शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

अरुणाचल असो वा काश्मीर... आम्ही कुठेही घेऊ शकतो जी-२० च्या बैठका, PM मोदींनी ठणकावले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2023 6:27 PM

Narendra Modi: राजधानी दिल्लीमध्ये ९ आणि १० सप्टेंबर रोजी २०-२० शिखर संमेलन होत आहे. या संमेलनासाठी जगातील २० शक्तिशाली देशांचे प्रमुख दिल्लीत येणार असल्याने संपूर्ण जगाच्या नजरा दिल्लीकडे लागलेल्या आहेत.

राजधानी दिल्लीमध्ये ९ आणि १० सप्टेंबर रोजी २०-२० शिखर संमेलन होत आहे. या संमेलनासाठी जगातील २० शक्तिशाली देशांचे प्रमुख दिल्लीत येणार असल्याने संपूर्ण जगाच्या नजरा दिल्लीकडे लागलेल्या आहेत. त्यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेश आणि काश्मीरच्या प्रश्नावरून चीन आणि पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत. आम्ही बैठका कुठे घ्यायच्या हे सांगण्याचा अधिकार हा या दोन्ही देशांना नाही. त्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताकडून जी-२०च्या बैठका काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशमध्ये आयोजित करण्याबाबत पाकिस्तान आणि चीनने घेतलेले आक्षेप फेटाळून लावले आहेत. यजमान देशानं त्याच्या कुठल्याही भागात बैठका घेणं स्वाभाविक आहे. तसेच हा त्या देशाचा अंतर्गत प्रश्न आहे. 

भारताने मे महिन्यामध्ये कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत चीन आणि पाकिस्तानचा विरोध झुगारून लावत काश्मीरमध्ये जी-२०ची पर्यटनविषयक बैठक आयोजित केली होती. चीन आणि पाकिस्तानने हा भाग वादग्रस्त असल्याचं सांगत या बैठकांना आक्षेप घेतला होता. चीन हा जी-२० देश आहे. तर पाकिस्तान या संघटनेचा सदस्य नाही आहेत चीन भारताचं राज्य असलेल्या अरुणाचल प्रदेशवरही दावा ठोकत असतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जर आम्ही त्या ठिकांणी बैठका घेतल्या नसत्या तर त्याबाबत उपस्थित केले जाणारे प्रश्न वैध ठरले असते. आमचा देश एवढा विशाल, सुंदर आणि वैविध्यपूर्ण आहे. जेव्हा जी-२० च्या बैठका होत आहेत तेव्हा त्या आमच्या देशातील प्रत्येक भागात होणं स्वाभाविक नाही काय?  एका दशकापेक्षा कमी काळात अर्थव्यवस्थेमध्ये पाच स्थानांनी प्रगती करणाऱ्या भारताच्या रेकॉर्डचा हवाला देत मोदींनी पुढच्या काही काळात भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये असेल, असा दावाही केला.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतchinaचीनPakistanपाकिस्तान