शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मोठी बातमी: भाजपने एका राज्यातील गुंता सोडवला; आंध्र प्रदेशातील जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 00:01 IST

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कोण किती जागांवर लढणार, याबाबतची माहिती नायडू यांच्याकडून देण्यात आली आहे.

Lok Sabha Elections ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून भाजप आणि काँग्रेस हे दोन प्रमुख राजकीय पक्ष निवडणूक रिंगणात उतरण्याआधी नवनवे मित्रपक्ष सोबत घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. अशातच भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएत आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाची घरवापसी झाली असून चंद्राबाबू नायडू यांनी काही वेळापूर्वी जागावाटपाचा फॉर्म्युलाही जाहीर केला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कोण किती जागांवर लढणार, याबाबतची माहिती नायडू यांच्याकडून देण्यात आली आहे.

जागावाटपाविषयी माहिती देताना चंद्राबाबू नायडू यांनी म्हटलं आहे की, "अमरावतीत आज झालेल्या बैठकीत भाजप, टीडीपी आणि जेएसपी या तीन पक्षांनी जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला. या महत्त्वपूर्ण पावलामुळे आता आंध्र प्रदेशातील लोक आपल्या राज्यावर पुन्हा हक्क मिळवण्याकडे आणि उज्वल भविष्याकडे मार्गक्रमण करणार आहे," असा विश्वास नायडू यांनी व्यक्त केला आहे.

कोणता पक्ष किती जागा लढवणार?

चंद्राबाबू नायडू यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशात भाजप लोकसभेच्या ६ आणि विधानसभेच्या १० जागा लढवेल, टीडीपी लोकसभेच्या १७ आणि विधानसभेच्या १४४ तर जेएसपी लोकसभेच्या २ आणि विधानसभेच्या २१ जागा लढवणार आहे.

चंद्राबाबू नायडू हे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या पहिल्या कार्यकाळात एनडीए आघाडीत होते. आता ते पुन्हा एनडीएमध्ये सामील झाल्याने भाजपला आंध्र प्रदेशात राजकीय फायदा होणार हे निश्चित आहे. 

  दरम्यान, 'अब की बार ४०० पार' म्हणत भाजपने यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं आहे. तसेच ४०० जागांच्या दिशेने आगेकूच करण्यासाठी भाजपने मागच्या काही महिन्यांत अनेक अनेक मित्रपक्ष जोडले आहेत. उत्तर प्रदेशात आरएलडी, बिहारमध्ये जेडीयू हे मित्रपक्ष एनडीएमध्ये परतले आहेत. तर ओडिशामध्ये बीजेडी पक्ष एनडीएत येण्याच्या तयारीत आहे. ४०० पारचं लक्ष्य गाठण्यासाठी भाजप आपले मित्रपक्ष वाढवत असल्याचं चित्र आहे. 

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Chandrababu Naiduचंद्राबाबू नायडूBJPभाजपा