शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

Bhavana Gawali Shivsena: खासदार भावना गवळींना धक्का, लोकसभेत शिवसेनेच्या प्रतोद पदावरुन हटवलं; 'या' शिलेदाराकडे सोपवली जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2022 4:57 PM

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना 'अलर्ट मोड'मध्ये

Bhavana Gawali Shivsena: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तब्बल ४० आमदारांसह बंड पुकारत शिवसेनेला धक्का दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेससोबत (Congress) महाविकास आघाडीतून बाहेर पडावे व भाजपसोबत (BJP) सत्तेत यावे अशी बंडखोरांची मागणी होती. पण उद्धव यांनी फारसा सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने बंडखोर आमदारांच्या शिंदे गटाने भाजपासोबत येत महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या खासदारांमध्येही नाराजी असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित शिवसेनेने भाजपसोबत हातमिळवणी करावी असे अप्रत्यक्षपणे सांगितले. त्यानंतर शिवसेनेकडून भावना गवळींनाच धक्का देण्यात आला. लोकसभेत शिवसेनेच्या प्रतोद पदावरुन भावना गवळी यांना हटवण्यात आले असून त्या जागी राजन विचारे (Rajan Vichare) यांची चिफ व्हिप म्हणजे मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती केल्याची माहिती आहे. संजय राऊत यांच्या लेटरहेडवरून हे आदेश जारी करण्यात आले आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमुळे शिवसेना अलर्ट मोडमध्ये गेल्याची चर्चा आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर भावना गवळी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एक पत्र लिहिले. यामध्ये भावना गवळी यांनी एकनाथ शिंदे यांची भूमिका योग्य असल्याचे म्हटले होते. त्यानंतर शिवसेनेचे १२ खासदार फुटणार असल्याची चर्चा रंगली. भावना गवळी या भाजपासोबत जातील अशी भिती शिवसेनेच्या गोटात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने भावना गवळी यांना लोकसभेतील प्रतोद पदावरून दूर केले. भावना गवळी यांच्या जागी ठाण्यातील शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कारण राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकी वेळी प्रतोद पदावरील व्यक्तीचा व्हिप सर्व खासदारांना लागू असणार आहे. त्यामुळे, शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी या संदर्भात संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी पत्र लिहून माहिती दिली आहे.

राऊतांच्या पत्रात भावना गवळी यांच्या जागी शिवसेनेचे लोकसभेतील मुख्य प्रतोद म्हणून खासदार राजन विचारे यांची तात्काळ प्रभावाने निवड झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता यावर भावना गवळी काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागणार आहे. आता भावना गवळीही शिवसेनेची साथ सोडून बाहेर पडणार का याकडे साऱ्यांचेच लक्ष आहे. मुंबईतील शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनीही उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मूर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी विनंती केली होती. त्यामुळे आता शिवसेनेच्या आमदारांपाठोपाठ खासदारांमध्येही बंडखोरी होणार का, याचीच सर्वत्र चर्चा आहे.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBhavna Gavliभावना गवळी