शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

अरुणाचल असो वा काश्मीर... आम्ही कुठेही घेऊ शकतो जी-२० च्या बैठका, PM मोदींनी ठणकावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 18:28 IST

Narendra Modi: राजधानी दिल्लीमध्ये ९ आणि १० सप्टेंबर रोजी २०-२० शिखर संमेलन होत आहे. या संमेलनासाठी जगातील २० शक्तिशाली देशांचे प्रमुख दिल्लीत येणार असल्याने संपूर्ण जगाच्या नजरा दिल्लीकडे लागलेल्या आहेत.

राजधानी दिल्लीमध्ये ९ आणि १० सप्टेंबर रोजी २०-२० शिखर संमेलन होत आहे. या संमेलनासाठी जगातील २० शक्तिशाली देशांचे प्रमुख दिल्लीत येणार असल्याने संपूर्ण जगाच्या नजरा दिल्लीकडे लागलेल्या आहेत. त्यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेश आणि काश्मीरच्या प्रश्नावरून चीन आणि पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत. आम्ही बैठका कुठे घ्यायच्या हे सांगण्याचा अधिकार हा या दोन्ही देशांना नाही. त्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताकडून जी-२०च्या बैठका काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशमध्ये आयोजित करण्याबाबत पाकिस्तान आणि चीनने घेतलेले आक्षेप फेटाळून लावले आहेत. यजमान देशानं त्याच्या कुठल्याही भागात बैठका घेणं स्वाभाविक आहे. तसेच हा त्या देशाचा अंतर्गत प्रश्न आहे. 

भारताने मे महिन्यामध्ये कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत चीन आणि पाकिस्तानचा विरोध झुगारून लावत काश्मीरमध्ये जी-२०ची पर्यटनविषयक बैठक आयोजित केली होती. चीन आणि पाकिस्तानने हा भाग वादग्रस्त असल्याचं सांगत या बैठकांना आक्षेप घेतला होता. चीन हा जी-२० देश आहे. तर पाकिस्तान या संघटनेचा सदस्य नाही आहेत चीन भारताचं राज्य असलेल्या अरुणाचल प्रदेशवरही दावा ठोकत असतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जर आम्ही त्या ठिकांणी बैठका घेतल्या नसत्या तर त्याबाबत उपस्थित केले जाणारे प्रश्न वैध ठरले असते. आमचा देश एवढा विशाल, सुंदर आणि वैविध्यपूर्ण आहे. जेव्हा जी-२० च्या बैठका होत आहेत तेव्हा त्या आमच्या देशातील प्रत्येक भागात होणं स्वाभाविक नाही काय?  एका दशकापेक्षा कमी काळात अर्थव्यवस्थेमध्ये पाच स्थानांनी प्रगती करणाऱ्या भारताच्या रेकॉर्डचा हवाला देत मोदींनी पुढच्या काही काळात भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये असेल, असा दावाही केला.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतchinaचीनPakistanपाकिस्तान