शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

Cabinet Reshuffle: डॉ. भारती पवार मंत्री होताच, प्रीतम मुंडे-रक्षा खडसेंचा लोकसभेत हसतानाचा व्हिडीओ चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 17:06 IST

Dr. Bharati Pawar : बुधवारी महाराष्ट्रातील नव्या शिलेदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. भारती पवार यांनाही देण्यात आलं राज्यमंत्रीपद.

ठळक मुद्देबुधवारी महाराष्ट्रातील नव्या शिलेदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. भारती पवार यांनाही देण्यात आलं राज्यमंत्रीपद.

साऱ्या देशाला अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी होऊन ४३ मंत्र्यांचा राष्ट्रपती भवनामध्ये शपथविधी झाला. त्यामध्ये १५ जणांनी कॅबिनेट तर २८ जणांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना कॅबिनेट तर कपिल पाटील, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. मोदींचे मंत्रिमंडळ आता ७८ जणांचे झाले असून त्यात ३८ नव्या चेहेऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, भारती पवार यांचा शपथविधी झाल्यानंतर त्या लोकसभेत चर्चेदरम्यान बोलतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

डॉ. भारती पवार यांनी बुधवारी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्याकडे आता महिला विकास आणि बाल कल्याण विभागाची धुरा देण्यात आली आहे. दरम्यान, त्यांच्या शपथविधीनंतर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये भारती पवार या लोकसभेतील चर्चेदरम्यान काही प्रश्न मांडताना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्तुती करताना दिसत आहेत. परंतु त्यांच्या मागील रांगेत भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे आणि खासदार रक्षा खडसेही बसलेल्या दिसत आहेत. दरम्यान शेतकरी कर्जमाफीबद्दल फडणवीसांचे आभार व्यक्त करताना प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे यांना हसू येत होतं. तसंच त्यांना हसू इतकं अनावर झालं की त्या बाकाच्या खालीही जाऊन हसल्या. परंतु काही वेळातच त्या पुन्हा गंभीर झाल्या.दरम्यान, या व्हिडीओमध्ये हसताना दिसत असलेल्या प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे या कशावरून हसत आहेत हे मात्र स्पष्ट झालेलं नाही. परंतु पवार यांच्या शपथविधीनंतर अनेकांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. तसंच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ व्हायरलही होत आहे.  काय म्हणाल्या होत्या पवार?"देवेंद्र फडणवीस यांचे कर्जमाफी केल्याबद्दल आभार मानते. महोदय सध्या पाण्यावरून गावा गावात, तालुक्या तालुक्यात, जिल्ह्या जिल्ह्यात वाद आहेत. पुढच्या काळात याच्यावर लक्ष देणे गरजेचे आहे. याचाच विचार करून जलशक्ती मंत्रालय उभारले, त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानते. माझ्या दिंडोरी मतदारसंघातल्या गावांमध्ये २० ते २५ दिवसांनी पाणी येतं. त्यामुळे केंद्र सरकारने वांजूळ दमनगंगा पाणी योजना असेल तसेच मांजरपाडा २ याच्यासारखे प्रकल्प मार्गी लाऊन नाशिक जिल्ह्यासह जळगाव, नगर व मराठवाड्याला न्याय द्यावा ही विनंती करते," असं त्या ४२ सेकंदांच्या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत. 

टॅग्स :Dr Bharti Pawarडॉ. भारती पवारNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFarmerशेतकरीPritam Mundeप्रीतम मुंडेSocial Mediaसोशल मीडियाMaharashtraमहाराष्ट्र