शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
2
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
3
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
4
1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....
5
एका अटीवर सलमान खानला माफ करु शकतो बिष्णोई समाज, वाचा काय आहे नेमका तोडगा
6
"वारसा चालवण्यासाठी मुल जन्माला घालण्यात अर्थ नाही, जर..," पाहा काय म्हणाले Zerodhaचे Nikhil Kamath
7
इराणचं चाबहार बंदर भारताच्या ताब्यात; अमेरिकेला मिरची झोंबली, चीन-पाकलाही धक्का
8
होर्डिंग पडलेल्या ठिकाणीच नेते भिडले! संजय दिना पाटील किरीट सोमय्यांवर भडकले
9
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
10
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; श्रीराम फायनान्सचे शेअर्स वधारले, सिप्लाच्या शेअरमध्ये घसरण
12
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
13
सावत्र लेक दिया मिर्झाला म्हणत नाही आई, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "ती मला..."
14
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
15
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
16
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
17
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
18
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
19
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
20
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता

आरक्षणाच्या मुद्द्यावरून चंद्रशेखर आझाद यांनी भागवतांना दिलं खुल्या चर्चेचं आव्हान 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 10:34 AM

आरक्षणाच्या मुद्द्यावरून भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी मोहन भागवत यांना खुल्या चर्चेचं आव्हान दिलं आहे.

ठळक मुद्देआरक्षणाच्या मुद्द्यावरून भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी मोहन भागवत यांना खुल्या चर्चेचं आव्हान दिलं आहे. जातिव्यवस्था संपवण्यासंदर्भात चर्चेमधून संवाद होणं गरजेचं असल्याचं देखील आझाद यांनी म्हटलं आहे.सरकारने आरक्षण रद्द करण्याचा प्रयत्न केला तर लोक रस्त्यावर उतरतील - चंद्रशेखर आझाद

नवी दिल्ली - देशातील आरक्षण व्यवस्थेबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेवर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असते. दरम्यान, सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाबाबत पुन्हा एकदा वक्तव्य केलं आहे. त्यानंतर आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी मोहन भागवत यांना खुल्या चर्चेचं आव्हान दिलं आहे. तसेच जातिव्यवस्था संपवण्यासंदर्भात चर्चेमधून संवाद होणं गरजेचं असल्याचं देखील आझाद यांनी म्हटलं आहे.

चंद्रशेखर आझाद यांनी 'आरक्षणाच्या विरोधात असणाऱ्यांमध्ये चर्चा झाली पाहिजे असं भागवत यांना वाटतं. प्रसारमाध्यमं आणि संबंधित पक्षांच्या समोर मी त्यांना या मुद्द्यावर चर्चा करण्याचे आव्हान देतो. जातिव्यवस्थेमुळे आम्हाला जे काही सहन करावं लागतं ते आम्हाला मांडायचे आहे. भागवत यांनी चर्चेला आलं पाहिजे. स्वातंत्र्यानंतर 72 वर्षांनी 54 टक्के दलितांकडे स्वत: च्या मालकीची जमीन नाही आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आरक्षण व्यवस्थेबद्दल चर्चेचा मुद्दा मांडून आपली दलितविरोधी मानसिकता दाखवून दिली आहे' असं म्हटलं आहे. 

'भागवत यांनी जातीव्यवस्था संपवण्याचा मुद्दा मांडला असता तर भीम आर्मीने त्यांचं समर्थन केलं असतं. जातीव्यवस्थेने देशाला पोखरुन ठेवले आहे. भागवत यांनी यावर चर्चा करायला हवी. सरकारने आरक्षण रद्द करण्याचा प्रयत्न केला तर लोक रस्त्यावर उतरतील' असं देखील चंद्रशेखर आझाद यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात आरक्षणाचे समर्थक आणि विरोधकांनी याविषयी सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केलं होतं. 

एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना भागवत यांनी 'जे लोक आरक्षणाच्या बाजूने आहेत आणि जे विरोधात आहेत, अशांनी याविषयी सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा केली पाहिजे. या संदर्भात मी याआधीही वक्तव्य केले होते. मात्र त्यावेळी खूप विवाद होऊन मूळ मुद्दा भरकटला होता. जे आरक्षणाच्या बाजूने आहेत त्यांनी आरक्षणाच्या विरोधात असणाऱ्यांचे हित विचारात घेऊन बोलले पाहिजे. तसेच जे आरक्षणाच्या विरोधात आहेत त्यांनी आरक्षणाच्या समर्थकांची बाजू समजून घेतली पाहिजे' असं म्हटलं होतं.  

टॅग्स :Chandrashekhar Azadचंद्रशेखर आझादMohan Bhagwatमोहन भागवतreservationआरक्षणBhim Armyभीम आर्मी