शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

मुलं पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून काँग्रेस नेत्यांना बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 3:49 PM

मध्य प्रदेशमधील बैतूल जिल्ह्यामध्ये मुलांना पळवून नेणारी टोळी असल्याच्या संशयावरून तीन जणांना बेदम मारहाण करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमध्य प्रदेशमधील बैतूल जिल्ह्यामध्ये मुलांना पळवून नेणारी टोळी असल्याच्या संशयावरून तीन जणांना मारहाण करण्यात आली आहे. काँग्रेसच्या दोन नेत्यांचा आणि एका सामाजिक कार्यकर्त्याचा समावेश आहे.तीन ही जण जखमी झाले आहेत तसेच कारचेही नुकसान झाले आहे.

भोपाळ - मध्य प्रदेशमधील बैतूल जिल्ह्यामध्ये मुलांना पळवून नेणारी टोळी असल्याच्या संशयावरून तीन जणांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. यामध्ये काँग्रेसच्या दोन नेत्यांचा आणि एका सामाजिक कार्यकर्त्याचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे धर्मेंद्र शुक्ला, रामू सिंह लांजीवार आणि ललित बरास्कर हे गुरुवारी रात्री आपल्या कारने घरी परतत होते. शाहपूर ते केसियादरम्यान ते प्रवास करत असताना त्यांना रस्त्यावर झाडाच्या काही फांद्या पडलेल्या दिसल्या. त्याचवेळी गावातील काही मंडळींनी त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. यामध्ये तीन ही जण जखमी झाले आहेत तसेच कारचेही नुकसान झाले आहे.

बैतूल जिल्ह्यामध्ये काही दिवसांपासून लहान मुलांना चोरणारी टोळी सक्रिय झाली असल्याची अफवा पसरली आहे. त्यामुळे काँग्रेस नेते जेव्हा कारने प्रवास करत होते तेव्हा ते तिघे मुलांना पळवणाऱ्या टोळीचे सदस्य असल्याचा संशय गावकऱ्यांना आला. गावकऱ्यांनी गाडी अडवली आणि कारमधून बाहेर काढून त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत काँग्रेसचे धर्मेंद्र शुक्ला, रामू सिंह लांजीवार आणि ललित बरास्कर जखमी झाले आहेत. शाहपूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी दीपक पराशर यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटेनची माहिती मिळताच आम्ही तातडीने घटनास्थळी दाखल झालो. मात्र आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेश