल्लीच्या सीमेवर शेतकरी नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. 

"शेतकरी फक्त दिल्ली आणि हरियाणाच्या सीमेवरच आहेत का? या देशात ५.५ लाख गावं आहेत. कोणत्या गावात शेतकरी आंदोलन सुरू आहे? बिहारचे शेतकरी आंदोलन करत आहेत का? देशाच्या ५.५ लाख गावांमधील शेतकऱ्यांचा या आंदोलनाशी काही संबंध नाही. त्यांना कृषी कायदे हवेत. दिल्लीत फक्त मुठभर दलाल शेतकरी असल्याचं सांगून आंदोलन करत आहेत आणि माध्यमं त्याला मोठं करत आहेत", असं अमरेंद्र सिंह म्हणाले. खरंच जर शेतकऱ्यांचं आंदोलन असतं मग संपूर्ण देशात यास विरोध झाला नसता का?, असा सवालही अमरेंद्र यांनी यावेळी उपस्थित केला. 

दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज २५ वा दिवस आहे. कृषी कायदे पूर्णपणे रद्द केले जाण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. दरम्यान, एनडीएचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे संयोजक हनुमान बेनीवाल यांनीही आता शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ २६ डिसेंबरला २ लाख शेतकऱ्यांसह राजस्थान ते दिल्ली मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलं आहे.  

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपBJPभाजपाBiharबिहार