शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

खेळणीनिर्मितीत अग्रेसर व्हा - पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 04:20 IST

जगातील खेळणीनिर्मिती उद्योगातून ७ लाख कोटी रुपयांची उलाढाल होते. मात्र, त्यामध्ये भारताचा वाटा अगदीच नगण्य आहे. त्यामुळे देशातील स्टार्टअप कंपन्यांनी खेळण्यांच्या निर्मितीत उतरले पाहिजे.

नवी दिल्ली : खेळणी बनविण्यामध्ये भारत जगातील अग्रेसर देश बनू शकतो. त्यासाठी स्टार्टअप कंपन्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ या कार्यक्रमात सांगितले.ते म्हणाले की, जगातील खेळणीनिर्मिती उद्योगातून ७ लाख कोटी रुपयांची उलाढाल होते. मात्र, त्यामध्ये भारताचा वाटा अगदीच नगण्य आहे. त्यामुळे देशातील स्टार्टअप कंपन्यांनी खेळण्यांच्या निर्मितीत उतरले पाहिजे. स्थानिक स्तरावरील खेळण्यांच्या निर्मिती व प्रसारावरही अधिक लक्ष दिले पाहिजे. देशातील तरुण व्यावसायिकांनी कॉम्प्युटर गेम विकसित केले पाहिजेत. ही आत्मनिर्भर भारतासाठी महत्त्वाची गोष्ट आहे.देशातील तरुणांनी मायक्रोब्लॉगिंगसाठी असलेले कू, चिंगारी हे मोबाईल अ‍ॅप लोकप्रिय होत आहेत. कुटुकीकिड्स लर्निंग अ‍ॅप हेदेखील लहान मुलांना गणित, विज्ञान शिकविण्यासाठी खूप उपयोगी पडणारे आहे. भारतात बनविलेली ही अ‍ॅप लोकप्रिय होणे हे आत्मनिर्भर भारतासाठी चांगले चिन्ह आहे, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.त्यांनी सांगितले की, कोरोना साथीच्या काळात जनतेने अत्यंत संयम राखून सण साधेपणाने साजरे केले. सध्या सणासुदीचे दिवस असले तरी लोकांनी शिस्त पाळून कोरोनाचा अधिक फैलाव होणार नाही, याची काळजीही घेतली आहे. आमचे सण व निसर्ग यांच्यात जवळिकीचे नाते आहे.अज्ञात वीरांची माहिती उजेडात आणादेशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या घटनेला २०२२ साली ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत. स्वातंत्र्य चळवळीतील अनेक अज्ञात वीरांच्या योगदानाची माहिती मिळवून ती शिक्षकांनी जगासमोर आणावी. या शौर्यगाथा आपल्या देशातील युवकांना माहीत असायला हव्यात.भारतीय वंशाची कुत्री पाळादेशातील नागरिकांनी भारतीय वंशाची कुत्री पाळण्यास प्राधान्य दिले पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. स्फोटके शोधण्याची उत्तम कामगिरी बजावणाऱ्या सोफी व विदा या भारतीय लष्करी पथकातील प्रशिक्षित श्वानांचा चीफ आॅफ आर्मी स्टाफ यांच्यातर्फे नुकताच सत्कार करण्यात आला होता. त्या श्वानांच्या कामगिरीमुळे अनेक बॉम्बस्फोट टळले, असा उल्लेख नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये केला.परीक्षा पे चर्चा हवी होती -राहुल गांधीपंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’मध्ये नीट, जेईई परीक्षेच्या मुद्यावर बोलतील, अशी विद्यार्थ्यांना आशा होती; परंतु पंतप्रधान खेळणींवर बोलले, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी टिष्ट्वटरवर व्यक्त केली आहे. ‘मन की नहीं स्टुडन्ट की बात’ अशा हॅशटॅगचा वापर करून राहुल गांधी यांना टष्ट्वीटमध्ये म्हटले की, पंतप्रधान ‘परीक्षा पे’ चर्चा करतील, अशी जेईई, नीट परीक्षार्थींना आशा होती; परंतु पंतप्रधानांनी ‘खिलौने पे’ चर्चा केली. कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही परीक्षा स्थगित करण्यात याव्यात, अशी मागणी काही घटकांंकडून केली जात आहे. या मागणीला राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMan ki Baatमन की बातIndiaभारतbusinessव्यवसाय