शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

अरुणाचल असो वा काश्मीर... आम्ही कुठेही घेऊ शकतो जी-२० च्या बैठका, PM मोदींनी ठणकावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 18:28 IST

Narendra Modi: राजधानी दिल्लीमध्ये ९ आणि १० सप्टेंबर रोजी २०-२० शिखर संमेलन होत आहे. या संमेलनासाठी जगातील २० शक्तिशाली देशांचे प्रमुख दिल्लीत येणार असल्याने संपूर्ण जगाच्या नजरा दिल्लीकडे लागलेल्या आहेत.

राजधानी दिल्लीमध्ये ९ आणि १० सप्टेंबर रोजी २०-२० शिखर संमेलन होत आहे. या संमेलनासाठी जगातील २० शक्तिशाली देशांचे प्रमुख दिल्लीत येणार असल्याने संपूर्ण जगाच्या नजरा दिल्लीकडे लागलेल्या आहेत. त्यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेश आणि काश्मीरच्या प्रश्नावरून चीन आणि पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत. आम्ही बैठका कुठे घ्यायच्या हे सांगण्याचा अधिकार हा या दोन्ही देशांना नाही. त्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताकडून जी-२०च्या बैठका काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशमध्ये आयोजित करण्याबाबत पाकिस्तान आणि चीनने घेतलेले आक्षेप फेटाळून लावले आहेत. यजमान देशानं त्याच्या कुठल्याही भागात बैठका घेणं स्वाभाविक आहे. तसेच हा त्या देशाचा अंतर्गत प्रश्न आहे. 

भारताने मे महिन्यामध्ये कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत चीन आणि पाकिस्तानचा विरोध झुगारून लावत काश्मीरमध्ये जी-२०ची पर्यटनविषयक बैठक आयोजित केली होती. चीन आणि पाकिस्तानने हा भाग वादग्रस्त असल्याचं सांगत या बैठकांना आक्षेप घेतला होता. चीन हा जी-२० देश आहे. तर पाकिस्तान या संघटनेचा सदस्य नाही आहेत चीन भारताचं राज्य असलेल्या अरुणाचल प्रदेशवरही दावा ठोकत असतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जर आम्ही त्या ठिकांणी बैठका घेतल्या नसत्या तर त्याबाबत उपस्थित केले जाणारे प्रश्न वैध ठरले असते. आमचा देश एवढा विशाल, सुंदर आणि वैविध्यपूर्ण आहे. जेव्हा जी-२० च्या बैठका होत आहेत तेव्हा त्या आमच्या देशातील प्रत्येक भागात होणं स्वाभाविक नाही काय?  एका दशकापेक्षा कमी काळात अर्थव्यवस्थेमध्ये पाच स्थानांनी प्रगती करणाऱ्या भारताच्या रेकॉर्डचा हवाला देत मोदींनी पुढच्या काही काळात भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये असेल, असा दावाही केला.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतchinaचीनPakistanपाकिस्तान