शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

भाजपला टक्कर देण्यासाठी तृणमूलनं बदलली रणनीती; राज्य वाचवू शकणार का ममता दीदी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 06:58 IST

मावळत्या वर्षातील मोठा बदल; बदलत्या राजकारणात ममता बॅनर्जींचा नवा पवित्रा

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भाजपने तृणमूल काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडारे पाडली हा या राज्याच्या राजकारणातील यंदाच्या वर्षातला सर्वात मोठा बदल आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्यावर सर्वसमावेशकतेची भूमिका बाजूला ठेवून बंगाली अस्मितेचा उदोउदो करीत राजकारण करायची पाळी आली आहे.२०१४ च्या लोकसभा निवडणुकांत पश्चिम बंगालमध्ये केवळ दोन जागा जिंकता आलेल्या भाजपने २०१९ च्या निवडणुकांत त्या राज्यातील ४२ पैकी १८ जागांवर विजय मिळविला. राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावण्याची आस असलेल्या तृणमूल काँग्रेसला या पराभवामुळे आपली भूमिका बदलणे भाग पडले.तृणमूल काँग्रेसला २२ जागांवर विजय मिळाला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जिंकलेल्या जागांच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकांत तृणमूल काँग्रेसला लोकसभेच्या १२ जागा गमवाव्या लागल्या. या निवडणुकांत राज्यामध्ये भाजप, तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चकमकीही झाल्या. राज्यात भाजपचा वाढता प्रभाव पाहून अस्वस्थ झालेल्या ममता बॅनर्जी यांनी आगामी विधानसभा निवडणुकांत पक्षाची कामगिरी उत्तम व्हावी यासाठी आखणी सुरू केली आहे. त्यांच्या सरकारने विविध नव्या योजनांची अंमलबजावणी सुरू केली. याचाच भाग म्हणून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आता बंगाली अस्मितेचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला आहे. बदलत्या राजकारणात ममता बॅनर्जी कोणता निर्णय घेणार ते आगामी काळात दिसणार आहे. (वृत्तसंस्था)एनआरसी, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोधदेशभरात हिंदी भाषा सर्वात जास्त बोलली जात असल्याचा उल्लेख केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला होता. एक देश एक भाषा या सूत्राचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुरस्कार केला होता. हिंदी भाषा देशाच्या एकात्मतेत महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असेही ते म्हणाले होते.त्याला दक्षिण भारतातील राज्यांबरोबरच ममता बॅनर्जी यांनीही विरोध केला. केंद्र सरकारने हिंदी भाषा बंगाली जनतेवर लादली आहे, असा प्रचार तृणमूल काँग्रेसने सुरू केला. त्यावर शहा यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, असे म्हटले होते.माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांची बीसीसीआयच्या प्रमुखपदी तसेच अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्रासाठी मिळालेले नोबेल हा बंगाली लोकांसाठी अभिमानाचा क्षण आहे, असे ममता बॅनर्जी यांनी आवर्जून सांगितले होते.आसाममध्ये राबविण्यात येणारी एनआरसी योजना तसेच नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात ममता बॅनर्जी ठामपणे उभ्या राहिल्या. त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. जाहीर सभा घेतल्या. त्यामध्ये भाजप हा बंगालीविरोधी पक्ष आहे, असे आवर्जून सांगितले.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाBJPभाजपा