शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडूत चेंगराचेंगरीमुळे गेला ३१ जणांचा जीव, अभिनेत्याला पाहण्याचा नादात मृत्यू, आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
5
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
6
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
7
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
8
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
9
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
10
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
11
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
12
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
13
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
14
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
15
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
16
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
17
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
18
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
19
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
20
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी

बंगाल : तृणमूल काँग्रेसला राज्यात पर्याय नाही, कोणत्याही पक्षानं जागा घेणं अशक्य - ममता बॅनर्जी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 21:18 IST

ममता बॅनर्जींनी केला भाजपवर हल्लाबोल

ठळक मुद्देभाजपानं देश विकल्याचा ममता बॅनर्जींनी केला आरोपसोनार भारत संपवणारे सोनार बांगालाच्या गोष्टी करतायत, बॅनर्जींचा भाजपवर हल्लाबोल

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला कोणताही पर्याय नाही. तसंच कोणताही राज्यात याचं स्थान घेऊ शकत नाही. तृणमूल काँग्रेसला केवळ तृणमूल काँग्रेस हाच एक पर्याय आहे," असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी विरोधकांवर निशाणा साधला. पुढील काही दिवसांमध्ये पश्चिम बंगालच्या निवडणुका पार पडणार आहेत. अशा परिस्थितीत आतापासूनच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. तृणमूल काँग्रेसच्या बैठकीदरम्यान कोणताही पक्ष आपल्या पक्षाची जागा घेऊ शकत नाही आणि तृणमूल काँग्रेसनं जनतेच्या हिताची कामं करणारं जागातील चांगलं सरकार दिल्याचंही त्या म्हणाल्या.यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला. "भाजपनं सोनार भारत संपवला आणि आता ते सोनार बांगलाची गोष्ट करत आहेत. भगवा दल सोशल मीडियाच्या माध्यमातून दुष्प्रचार करत आहे. अम्फान चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या लोकांच्या मदतीसाठी आम्ही शक्य ती मदत केली. परंतु एक दोन गोष्टींसाठी आम्हाला टीकेचा सामना करावा लागला," असंही बॅनर्जी म्हणाल्या. "भाजपनं देश विकला आहे आणि पश्चिम बंगालवर नजर टाकण्यापूर्वी त्यांनी आरसा पाहिला पाहिजे. केंद्र सरकारनं सीएए कायदा मागे घेतला पाहिजे. याचं अस्तित्व देशाच्या नागरिकांसाठी धोक्याचं आहे," असा दावाही त्यांनी केला. पश्चिम बंगालमध्ये या वर्षी एप्रिल महिन्याच्या जवळपास विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरिस किंवा मार्च महिन्याच्या सुरूवातीला निवडणूक आयोगाद्वारे निवडणुकांची घोषणा केली जाऊ शकते. निवडणुकांपूर्वी अनेकांनी तृणमूल काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपाElectionनिवडणूक