शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

जेव्हा राहुल गांधींना राग येतो; सेल्फे घेणाऱ्या काँग्रेस नेत्याचा हात झटकला, पाहा Video...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 14:54 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 'भारत जोडो यात्रा' बुधवारी सकाळी राजस्थानमधून हरियाणात दाखल झाली.

Bharat Jodo Yatra:काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा बुधवारी सकाळी राजस्थानमधून हरियाणात दाखल झाली. यावेळी फ्लॅग एक्सचेंज सोहळ्यात राहुल गांधी संतापले. राहुलचा राग पाहून सहकारी नेतेही आश्चर्यचकित झाले होते. कार्यक्रमादरम्यान स्टेजवर एक नेता सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होता. मात्र राहुल गांधींनी रागाने हात झटकला आणि फोन काढून घेतला. राहुल का संतापले, हे समजू शकले नाही.

सहकारी नेत्यांचे कौतुकयावेळी राहुल गांधींनी आपल्या सहकारी नेत्यांचे कौतुक केले. राहुल म्हणाले, 'मला आनंद आहे की, राजस्थानचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, सर्व मंत्री आणि नेत्यांनी महिन्यातून किमान एकदा 15 किलोमीटर चालण्याचा निर्णय घेतला आहे. जनतेचे म्हणणे ऐकून ते काम करणार आहेत. मी खर्गेजींना सांगेल की, जिथे जिथे काँग्रेसचे सरकार आहे, तिथे आपल्या मंत्र्यांना-नेत्यांना महिन्यातून किमान एक दिवस या रस्त्यांवर चालून जनतेच्या समस्या सोडवण्यास सांगावे.

भाजपवर बोचरी टीकाराहुल पुढे म्हणाले की, या प्रवासात खूप काही शिकायला मिळत आहे. प्रवासात आपण लांबलचक भाषणे देत नाही. सहा वाजता प्रवास सुरू होतो, आम्ही सहा ते सात तास चालतो आणि नंतर 15 मिनिटांचे भाषण देतो. आजकाल नेता आणि जनता यांच्यात दरी निर्माण झाली आहे. जनतेचे ऐकण्याची गरज नाही, असे नेत्यांना वाटते. तासन्तास लांबलचक भाषणे देतात. आम्ही फक्त बोलत नाही, तर जनतेचे म्हणणे ऐकतो. 

मालखेडा सभेच्या चर्चेचा पुनरुच्चार करत राहुल म्हणाले की, भाजप नेत्यांनी विचारले की यात्रेची गरज काय? तर आम्ही द्वेषाच्या जगात प्रेम पसरवत आहोत. जेव्हा जेव्हा हे लोक या देशात द्वेष पसरवायला जातात तेव्हा आपल्या विचारसरणीचे लोक प्रेम पसरवायला लागतात. हा लढा नवीन नाही, हा लढा हजारो वर्षे जुना आहे. यामध्ये दोन विचारधारा कार्यरत आहेत. एक विचारधारा जी निवडकपणे लोकांना फायदेशीर ठरते आणि दुसरी विचारधारा म्हणजे लोकांचा आवाज. तो शेतकरी, मजुराचा आवाज आहे, त्याची विचारधारा आहे., अशी टीकाही राहुल यांनी केली.

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस