शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

भावाला राखी बांधण्यासाठी जाणाऱ्या बहिणींवर यमुना कोपली; चौघांचे मृतदेह सापडले; ८ जण बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 07:39 IST

ही नाव मरका येथून फतेहपूर जिल्ह्यातील जरौली घाट येथे जात होती.

बांदा (उत्तर प्रदेश) : रक्षाबंधनाला महिला मुलांसोबत राखी बांधण्यासाठी बोटीतून माहेरी जात असताना यमुना नदीच्या मधोमधच पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे बोट बुडाली. यामुळे बोटीतील ३५ जण बुडाले असून, यात चौघांचे मृतदेह हाती लागले आहेत. अनेकजण बेपत्ता असून, त्यांचा शोध सुरू आहे. उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यातील मरका भागात गुरुवारी ही दुर्घटना घडली, अशी माहिती पोलिसांना दिली.

ही नाव मरका येथून फतेहपूर जिल्ह्यातील जरौली घाट येथे जात होती. नावेत ३० ते ३५ लोक होते, असे पोलीस अधीक्षक अभिनंदन यांनी सांगितले. बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी पाणबुड्यांची मदत घेण्यात येत आहे, असेही ते म्हणाले. सात ते आठ लोक पोहून किनाऱ्यावर पोहोचले. तथापि, अनेकजण बुडाल्याची भीती व्यक्त होत आहे, असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक लक्ष्मी निवास मिश्रा यांनी सांगितले.

असा घडला प्रसंग...

ज्यावेळी बोट नदीच्या मधोमध पोहोचली त्यावेळी पाण्याच्या प्रवाहामुळे हलू लागली. बोटीतील लोक घाबरून इकडे तिकडे जाऊ लागले. बोटीत एकाच बाजूला लोकांची संख्या वाढल्याने अचानक बोट उलटली. काही लोक पोहायला लागले. मात्र, महिला आणि मुले बुडू लागली. नदीच्या मध्यभागी बोट बुडाल्याने ते वाहून जात होते.  यावेळी २ बोटी मदतीला आल्या. त्यांनी काही लोकांना वाचवले. मात्र, या घटनेत अनेक महिला आणि मुले वाहून गेली.

प्रशासनाला मदतीचे आदेश

चार मृतदेह हाती लागले आहेत, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने दुर्घटनास्थळी जाऊन मदत व बचावकार्याची देखरेख करण्याचे निर्देश दिले आहेत.

बोट २० जणांची, बसले ३५

बेपत्ता लोकांचा शोध सुरू करण्यात आला आहे. या घटनेत अधिक लोकांचा मृत्यू होण्याची भीती आहे. या बोटीची बसण्याची क्षमता २० होती. मात्र, या बोटीत ३५ जणांसह  मोटारसायकलही भरल्या होत्या. त्यामुळे बोट बुडाली, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

आम्ही आमच्या गावातून पत्नीला घेऊन तिच्या आई्-वडिलांच्या घरी राखी बांधायला निघालो होतो. आम्ही नदीच्या काठावर पोहोचलो तेव्हा एकच बोट होती. त्यामुळे एकाच वेळी ३५ जण बोटीत चढले. यावेळी बोटीवर काही मोटारसायकलही ठेवल्या होत्या.- दुर्घटनेतून बचावलेला प्रत्यक्षदर्शी

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यूriverनदीRaksha Bandhanरक्षाबंधन