शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुद्धाचे संकेत? 'या' २१ देशात प्रवास करू नका; अमेरिकन नागरिकांसाठी Travel Advisory जारी
2
बंडखोरांसह ३२ जणांचं ६ वर्षासाठी निलंबन; छुपा प्रचार करणाऱ्यांची गय करणार नाही, भाजपाचा इशारा
3
द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
4
"माझं खरं नाव आशिष नाही तर अब्दुल..."; लव्ह जिहादवरून नितेश राणेंचा पुन्हा प्रहार
5
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपाच्या ५ आमदारांचा 'लेटर बॉम्ब'; गुजरातमध्ये उडाली खळबळ
6
"मागच्या जन्मी पाप करणारा नगरसेवक-महापौर होतो" मुख्यमंत्री गंमतीने असं का म्हणाले?
7
पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट
8
EXCLUSIVE: अजित पवार-शरद पवार दोघेही एकत्र भाजपसोबत आले तर काय...? CM फडणवीसांनी दिलं उत्तर
9
भारत-न्यूझीलंड T-20 सीरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; तिलक वर्मा संघाबाहेर...
10
२३४ पैकी ५६ जागा अन् ३ मंत्रिपदाची मागणी, शाहांनी आखली रणनीती; तामिळनाडूत भाजपाचं गणित काय?
11
ठाकरे माझे मतदार! मत मागण्यासाठी मातोश्रीवर पोहोचला शिंदेसेनेचा उमेदवार, सारेच अवाक्, त्यानंतर घडलं असं काही? 
12
दुसऱ्याची चूक आणि करोडपती झाला ट्रेडर, ४० कोटी आले खात्यात, पण प्रकरण गेलं कोर्टात, अखेरीस...
13
"त्याच रात्री मी फडणवीसांना म्हणालो, असे असेल तर मी राजकारणातून बाहेर पडतो", गणेश नाईकांनी सांगितलं प्रकरण काय?
14
एक लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असता; अमेरिकेत दोन भारतीयांनी केला 'हा' मोठा गुन्हा
15
EXCLUSIVE: "१६ तारखेनंतर आम्ही पुन्हा एकत्र चहा घेऊ..."; राज ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हणाले CM फडणवीस?
16
"डोनाल्ड ट्रम्प हिटलर बनलेत, संपूर्ण जगावर नियंत्रण मिळवायचंय, एक ना एक दिवस आपल्यालाही..."
17
Realme चा धमाका! २००MP कॅमेरा, AI ची कमाल, दमदार फीचर्ससह पॉवरफुल स्मार्टफोन लाँच
18
काका-पुतणे एकत्र येणार? अजित पवार स्पष्टच म्हणाले, "यावरून काय ओळखायचं ते ओळखा"
19
२९ किलो सोनं, रोख रक्कम, DRI ने रॅकेटचा कार्यक्रम केला; कुठे झाली कारवाई, छाप्यात किती कोटी मिळाले?
20
Vijay Hazare Trophy Quarter Finals Full Schedule : मुंबईसह हे ८ संघ क्वार्टर फायनलमध्ये; इथं पाहा संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

खेळणीनिर्मितीत अग्रेसर व्हा - पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 04:20 IST

जगातील खेळणीनिर्मिती उद्योगातून ७ लाख कोटी रुपयांची उलाढाल होते. मात्र, त्यामध्ये भारताचा वाटा अगदीच नगण्य आहे. त्यामुळे देशातील स्टार्टअप कंपन्यांनी खेळण्यांच्या निर्मितीत उतरले पाहिजे.

नवी दिल्ली : खेळणी बनविण्यामध्ये भारत जगातील अग्रेसर देश बनू शकतो. त्यासाठी स्टार्टअप कंपन्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ या कार्यक्रमात सांगितले.ते म्हणाले की, जगातील खेळणीनिर्मिती उद्योगातून ७ लाख कोटी रुपयांची उलाढाल होते. मात्र, त्यामध्ये भारताचा वाटा अगदीच नगण्य आहे. त्यामुळे देशातील स्टार्टअप कंपन्यांनी खेळण्यांच्या निर्मितीत उतरले पाहिजे. स्थानिक स्तरावरील खेळण्यांच्या निर्मिती व प्रसारावरही अधिक लक्ष दिले पाहिजे. देशातील तरुण व्यावसायिकांनी कॉम्प्युटर गेम विकसित केले पाहिजेत. ही आत्मनिर्भर भारतासाठी महत्त्वाची गोष्ट आहे.देशातील तरुणांनी मायक्रोब्लॉगिंगसाठी असलेले कू, चिंगारी हे मोबाईल अ‍ॅप लोकप्रिय होत आहेत. कुटुकीकिड्स लर्निंग अ‍ॅप हेदेखील लहान मुलांना गणित, विज्ञान शिकविण्यासाठी खूप उपयोगी पडणारे आहे. भारतात बनविलेली ही अ‍ॅप लोकप्रिय होणे हे आत्मनिर्भर भारतासाठी चांगले चिन्ह आहे, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.त्यांनी सांगितले की, कोरोना साथीच्या काळात जनतेने अत्यंत संयम राखून सण साधेपणाने साजरे केले. सध्या सणासुदीचे दिवस असले तरी लोकांनी शिस्त पाळून कोरोनाचा अधिक फैलाव होणार नाही, याची काळजीही घेतली आहे. आमचे सण व निसर्ग यांच्यात जवळिकीचे नाते आहे.अज्ञात वीरांची माहिती उजेडात आणादेशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या घटनेला २०२२ साली ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत. स्वातंत्र्य चळवळीतील अनेक अज्ञात वीरांच्या योगदानाची माहिती मिळवून ती शिक्षकांनी जगासमोर आणावी. या शौर्यगाथा आपल्या देशातील युवकांना माहीत असायला हव्यात.भारतीय वंशाची कुत्री पाळादेशातील नागरिकांनी भारतीय वंशाची कुत्री पाळण्यास प्राधान्य दिले पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. स्फोटके शोधण्याची उत्तम कामगिरी बजावणाऱ्या सोफी व विदा या भारतीय लष्करी पथकातील प्रशिक्षित श्वानांचा चीफ आॅफ आर्मी स्टाफ यांच्यातर्फे नुकताच सत्कार करण्यात आला होता. त्या श्वानांच्या कामगिरीमुळे अनेक बॉम्बस्फोट टळले, असा उल्लेख नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये केला.परीक्षा पे चर्चा हवी होती -राहुल गांधीपंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’मध्ये नीट, जेईई परीक्षेच्या मुद्यावर बोलतील, अशी विद्यार्थ्यांना आशा होती; परंतु पंतप्रधान खेळणींवर बोलले, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी टिष्ट्वटरवर व्यक्त केली आहे. ‘मन की नहीं स्टुडन्ट की बात’ अशा हॅशटॅगचा वापर करून राहुल गांधी यांना टष्ट्वीटमध्ये म्हटले की, पंतप्रधान ‘परीक्षा पे’ चर्चा करतील, अशी जेईई, नीट परीक्षार्थींना आशा होती; परंतु पंतप्रधानांनी ‘खिलौने पे’ चर्चा केली. कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही परीक्षा स्थगित करण्यात याव्यात, अशी मागणी काही घटकांंकडून केली जात आहे. या मागणीला राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMan ki Baatमन की बातIndiaभारतbusinessव्यवसाय