शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् १४ चिनी नागरिकांचा जीव वाचला; चीननं मानले भारतीय नौदल आणि मुंबई कोस्ट गार्डचे आभार
2
'सोनम रघुवंशी म्हणत होती बिझी आहे, त्याला समजलंच नाही...!'; राजा रघुवंशीच्या मित्रानं केला मोठा खुलासा
3
विजेच्या धक्क्याने बाप गेलाच, दोन्ही मुलं पाणी घेऊन आली अन् त्यांचेही आयुष्य संपलं!
4
राजा रघुवंशी हत्या प्रकरणी मोठा खुलासा; हत्येनंतर सोनम इंदूरला पोहचली होती अन् त्याठिकाणी...
5
तुरुंगात जाणार हे माहित होते, सोनम हत्येपर्यंत का गेली? राजापासून वेगळे होण्याचे हे सोपे मार्ग होते..., पण...
6
मोठा दावा...! संकटात आलाय भारतातील हा मोठा व्यवसाय...! ५७७००० नोकऱ्या गेल्याचा अंदाज 
7
Raj Kushwaha : "राजचं नाव ऐकलं अन्..."; पोलिसांच्या एका ट्रिकने फेल झाला सोनमचा 'तो' प्लॅन
8
जयंत पाटील म्हणाले, मला सगळ्या जबाबदारीतून मुक्त करा; CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
9
गेम खेळण्यासाठी मोबाईल देणं नाकारलं; आईवडिलांवर चिडलेल्या मुलीनं स्वतःलाच संपवलं!
10
सेन्सेक्स घसरला, निफ्टीची नाममात्र वाढ! 'या' शेअर्सनी केली कमाल, बाजारातून मोठे संकेत!
11
सोनं, चांदी, रोख रक्कम नाही तर हुंड्यात मागितली किडनी, नकार दिला तेव्हा...
12
रस्त्यानं चालताना पाय घसरून पडला, पाठीमागून येणाऱ्या बेस्ट बसनं चिरडलं, गोवंडीतील घटना!
13
फारुक अब्दुल्ला यांचा ‘वंदे भारत’ने प्रवास, चिनाब नदीवरील पुल येताच झाले भावुक; म्हणाले...
14
Austria Shooting: बंदूक घेऊन विद्यार्थी थेट शाळेत घुसला, केला अंदाधुंद गोळीबार; ९ जणांचा मृत्यू, स्वतःलाही संपवलं
15
ICICI आणि HDFC बँकेचा ग्राहकांना धक्का! एका निर्णयामुळे होणार लाखो रुपयांचे नुकसान?
16
पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना ३३७३० रूपये विद्यावेतन मिळणार; कॅबिनेट बैठकीत ३ महत्त्वाचे निर्णय
17
Inspirational: 'या' तीन गोष्टी आजपासून फॉलो करा, पाच वर्षांनी लोक तुम्हाला फॉलो करतील!
18
भारतीयांनी ज्या देशाला 'बॉयकॉट' केलं, त्याचीच ग्लोबल ब्रँड अँबेसिडर बनली कतरिना कैफ
19
अनिल अंबानींच्या कंपनीनं तोडला १० वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड, एकाच महिन्यात कमावले हजारो कोटी

Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 19:43 IST

Rahul Gandhi, Priyanka Gandhi Waynad Seat Contest: काँग्रेसच्या संकटकाळात, राहुल यांना त्यांच्या पारंपरिक मतदारसंघातून विजयाची खात्री नसताना ज्या वायनाडने साथ दिली त्याच मतदारसंघाला सोडण्याचा निर्णय राहुल गांधी यांनी घेतला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा २०१९ मध्ये उत्तर प्रदेशमधील अमेठीमध्ये पराभव झाला होता. परंतू, याची धाकधूक असल्याने राहुल गांधी यांनी केरळचा आसरा घेत वायनाडची जागाही लढविली होती. तेथील जनतेने साथ दिल्याने ते खासदार झाले होते. २०२४ मध्येही राहुल गांधी यांनी वायनाड आणि रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. या दोन्ही मतदारसंघातून ते बहुमताने निवडून आले आहेत. अशातच एका जागेवर पाणी सोडण्याचा आजचा शेवटचा दिवस होता, अखेर राहुल गांधी यांनी तो निर्णय घेतला आहे. 

काँग्रेसच्या संकटकाळात, राहुल यांना त्यांच्या पारंपरिक मतदारसंघातून विजयाची खात्री नसताना ज्या वायनाडने साथ दिली त्याच मतदारसंघाला सोडण्याचा निर्णय राहुल गांधी यांनी घेतला आहे. राहुल यांनी वायनाडची जागा सोडण्याचा निर्णय घेतला असून ते रायबरेली मतदारसंघातून खासदारकी कायम ठेवणार आहेत. तर वायनाडची पोटनिवडणूक प्रियंका गांधी लढविणार असल्याचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले आहे.

यंदाही राहुल यांनी दोन मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. यापैकी वायनाडची जागा 3,64,422 मतांनी जिंकली, तर रायबरेली 3,90,030 मतांनी जिंकली होती. आजारी असल्याने सोनिया गांधी यांनी रायबरेलीतून निवडणूक लढविली नव्हती. यामुळे अमेठी आणि रायबरेलीतून कोण लढणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. गेल्यावेळी स्मृती इराणी यांनी अमेठीतून राहुल यांना पराभूत केले होते. यामुळे यावेळी अमेठीतून काँग्रेसने दुसरा उमेदवार दिला होता. त्याने इराणी यांचा पराभव केला.

आज काँग्रेस नेत्यांच्या झालेल्या बैठकीत देशातील सर्वात मोठ्या राज्यावर लक्ष केंद्रीत करण्याची रणनिती आखण्यात आली आहे. यामुळे राहुल यांनी रायबरेलीतूनच खासदार रहावे असा निर्णय घेण्यात आला. काँग्रेस राज्यातील जनतेसाठी काम करण्यास उत्सुक आहे, असा संदेश जनतेला देण्याचा प्रयत्न काँग्रेसचा आहे. यामुळे आता उत्तर प्रदेशातील १० विधानसभा जागांवरच पोटनिवडणूक होणार आहे. तर केरळमधील एका लोकसभा जागेवर पोटनिवडणूक होणार आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीwayanad-pcवायनाडPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४