शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

पिण्याच्या पाण्याने गाड्या धुतल्या...; बंगळुरूमध्ये 22 जणांवर गुन्हा दाखल, 1.10 लाखांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 13:19 IST

पाण्याचे संकट इतके भीषण आहे की, पिण्याच्या पाण्याच्या इतर वापरावर बंदी घातल्यापासून आतापर्यंत तब्बल 22 जणांवर एफआयआर नोंदवण्यात आला आहे, तर एक लाखांहून अधिक दंड ठोठावण्यात आला आहे.

भारतातील सिलिकॉन व्हॅली बंगळुरू सध्या भीषण जलसंकटाचा सामना करत आहे. राज्यातील 240 पैकी 223 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पाण्याचे संकट इतके भीषण आहे की, पिण्याच्या पाण्याच्या इतर वापरावर बंदी घातल्यापासून आतापर्यंत तब्बल 22 जणांवर एफआयआर नोंदवण्यात आला आहे, तर एक लाखांहून अधिक दंड ठोठावण्यात आला आहे.

बंगळुरू वॉटर सप्लाय अँड सीवरेज बोर्डाने (BWSSB) मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात शहरातील पिण्याचे पाणी वाहन धुण्यासाठी, बागकाम, बांधकाम आणि इतर कारणांसाठी वापरण्यास बंदी घातली होती. बोर्डाचे चेअरमन राम प्रशांत मनोहर सांगतात की, आम्हाला दक्षिण-पूर्व भागातून सर्वाधिक तक्रारी येत होत्या. आम्ही जनतेला पाण्याचा योग्य वापर करण्याचे आवाहन केले असून तसा इशाराही दिला आहे.

1.10 लाख रुपयांचा दंड वसूल

रिपोर्टनुसार, इतर कारणांसाठी पिण्याचे पाणी वापरल्याबद्दल बंगळुरूमधील 22 कुटुंबांना प्रत्येकी 5,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. अशाप्रकारे आतापर्यंत एकूण 1.10 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात होळीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने काही नियम लागू केले होते. बोर्डाने कावेरी नदी किंवा बोअरवेलचे पाणी होळीची पूल पार्टी आयोजित करण्यासाठी वापरू नये असे सांगितले होते.

दररोज पन्नास कोटी लिटर पाण्याची टंचाई

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी यापूर्वी म्हटले होते की, बंगळुरूमध्ये पाण्याचे संकट सातत्याने वाढत आहे. बंगळुरूला दररोज सुमारे पन्नास कोटी लिटर पाण्याची टंचाई भासत आहे. शहराला दररोज 147 कोटी लिटर पाणी कावेरी नदीतून मिळते तर 65 कोटी लिटर पाणी बोअरवेलमधून येते.

चाळीस वर्षांतील सर्वात मोठ्या जलसंकटाचा सामना

कर्नाटक गेल्या चाळीस वर्षांतील सर्वात मोठ्या जलसंकटाचा सामना करत आहे. अलीकडेच, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार म्हणाले होते की, गेल्या 30 ते 40 वर्षांत इतका दुष्काळ आपण पाहिला नाही. यापूर्वीही येथे दुष्काळ पडला आहे. मात्र आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणावर परिसर दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केलेले नाहीत. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातWaterपाणीBengaluruबेंगळूर