शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनचा कब्जा, केंद्र सरकारचं मौन, शशी थरूर यांचा आरोप
3
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
4
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
5
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
6
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
7
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
8
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
9
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
10
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
11
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
12
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
13
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
14
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
15
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
16
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
17
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
18
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
19
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
20
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."

'भारतीय जनता पक्ष सर्वांच्या मतांचा आदर करतो'; CM योगी आदित्यनाथ यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 2:19 PM

तीनही कृषी कायदे मागे घेण्याच्या मुद्द्यावर बोलताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले.

लखनऊ: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशाला संबोधित करताना तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. या निर्णयानंतर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 'भारतीय जनता पक्ष सर्वांच्या मतांचा आदर करतो. सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करायला हवे', अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

'पंतप्रधानांचे आभार'

कृषी कायद्यांवर बोलताना मुख्यमंत्री योगी म्हणाले, 'मी पंतप्रधान मोदींचे आभार मानतो आणि त्यांनी उचललेल्या या पावलाचे स्वागत करतो. असे कायदे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यात अत्यावश्यक भूमिका बजावू शकतात. पण शेतकऱ्यांचा एक मोठा गट या कायद्यांच्या विरोधात आहे. त्यांच्या भावनांचा आदर करत हे कायदे परत घेण्यात आले आहेत,' असेही ते म्हणाले.

...तोपर्यंत आंदोलन परत घेणार नाहीपीएम मोदींनी कृषी कायदा मागे घेण्याची घोषणा करताना शेतकऱ्यांना घरी परतण्याचे आवाहन केले होते. या सगळ्यात शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणारे शेतकरी नेते राकेश तिकट यांनी शेतकरी आंदोलन तातडीने मागे घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचे संकेत दिले आहेत. तिकैट म्हणाले की, संसदेत कृषीविषयक कायदे रद्द होतील त्या दिवसाची आम्ही वाट पाहणार आहोत. याशिवाय, सरकारने एमएसपीसोबतच शेतकऱ्यांशी संबंधित इतर समस्यांवरही चर्चा करावी, असेही तिकैट म्हणाले आहेत. 

विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला

सरकारच्या या निर्णयानंतर देशभरातील नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटले की, 'देशाच्या अन्नदात्याने गर्विष्ठांची मान झुकवली. अन्यायाविरुद्धच्या या विजयाबद्दल अभिनंदन! जय हिंद, जय हिंदचा शेतकरी!'. त्याचवेळी, काँग्रेसने ट्विट करून 'अभिमान तुटला, माझ्या देशाचा शेतकरी जिंकला' असे म्हटले आहे. 

 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथNarendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरी